शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

शेणींचा तुटवडा; कोल्हापूरकरांनो बदल स्वीकारा, अंत्यसंस्कारासाठी गॅस शवदाहिनीचा वापर करा

By भारत चव्हाण | Updated: November 15, 2025 18:37 IST

एक कोटींची गॅसदाहिनी; अंत्यसंस्काराचे प्रमाण कमी

भारत चव्हाणकोल्हापूर : पुरोगामी शहर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर शहरातील नागरिक नवे बदल स्वीकारतात, असा अनुभव आहे. या शहराने काही आदर्शही घालून दिले, त्याचा स्वीकार नंतर राज्यभरातून केला गेला. गेल्या काही वर्षांपासून येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसविली, पण त्याचा वापर करण्याची अजूनही मनाची तयारी कोल्हापूरकरांनी केलेली नाही. पारंपरिक लाकूड शेणीऐवजी गॅसदाहिनीत मृतदेह दहन करण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे.महापालिकेतर्फे सामाजिक भावनेतून काेणाच्या घरी एखादी व्यक्ती मृत झाली तर त्या मृत व्यक्तींच्या पार्थिवावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. एवढेच नाही तर मृत व्यक्तीच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेण्यासाठी मोफत शववाहिकाही दिली जाते. त्यामुळे अनेकांचा वेळ वाचतो, नातेवाईक, कुटुंबीय यांचा त्रास कमी होतो. या सामाजिक उपक्रमाचे राज्यभरातून स्वागत करण्यात आले.महापालिकेमार्फत प्रत्येक वर्षी अंत्यसंस्कारासाठी शेणी, लाकडे खरेदी केली जातात. परंतु अलीकडील काळात पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी म्हणून वृक्षतोड कमी झाली आहे. लाकडं बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. शेणी मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बदल स्वीकारला.लाकडं, शेणी मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने प्रशासनाने स्मशानभूमीकरिता एक गॅसवर चालणारी शवदाहिनी बसविली. २०१६-१७ मध्ये बडोदा येथे राहणाऱ्या तसेच मूळचे कोल्हापूरचे असलेले व्यावसायिक राजेंद्र चव्हाण यांनी येथील स्मशानभूमीची ख्याती ऐकून गॅसदाहिनी मोफत दिली होती. या गॅसदाहिनीचा कोरोना काळात मोठा उपयोग झाला होता. कोरोनाने मृत झालेल्या अनेकांच्या पार्थिवावर गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.पारंपरिक पद्धतीलाच प्राधान्यही गॅसदाहिनी जीर्ण तसेच नादुरुस्त झाल्याने पालिका प्रशासनाने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून नवीन गॅसदाहिनी बसविली आहे. ती विजेवर चालेल, अशीही व्यवस्था त्यात आहे. परंतु या दाहिनीवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांकडून लाकूड, शेणी या पारंपरिक पद्धतीलाच प्राधान्य दिले आहे.

केवळ ७३ मृतदेहांवर अंत्यसंस्कारफेब्रुवारीला बसविण्यात आलेल्या या गॅसदाहिनीवर आतापर्यंत नऊ महिन्यांत केवळ ७३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर त्याच ठिकाणी लाकूड व शेणीच्या माध्यमातून रोज १२ ते १५ मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात.प्रबोधनाची चळवळ सुरू व्हायला पाहिजे‘मेलेल्याला आगीची काय भीती’ असा एक वाक्प्रचार आहे. या वाक्प्रचाराची जाणीव करून देण्याची तसेच प्रबोधन करण्याची गरज आहे. मृतदेह लाकडं शेणीत जाळला काय आणि शवदाहिनीत जाळला काय? काहीच फरक नाही. फक्त नातेवाईक, मित्र मंडळींनी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur faces firewood shortage; embrace gas crematorium for funerals.

Web Summary : Kolhapur encourages gas crematorium use due to firewood scarcity. Despite free gas crematorium availability, residents prefer traditional methods. The city needs awareness to adopt eco-friendly cremation.