शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Kolhapur: विधानसभेसाठी राहुल पाटील यांनी ‘करवीर’मधून शड्डू ठोकला, नरके यांच्याही गाठीभेटी वाढल्या

By राजाराम लोंढे | Updated: July 9, 2024 17:01 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी असला तरी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात वातावरण तापू ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी असला तरी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात वातावरण तापू लागले आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी ‘करवीर’मधून शड्डू ठोकला असून, त्यांनी संपर्क दौऱ्यांचा अक्षरश: धडाका लावला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदेसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही हालचाली गतिमान केल्या असून, त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. ‘कुंभी’ साखर कारखान्याचे संचालक मंडळांनी गावे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ व २०१४ मध्ये चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली; मात्र २०१९च्या निवडणुकीत पी. एन. पाटील यांनी दोन्ही निवडणुकांचा हिशोब चुकता केला. त्यांनी गेल्या पाच वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघात राबता ठेवला होता. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्रदीप नरके हे मतदारसंघात सक्रिय झाले. त्यामुळे २०२४ला पाटील-नरके यांच्यामध्ये निकराची झुंज पाहावयास मिळणार, असे वाटत असताना पी. एन. पाटील यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात ‘करवीर’मधील काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांचे वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील पुढे आले आहेत. वडिलांच्या दु:खातून सावरून ते पुन्हा नेटाने कामाला लागले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. व्यक्तिगत भेट घेऊन लोकांमध्ये ते मिसळत आहेत. चंद्रदीप नरकेही त्याच ताकदीने सक्रिय झाले आहेत. ‘कुंभी’ कारखाना, कुंभी बँकेच्या संचालकांवर प्रत्येक गावाची जबाबदारी दिली आहे.संपर्क, सामान्य माणसाशी असलेली नाळ या बळावर नरके यांनी दोन वेळा मैदान मारले. आताही तीच शिदोरी घेऊन ते मैदानात उतरले आहेत. राहुल पाटील हे नवखे असले तरी त्यांच्या सोबत दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या विषयाची सहानुभूती आहे. त्यांचा शांत स्वभाव आणि त्यांच्याकडील नम्रता पाहता आगामी निवडणुकीत पाटील-नरके यांच्यात निकराची झुंज होणार, हे निश्चित आहे.

साहेबांच्या माघारी आमची जबाबदारीदिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. पाटील यांच्या पश्चात राहुल यांच्या निवडणुकीची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली असून ‘साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी’ अशी टॅगलाईन सध्या सोशल मीडियातून घुमू लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा