शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

CoronaVirus Lockdown : दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द; संभ्रमावस्था संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:47 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची या पेपरबाबतची संभ्रमावस्था संपली आहे.

ठळक मुद्देदहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द; संभ्रमावस्था संपलीकोल्हापूर विभागातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची या पेपरबाबतची संभ्रमावस्था संपली आहे.दहावीचे पेपर होतील तसे ते तपासणीसाठी शिक्षकांकडे शाळांच्या माध्यमातून पाठविण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘लॉकडाऊन’मुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम बहुतांश प्रमाणात पूर्ण झाले आहे.

या उत्तरपत्रिका संकलनाची प्रक्रिया विभागीय मंडळाने दि. १८ मार्चपासून सुरू केली. त्यानंतर दोन दिवस ही प्रक्रिया सुरू राहिली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया देखील थांबली. लॉकडाऊन संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. राज्य शासनाच्या आदेशानुसार या विषयाच्या मूल्यांकनाबाबतची कार्यवाही केली जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.

दरम्यान, भाषा, गणित आणि विज्ञान विषयाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली आहे. त्याबाबतचे निवेदन संघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले.

कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन पेपर रद्दचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. या पेपरचे मूल्यांकन करताना स्कॉलर, अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी.- क्रांतिकुमार वरक, विद्यार्थी

आम्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. गेल्या १५ हून अधिक दिवसांपासून पेपरबाबत आमच्या मनात असलेली संभ्रमावस्था दूर झाली आहे.-श्वेता पिसे, विद्यार्थिनी 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याssc examदहावीkolhapurकोल्हापूर