शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कोल्हापूर-शिर्डी रेल्वे बुधवारपासून--धनंजय महाडिक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:46 IST

कोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता कोल्हापुरातून सुटणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर-शिर्डी रेल्वेस बुधवारी (दि. २७) सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एक वेळच धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेºया वाढविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे येथे मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये कोल्हापूर-शिर्डी गाडीचा विषय लावून धरल्यानंतर त्याला तत्काळ मान्यता देण्यात आली. कोल्हापूर-नागपूर धावणारी गाडी मिरज येथे ३२ तास थांबते, या वेळेचा उपयोग करून कोल्हापूर-शिर्डी गाडी सुरू केली आहे. सध्या हॉलिडे स्पेशल म्हणून दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून निघणार असून, गुरुवारी पहाटे ५.५५ वाजता ती साईनगर येथे पोहोचेल. सव्वातीन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तीच गाडी सकाळी ८.२५ वाजता तेथून निघून रात्री ९.२५ वाजता कोल्हापुरात पोहोचेल. दीड दिवसात अल्प तिकीट दरात साई दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर या प्रमुख स्थानकांमध्ये रेल्वेचे थांबे आहेत. सहा जनरल डबे, सात स्लिपर कोच, वातानुकूलित थ्री टायर दोन डबे, द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित एक डबा असे १६ डबे राहणार आहेत.

कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा रेल्वे सोडण्यात यावी, कोल्हापूर-जोधपूर मार्गावर नवीन गाडी सुरू करावी, कोल्हापूर-सोलापूर ही रेल्वे सकाळच्या वेळेत सुरू करावी, फुटओव्हर ब्रीजच्या दोन्ही बाजूला यांत्रिकी सरकते जिने पूर्ण करावेत, आदी मागण्या पुण्यातील बैठकीत केल्याचेही त्यांनी सांगितले. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाडिक यांचा सत्कार रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. स्टेशन प्रबंधक सुग्रीव्ह मीणा, शिवनाथ बियाणे, समीर शेठ, मोहन शेटे उपस्थित होते....तर गजपती राजूंवर हक्कभंगकोल्हापूरच्या विमानसेवेबाबत गेले तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात नागरी विमान उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी १५ सप्टेंबरपर्यंत विमान सेवा सुरू करण्याचे लोकसभेत सांगितले होते. सध्या तांत्रिक बाबीत ही प्रक्रिया अडकली असून, विमान सेवा लवकर सुरू झाली नाहीतर राजूंवर हक्कभंग आणण्याची तयारीही केल्याचे महाडिक यांनी सांगितले.महालक्ष्मी-अंबाबाई वाद निरर्थकमहालक्ष्मी की अंबाबाई हा वाद माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. कोणी देवी म्हणेल, आई, लक्ष्मी, महालक्ष्मी म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव बदलणे एवढे सोपे नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.बुधवारी साई मंदिरात लाडू वाटपकोल्हापूर-शिर्डी गाडीचा प्रारंभ बुधवारी होत असून, त्यानिमित्त जिल्ह्णातील साई मंदिरात लाडू वाटप केले जाणार आहे. प्रत्येक मंदिरात साधारणत: दोनशे लाडूंचे वाटप केले जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.सहा महिन्यांत कोकण रेल्वेचे कामकोल्हापूर-वैभववाडीचा साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प असून, त्याचे उद्घाटन तीन महिन्यांपूर्वीच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचा विकास आराखडा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी व टेंडर प्रक्रिया यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतरच कामास सुरुवात होईल, असे महाडिक यांनी सांगितले.जनरल - १७० रुपये, स्लिपर कोच-३३० रुपये,थ्री टायर ए.सी. - ९०५ रुपये, टू टायर ए. सी.- १२९५ रुपये.