शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

कोल्हापूर-शिर्डी रेल्वे बुधवारपासून--धनंजय महाडिक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:46 IST

कोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता कोल्हापुरातून सुटणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर-शिर्डी रेल्वेस बुधवारी (दि. २७) सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एक वेळच धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेºया वाढविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे येथे मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये कोल्हापूर-शिर्डी गाडीचा विषय लावून धरल्यानंतर त्याला तत्काळ मान्यता देण्यात आली. कोल्हापूर-नागपूर धावणारी गाडी मिरज येथे ३२ तास थांबते, या वेळेचा उपयोग करून कोल्हापूर-शिर्डी गाडी सुरू केली आहे. सध्या हॉलिडे स्पेशल म्हणून दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून निघणार असून, गुरुवारी पहाटे ५.५५ वाजता ती साईनगर येथे पोहोचेल. सव्वातीन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तीच गाडी सकाळी ८.२५ वाजता तेथून निघून रात्री ९.२५ वाजता कोल्हापुरात पोहोचेल. दीड दिवसात अल्प तिकीट दरात साई दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर या प्रमुख स्थानकांमध्ये रेल्वेचे थांबे आहेत. सहा जनरल डबे, सात स्लिपर कोच, वातानुकूलित थ्री टायर दोन डबे, द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित एक डबा असे १६ डबे राहणार आहेत.

कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा रेल्वे सोडण्यात यावी, कोल्हापूर-जोधपूर मार्गावर नवीन गाडी सुरू करावी, कोल्हापूर-सोलापूर ही रेल्वे सकाळच्या वेळेत सुरू करावी, फुटओव्हर ब्रीजच्या दोन्ही बाजूला यांत्रिकी सरकते जिने पूर्ण करावेत, आदी मागण्या पुण्यातील बैठकीत केल्याचेही त्यांनी सांगितले. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाडिक यांचा सत्कार रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. स्टेशन प्रबंधक सुग्रीव्ह मीणा, शिवनाथ बियाणे, समीर शेठ, मोहन शेटे उपस्थित होते....तर गजपती राजूंवर हक्कभंगकोल्हापूरच्या विमानसेवेबाबत गेले तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात नागरी विमान उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी १५ सप्टेंबरपर्यंत विमान सेवा सुरू करण्याचे लोकसभेत सांगितले होते. सध्या तांत्रिक बाबीत ही प्रक्रिया अडकली असून, विमान सेवा लवकर सुरू झाली नाहीतर राजूंवर हक्कभंग आणण्याची तयारीही केल्याचे महाडिक यांनी सांगितले.महालक्ष्मी-अंबाबाई वाद निरर्थकमहालक्ष्मी की अंबाबाई हा वाद माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. कोणी देवी म्हणेल, आई, लक्ष्मी, महालक्ष्मी म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव बदलणे एवढे सोपे नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.बुधवारी साई मंदिरात लाडू वाटपकोल्हापूर-शिर्डी गाडीचा प्रारंभ बुधवारी होत असून, त्यानिमित्त जिल्ह्णातील साई मंदिरात लाडू वाटप केले जाणार आहे. प्रत्येक मंदिरात साधारणत: दोनशे लाडूंचे वाटप केले जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.सहा महिन्यांत कोकण रेल्वेचे कामकोल्हापूर-वैभववाडीचा साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प असून, त्याचे उद्घाटन तीन महिन्यांपूर्वीच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचा विकास आराखडा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी व टेंडर प्रक्रिया यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतरच कामास सुरुवात होईल, असे महाडिक यांनी सांगितले.जनरल - १७० रुपये, स्लिपर कोच-३३० रुपये,थ्री टायर ए.सी. - ९०५ रुपये, टू टायर ए. सी.- १२९५ रुपये.