शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

Kolhapur: पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांमुळे रस्त्यांची कामे रखडली, कृती समितीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 13:28 IST

कोणाचाही दबाव नसल्याचे ठेकेदाराचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : शंभर कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाला शुक्रवारी वेगळे वळण लागले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बगलबच्च्यांमुळे रस्त्याची कामे रखडल्याचा आरोप कोल्हापूर शहर जिल्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील बैठकीत केला. या बगलबच्च्यांना उपठेकेदार म्हणून कामे पाहिजे आहेत, त्यासाठी मुख्य ठेकेदारावर दबाव आणला जात असल्याचा पदाधिकाऱ्यांनी दावा केला. मात्र, असा कोणाचाही दबाव आपल्यावर नसल्याचा खुलासा प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी बैठकीतच केला.शहरातील रस्त्यांची कामे रखडल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना सोमवारी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सरनोबत यांनी रस्त्याचे ठेकेदार, कृती समितीचे पदाधिकारी, महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांचे उपशहर अभियंता यांची संयुक्त बैठक घेतली.बैठकीत कृती समितीने गंभीर आरोप करून त्याला वेगळे वळण दिले. बैठक सुरू झाल्यापासून अशोक पोवार, रमेश मोरे हे ठेकेदाराचे प्रतिनिधी सत्तार मुल्ला यांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? अशी वारंवार विचारणा करीत होते. तुमच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमची भूमिका फक्त शहरातील रस्ते चांगले व्हावेत आणि ते लवकर व्हावेत, एवढीच असल्याचे सांगत होते. तर ठेकेदाराचे प्रतिनिधी असा कोणाचा दबाव नसल्याचे सांगत होते.जर कोणाचा दबाव नसेल तर मग रस्त्यांच्या कामाची गती का वाढवत नाही? अशी विचारणा केल्यावर मुल्ला शांतच बसून राहिले. त्यावेळी पोवार व मोरे यांनी थेट आरोप केला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बगलबच्च्यांना उपठेकेदार म्हणून सोळा रस्त्यांची कामे पाहिजे आहेत. त्यासाठी ते ठेकेदारावर दबाव टाकत आहेत. म्हणूनच कामांना विलंब होत आहे, असे पोवार म्हणाले. आम्ही कोणा मंत्र्यांना घाबरत नाही, तुमच्यावर दबाव असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, असेही पोवार व मोरे यांनी सांगितले.तेरा रस्ते कामास उपलब्धसोमवारी ठेकेदाराच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी महापालिकेकडून रस्त्यातील सेवा वाहिन्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने कामात अडथळे येत असल्याची तक्रार केली होती. याबाबतचा जाब शहर अभियंता सरनोबत यांना विचारला. त्यावेळी पाच रस्ते तयार करण्यात कसलीच अडचण राहिलेली नाही. शिवाय, अन्य आठ रस्तेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण सरनोबत यांनी दिले.

पाच रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणारज्या पाच रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी करण्याची सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली आहे, ती कामे वेळेत पूर्ण केली जातील. कामाची गतीही वाढविण्यात आली आहे, असे मुल्ला यांनी पुन्हा सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकguardian ministerपालक मंत्री