शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Kolhapur: विधानसभेसाठी राहुल पाटील यांनी ‘करवीर’मधून शड्डू ठोकला, नरके यांच्याही गाठीभेटी वाढल्या

By राजाराम लोंढे | Updated: July 9, 2024 17:01 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी असला तरी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात वातावरण तापू ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी असला तरी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात वातावरण तापू लागले आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी ‘करवीर’मधून शड्डू ठोकला असून, त्यांनी संपर्क दौऱ्यांचा अक्षरश: धडाका लावला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदेसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही हालचाली गतिमान केल्या असून, त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. ‘कुंभी’ साखर कारखान्याचे संचालक मंडळांनी गावे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ व २०१४ मध्ये चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली; मात्र २०१९च्या निवडणुकीत पी. एन. पाटील यांनी दोन्ही निवडणुकांचा हिशोब चुकता केला. त्यांनी गेल्या पाच वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघात राबता ठेवला होता. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्रदीप नरके हे मतदारसंघात सक्रिय झाले. त्यामुळे २०२४ला पाटील-नरके यांच्यामध्ये निकराची झुंज पाहावयास मिळणार, असे वाटत असताना पी. एन. पाटील यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात ‘करवीर’मधील काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांचे वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील पुढे आले आहेत. वडिलांच्या दु:खातून सावरून ते पुन्हा नेटाने कामाला लागले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. व्यक्तिगत भेट घेऊन लोकांमध्ये ते मिसळत आहेत. चंद्रदीप नरकेही त्याच ताकदीने सक्रिय झाले आहेत. ‘कुंभी’ कारखाना, कुंभी बँकेच्या संचालकांवर प्रत्येक गावाची जबाबदारी दिली आहे.संपर्क, सामान्य माणसाशी असलेली नाळ या बळावर नरके यांनी दोन वेळा मैदान मारले. आताही तीच शिदोरी घेऊन ते मैदानात उतरले आहेत. राहुल पाटील हे नवखे असले तरी त्यांच्या सोबत दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या विषयाची सहानुभूती आहे. त्यांचा शांत स्वभाव आणि त्यांच्याकडील नम्रता पाहता आगामी निवडणुकीत पाटील-नरके यांच्यात निकराची झुंज होणार, हे निश्चित आहे.

साहेबांच्या माघारी आमची जबाबदारीदिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. पाटील यांच्या पश्चात राहुल यांच्या निवडणुकीची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली असून ‘साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी’ अशी टॅगलाईन सध्या सोशल मीडियातून घुमू लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा