शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

कोल्हापूर : निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:09 IST

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही.

ठळक मुद्दे निम्म्या कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्भवलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मात्र ऐन पावसाळ्यात चांगलीच गैरसोय झाली.कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता भोगावती नदीवर बालिंगा येथे उपसा केंद्र, तसेच जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही केंद्रे अव्याहतपणे सुरू आहेत.

या जलशुद्धीकरण केंद्रातून चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत पाणी नेऊन तेथून निम्म्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये काही उपनगरे, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्डाचा समावेश आहे.

जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना त्याखालील झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत होता. हा स्पर्श झाला की, विद्युतपुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्र बंद पडायचे. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच ते रात्री साडेअकरा या वेळेत पहिल्यांदा विद्युतपुरवठा खंडित झाला.

त्यानंतर मध्यरात्री एक ते पहाटे तीन आणि शनिवारी सकाळी पावणेसात ते सकाळी सव्वानऊ अशा तीन वेळा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रियाही बंद राहिली.झाडांच्या फांद्यांचा स्पर्श झाला की, शॉर्टसर्किट होत असल्याने या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्युतपुरवठा बंद ठेवावा लागला.

तीन वेळा जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर झाला. चंबुखडीची टाकी पूर्ण क्षमतेने भरली की, व्यवस्थित पाणीपुरवठा होतो; पण वारंवार वीजपुरवठाच खंडित होत राहिल्याने चंबुखडी येथील टाकी भरलीच नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.शनिवारी सकाळी ज्या भागात पाणी देण्यात येते तेथे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अनपेक्षित पाणी गायब झाल्याने नागरिक हैराण झाले. घरात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला. शनिवारी सायंकाळनंतर कोठे पाणी आले आणि कोठे आले नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.चंबुखडी पाण्याच्या टाकीतून फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत, कणेरकरनगर, सानेगुरुजीनगर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, तुळजाभवानी कॉलनी, शिवाजी पेठेचा काही भाग, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

रंकाळा टॉवर ते आझाद चौक आणि शुक्रवार पेठ ते दसरा चौक परिसरात विस्तारलेल्या ‘सी’ आणि ‘डी’ वॉर्डात लोकवस्ती मोठी आहे. परिणामी, निम्मे शहर चंबुखडी टाकीवर अवलंबून आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. परिणामी, झाडांच्या फांद्या वेळोवेळी तोडल्या असत्या, तर शॉर्टसर्किट झालेच नसते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर