शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कोल्हापूर : शेतकरी संघास १.४० कोटींचा नफा, युवराज पाटील यांची माहिती : सर्व शाखा नफ्यात आणण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 11:29 IST

शेतकरी सहकारी संघास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही शाखांचा व्यवसाय कमी असला तरी आगामी आर्थिक वर्षात त्यांनाही नफ्यात आणण्याचा निर्धार संचालकांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशेतकरी संघास १.४० कोटींचा नफायुवराज पाटील यांची माहिती सर्व शाखा नफ्यात आणण्याचा निर्धार

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही शाखांचा व्यवसाय कमी असला तरी आगामी आर्थिक वर्षात त्यांनाही नफ्यात आणण्याचा निर्धार संचालकांनी केल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या तीन वर्षांत शेतकरी सहकारी संघाचा कारभार अत्यंत पारदर्शक व काटकसरीचा सुरू असल्याने प्रत्येक वर्षी व्यवसायाबरोबर नफ्यातही वाढ होत आहे. यंदा १५९ कोटींचा व्यवसाय झाल्याने नफाही चांगला झाला. गतवर्षीपेक्षा ४० लाखांनी नफ्यात वाढ झाली. सर्वाधिक नफा खत विभागाचा असून ९९ लाख १२ हजार ७२५ रुपये आहे.

रूकडी खत कारखाना पूर्ण क्षमतेने चालत असल्याने ४६०० टन संघाने खताचे उत्पादन घेतले. संघाच्या उत्पादनांवर आजही शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असल्याने कोट्यवधीची खते विक्री करता आली. मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यात संघाचे आठ पेट्रोलपंप कार्यरत असून त्यातून २२ लाख २८ हजार ४२८ रुपयांचा निव्वळ नफा झाला.

मिरची पूड, गूळ विभाग आदींचे उत्पन्नही चांगले मिळाले आहे. जिथे व्यवसाय चांगला होऊ शकतो, त्या ठिकाणी नवीन शाखा सुरू करत असताना अकरा तोट्यांतील शाखांपैकी जास्तीत जास्त शाखा नफ्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, संचालक जी. डी. पाटील, आप्पासाहेब माने, व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ उपस्थित होते.

‘बैल छाप’ चहाशेतकरी संघाचे ‘बैल छाप’ खताने शेतकऱ्यांच्यामध्ये विश्वासाचे नाते जोपासले. त्यापाठोपाठ आता ‘बैल छाप’ चहा पावडर उत्पादन सुरू केले असून प्रत्येक शाखेवर त्याची विक्री सुरू असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

नोकरभरती अशक्यचकर्मचाऱ्यांचे ९५ लाखांचे देणे तीन टप्प्यात दिले जात असून शेवटचा ३२ लाखांचा टप्पाही आता पूर्ण होत आहे. जेवढ्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज चालविता येईल तेवढे चालवत असल्याने नवीन नोकरभरती अशक्यच असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात संघाची घोडदौड-आर्थिक वर्ष             उलाढाल                        नफा

  1. २०१५-१६              १३२ कोटी १९ लाख        ९२ हजार
  2. २०१६-१७             १६० कोटी १ कोटी             १ लाख
  3. २०१७-१८             १५९ कोटी १ कोटी          ४० लाख

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर