शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापूर : आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:36 IST

आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देआजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरलाकष्ट करा, निश्चितपणे यश मिळेल : हणमंतराव गायकवाड

कोल्हापूर : आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.येथील राजाराम महाविद्यालयातर्फे आयोजित राजाराम महोत्सवात ते बोलत होते. महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. एम. खेमनार, महोत्सवाच्या संयोजनप्रमुख डॉ. अनिता बोडके उपस्थित होत्या. नेल आर्ट, हेअर स्टाईल अशा विविध स्पर्धा, यशस्वीतांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने दुसऱ्या दिवशी हा महोत्सव बहरला आहे.

कोल्हापुरात शुक्रवारी राजाराम महोत्सवातील सेल्फी पॉर्इंट येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असा सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)

गायकवाड म्हणाले, आपल्याजवळ असणारी कोणतीही कल्पना कायमस्वरूपी आणि टिकणारी असायला हवी. त्यामागे ध्येयाने मागे लागल्यास पाहिजे तो व्यवसाय करण्यास मदत मिळते. उद्योग, व्यवसायातील यशासाठी टीमवर्क महत्त्वाचे ठरते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह संघर्ष आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा.

कोणतेही काम करत असताना ते सर्वोत्तम करा. प्राचार्य डॉ. खेमनार म्हणाले, खोटा अविर्भाव आणत जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवत वेळीच सुधारणा केली, तरच यशस्वी होता येते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. अंजली भागवत यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास भागवत यांनी आभार मानले. दरम्यान, महोत्सवात दुपारी कथाकार आप्पासाहेब खोत यांचा कथाकथन आणि सायंकाळी ऋषीकेश जोशी, डॉ. शरद भुथाडिया यांचा एकपात्री प्रयोग रंगला.

जिद्दीने काम केलेस्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून कामाला सुरुवात केली. जिद्दीने काम करत गेलो. उत्तम काम केल्यामुळेच यश मिळविता आले, असे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, पुढील वर्षात किमान १0 कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. विद्यार्थ्यांनी नुसते चांगले नव्हे, तर सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास घ्यावा.

 

 

 

टॅग्स :Rajaram Collegeराजाराम कॉलेजkolhapurकोल्हापूर