शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कोल्हापूर : वेगवान वाऱ्यामुळे सातत्याने तिरंगा फडकवणे अडचणीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:40 IST

ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोलीस उद्यानातील तिरंगा ध्वज सातत्याने फडकवता येत नाही. या वाऱ्यामुळे तो फाटण्याची शक्यता असल्याने ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देवेगवान वाऱ्यामुळे सातत्याने तिरंगा फडकवणे अडचणीचेकेएसबीपीची माहिती, ध्वजनियमाचे होते पालन

कोल्हापूर : ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोलीस उद्यानातील तिरंगा ध्वज सातत्याने फडकवता येत नाही. या वाऱ्यामुळे तो फाटण्याची शक्यता असल्याने ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली आहे.पोलीस उद्यानामध्ये गतवर्षी महाराष्ट्र दिनी हा महाराष्ट्रातील सर्वांत उंच आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज उभारला गेला; मात्र हा तिरंगा सातत्याने फडकवत ठेवला जात नसल्याने नागरिकांतून याबाबत सातत्याने विचारणा होत होती.या पार्श्वभूमीवर सुजय पित्रे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ३0३ फूट उंचीचा हा ध्वज उभारताना सर्व तांत्रिक बाबींची माहिती घेतली होती. कोल्हापूरच्या वातावरणाची सरासरी काढून ताशी २५ किलोमीटर वारे वाहण्याजोग्या परिस्थितीमध्ये ध्वज, त्याचा आकार, मटेरियल याचे नियोजन केले होते. मात्र सध्या ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने ध्वज आणि स्तंभ याच्यात मोठा तणाव निर्माण होतो; त्यामुळे ध्वज फाटण्याचा संभव असतो.

गेल्या काही दिवसांमध्ये वाऱ्याचा वेग, ध्वज चढवताना आणि उतरवताना होणारा त्रास, ध्वजाचे होणारे नुकसान याचा विचार करून याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून, त्यांनीही सातत्याने ध्वज फडकवणे धोकादायक असल्याचे सांगितले आहे.एका ध्वजाची किंमत ८२ हजार रुपये असल्याने मोठ्या वाऱ्यात जर सतत ध्वज फाटत राहिला तर आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे नाही. केंद्र शासनाचे ध्वजासंदर्भातील नियम याचाही विचार केला गेला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून वेगवान वाऱ्यावेळी ध्वज उतरवला जातो.

मुंबईतील राजभवन किंवा वाघा बॉर्डर येथील ध्वजही नियमित फडकवता येत नाहीत. त्यामुळे विशिष्ट प्रसंग, दिन हे लक्षात घेऊन योग्य वातावरण असताना ध्वज फडकवला जातो याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सुजय पित्रे यांनी पत्रकामध्ये नमूद केले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर