शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

कोल्हापूर : आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:36 IST

आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देआजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरलाकष्ट करा, निश्चितपणे यश मिळेल : हणमंतराव गायकवाड

कोल्हापूर : आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.येथील राजाराम महाविद्यालयातर्फे आयोजित राजाराम महोत्सवात ते बोलत होते. महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. एम. खेमनार, महोत्सवाच्या संयोजनप्रमुख डॉ. अनिता बोडके उपस्थित होत्या. नेल आर्ट, हेअर स्टाईल अशा विविध स्पर्धा, यशस्वीतांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने दुसऱ्या दिवशी हा महोत्सव बहरला आहे.

कोल्हापुरात शुक्रवारी राजाराम महोत्सवातील सेल्फी पॉर्इंट येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असा सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)

गायकवाड म्हणाले, आपल्याजवळ असणारी कोणतीही कल्पना कायमस्वरूपी आणि टिकणारी असायला हवी. त्यामागे ध्येयाने मागे लागल्यास पाहिजे तो व्यवसाय करण्यास मदत मिळते. उद्योग, व्यवसायातील यशासाठी टीमवर्क महत्त्वाचे ठरते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह संघर्ष आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा.

कोणतेही काम करत असताना ते सर्वोत्तम करा. प्राचार्य डॉ. खेमनार म्हणाले, खोटा अविर्भाव आणत जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवत वेळीच सुधारणा केली, तरच यशस्वी होता येते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. अंजली भागवत यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास भागवत यांनी आभार मानले. दरम्यान, महोत्सवात दुपारी कथाकार आप्पासाहेब खोत यांचा कथाकथन आणि सायंकाळी ऋषीकेश जोशी, डॉ. शरद भुथाडिया यांचा एकपात्री प्रयोग रंगला.

जिद्दीने काम केलेस्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून कामाला सुरुवात केली. जिद्दीने काम करत गेलो. उत्तम काम केल्यामुळेच यश मिळविता आले, असे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, पुढील वर्षात किमान १0 कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. विद्यार्थ्यांनी नुसते चांगले नव्हे, तर सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास घ्यावा.

 

 

 

टॅग्स :Rajaram Collegeराजाराम कॉलेजkolhapurकोल्हापूर