शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोल्हापूर : अशास्त्रीय वृक्षारोपणाची संभाजीराजेंनी घेतली दखल, महापालिकेच्या आयुक्तांना दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 13:05 IST

केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेऊन याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यांनी पत्र दिले आहे.

ठळक मुद्देअशास्त्रीय वृक्षारोपणाची संभाजीराजेंनी घेतली दखलआयुक्तांना दिले पत्र, महापालिकेच्या भूमिकेची प्रतीक्षा

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेऊन याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यांनी पत्र दिले आहे.‘लोकमत’ने या योजनेअंतर्गत अशास्त्रीय पद्धतीने झाडे लावल्याबाबतचे वृत्त ३ आणि ४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. पहिल्या वर्षी झाडे लावण्यासाठी मिळालेला एक कोटीचा निधी, सध्या तीन ठिकाणी एक कोटी ६२ लाख रुपये खर्चून लावली जात असलेली झाडे आणि आता पुन्हा पाच ठिकाणी दोन कोटी रुपये खर्चून लावण्यात येणारी झाडे याबाबतची सविस्तर मांडणी या मालिकेत केली होती.या वृत्ताची दखल घेऊन खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी (दि. ४) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना पत्र पाठविले आहे. कोल्हापूर शहरामध्ये वृक्षारोपण आणि हरितपट्टे तयार करण्याचे काम सुरू आहे.

जैवविविधता मंडळ आणि वृक्ष प्राधिकरण समिती व त्यावर या विषयातील तज्ज्ञ असताना, या प्रकल्पांचे या तज्ज्ञांसमोर सादरीकरण न करता, त्यांचा सल्ला न घेता हे काम हाती घेतल्याचे दिसते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.शास्त्रीय पद्धतीने या झाडांची योग्य ऋतूमध्ये लागवड करणे गरजेचे असल्याने ही अशास्त्रीय पद्धतीने लागवड होत असल्याने यातील किती झाडे जोपासली जातील, याबाबत त्यांनी पत्रामध्ये शंका व्यक्त केली आहे.

झाडांची योग्य लागवड आणि जोपासना होण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केल्यास शहराच्या जैवविविधतेत भर पडेल व पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

खासदारांच्या उलट स्थायी सदस्यांची भूमिकाएकीकडे खासदार संभाजीराजे यांनी हे वृक्षारोपण शास्त्रीय पद्धतीने व्हावे, अशी भूमिका घेतली असताना दुसरीकडे स्थायी समितीच्या सदस्यांनी मात्र याबाबत योग्य आणि स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या डॉ. मधुकर बाचूळकर यांच्याविषयीच वेगळी भूमिका घेतली आहे. ‘जिथे काम सुरू आहे तेथे काही चुकीचे झाले असेल तर त्यात दुरुस्ती करू,’ अशी भूमिका घेण्याऐवजी थेट या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीबाबत विरोधाची भूमिका घेणे अनाकलनीय ठरणारे आहे.

आयुक्त काय करणार?जैवविविधता समिती आणि वृक्षप्राधिकरण या समित्यांवर या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही झाडे लावली जावीत, अशी स्पष्ट भूमिका महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतली होती. मात्र तसे न होता, परस्पर, नेमकी भर उन्हाळ्यातच, पावलापावलांच्या अंतरावर ही झाडे लावण्यात आली आहेत! त्यामुळे आता या प्रकरणात आयुक्त नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर