शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हापूर : जनताच सरकारला आॅनलाईनने घालवेल- हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 17:43 IST

राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल्याने वैतागलेली जनता आता सरकारलाच आॅनलाईनने घालवेल. असा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

ठळक मुद्देकोल्हापूर : जनताच सरकारला आॅनलाईनने घालवेल- हसन मुश्रीफरविवारच्या पुण्यातील मेळाव्याला दहा हजार कार्यकर्ते जाणार

कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल्याने वैतागलेली जनता आता सरकारलाच आॅनलाईनने घालवेल. असा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिनी रविवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा सांगता समारंभ होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.साखर पॅकेजची खिल्ली उडवत ह सन मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे साखर उद्योगाच्या डोळयात धूळफेक आहे. सामान्य माणसाला अल्प व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा, यासाठी राष्ट्रीयकृत बॅँका सुरू झाल्या पण आता उद्योगपतींनीच या बॅँका बुडविल्या.

सरकारची कामगिरी पाहता आता लहान मुलाला विचारले तरी हे सरकार जाणार असेच सांगेल. त्यामुळे सरकारविरोधात आक्रमकपणे बाहेर पडले पाहिजे. रविवारी पुण्यात होणाऱ्या हल्लाबोल सांगता मेळाव्याला जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते रवाना होतील, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेची कोल्हापूरातून सुरूवात झाली. त्याची सांगता पुण्यात होत असून कार्यकर्त्यांनी ताकदीने सहभागी व्हावे. माजी खासदार निवेदिता माने, माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, संगीता खाडे, आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी नियोजनाचा आढावा घेतला. माजी आमदार के. पी. पाटील, उपमहापौर महेश सावंत, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, भैया माने, मधूकर जांभळे, सर्जेराव पाटील-गवशीकर, शिवानंद माळी, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. रोहित पाटील यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार