शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोल्हापूर : निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:09 IST

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही.

ठळक मुद्दे निम्म्या कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्भवलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मात्र ऐन पावसाळ्यात चांगलीच गैरसोय झाली.कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता भोगावती नदीवर बालिंगा येथे उपसा केंद्र, तसेच जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही केंद्रे अव्याहतपणे सुरू आहेत.

या जलशुद्धीकरण केंद्रातून चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत पाणी नेऊन तेथून निम्म्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये काही उपनगरे, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्डाचा समावेश आहे.

जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना त्याखालील झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत होता. हा स्पर्श झाला की, विद्युतपुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्र बंद पडायचे. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच ते रात्री साडेअकरा या वेळेत पहिल्यांदा विद्युतपुरवठा खंडित झाला.

त्यानंतर मध्यरात्री एक ते पहाटे तीन आणि शनिवारी सकाळी पावणेसात ते सकाळी सव्वानऊ अशा तीन वेळा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रियाही बंद राहिली.झाडांच्या फांद्यांचा स्पर्श झाला की, शॉर्टसर्किट होत असल्याने या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्युतपुरवठा बंद ठेवावा लागला.

तीन वेळा जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर झाला. चंबुखडीची टाकी पूर्ण क्षमतेने भरली की, व्यवस्थित पाणीपुरवठा होतो; पण वारंवार वीजपुरवठाच खंडित होत राहिल्याने चंबुखडी येथील टाकी भरलीच नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.शनिवारी सकाळी ज्या भागात पाणी देण्यात येते तेथे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अनपेक्षित पाणी गायब झाल्याने नागरिक हैराण झाले. घरात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला. शनिवारी सायंकाळनंतर कोठे पाणी आले आणि कोठे आले नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.चंबुखडी पाण्याच्या टाकीतून फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत, कणेरकरनगर, सानेगुरुजीनगर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, तुळजाभवानी कॉलनी, शिवाजी पेठेचा काही भाग, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

रंकाळा टॉवर ते आझाद चौक आणि शुक्रवार पेठ ते दसरा चौक परिसरात विस्तारलेल्या ‘सी’ आणि ‘डी’ वॉर्डात लोकवस्ती मोठी आहे. परिणामी, निम्मे शहर चंबुखडी टाकीवर अवलंबून आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. परिणामी, झाडांच्या फांद्या वेळोवेळी तोडल्या असत्या, तर शॉर्टसर्किट झालेच नसते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर