शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोल्हापूर-शिर्डी रेल्वे बुधवारपासून--धनंजय महाडिक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:46 IST

कोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता कोल्हापुरातून सुटणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर-शिर्डी रेल्वेस बुधवारी (दि. २७) सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एक वेळच धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेºया वाढविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे येथे मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये कोल्हापूर-शिर्डी गाडीचा विषय लावून धरल्यानंतर त्याला तत्काळ मान्यता देण्यात आली. कोल्हापूर-नागपूर धावणारी गाडी मिरज येथे ३२ तास थांबते, या वेळेचा उपयोग करून कोल्हापूर-शिर्डी गाडी सुरू केली आहे. सध्या हॉलिडे स्पेशल म्हणून दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून निघणार असून, गुरुवारी पहाटे ५.५५ वाजता ती साईनगर येथे पोहोचेल. सव्वातीन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तीच गाडी सकाळी ८.२५ वाजता तेथून निघून रात्री ९.२५ वाजता कोल्हापुरात पोहोचेल. दीड दिवसात अल्प तिकीट दरात साई दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर या प्रमुख स्थानकांमध्ये रेल्वेचे थांबे आहेत. सहा जनरल डबे, सात स्लिपर कोच, वातानुकूलित थ्री टायर दोन डबे, द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित एक डबा असे १६ डबे राहणार आहेत.

कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा रेल्वे सोडण्यात यावी, कोल्हापूर-जोधपूर मार्गावर नवीन गाडी सुरू करावी, कोल्हापूर-सोलापूर ही रेल्वे सकाळच्या वेळेत सुरू करावी, फुटओव्हर ब्रीजच्या दोन्ही बाजूला यांत्रिकी सरकते जिने पूर्ण करावेत, आदी मागण्या पुण्यातील बैठकीत केल्याचेही त्यांनी सांगितले. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाडिक यांचा सत्कार रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. स्टेशन प्रबंधक सुग्रीव्ह मीणा, शिवनाथ बियाणे, समीर शेठ, मोहन शेटे उपस्थित होते....तर गजपती राजूंवर हक्कभंगकोल्हापूरच्या विमानसेवेबाबत गेले तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात नागरी विमान उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी १५ सप्टेंबरपर्यंत विमान सेवा सुरू करण्याचे लोकसभेत सांगितले होते. सध्या तांत्रिक बाबीत ही प्रक्रिया अडकली असून, विमान सेवा लवकर सुरू झाली नाहीतर राजूंवर हक्कभंग आणण्याची तयारीही केल्याचे महाडिक यांनी सांगितले.महालक्ष्मी-अंबाबाई वाद निरर्थकमहालक्ष्मी की अंबाबाई हा वाद माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. कोणी देवी म्हणेल, आई, लक्ष्मी, महालक्ष्मी म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव बदलणे एवढे सोपे नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.बुधवारी साई मंदिरात लाडू वाटपकोल्हापूर-शिर्डी गाडीचा प्रारंभ बुधवारी होत असून, त्यानिमित्त जिल्ह्णातील साई मंदिरात लाडू वाटप केले जाणार आहे. प्रत्येक मंदिरात साधारणत: दोनशे लाडूंचे वाटप केले जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.सहा महिन्यांत कोकण रेल्वेचे कामकोल्हापूर-वैभववाडीचा साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प असून, त्याचे उद्घाटन तीन महिन्यांपूर्वीच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचा विकास आराखडा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी व टेंडर प्रक्रिया यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतरच कामास सुरुवात होईल, असे महाडिक यांनी सांगितले.जनरल - १७० रुपये, स्लिपर कोच-३३० रुपये,थ्री टायर ए.सी. - ९०५ रुपये, टू टायर ए. सी.- १२९५ रुपये.