शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर : भाजीपाल्याच्या दरात वाढ, आवक घटल्याने कांदाही वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:43 IST

पावसामुळे भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावल्याने दरात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली दिसते. अननस व तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढल्याने फळबाजार या दोन फळांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. आवक कमी झाल्याने कांदा मात्र चांगलाच वधारला आहे.

ठळक मुद्दे भाजीपाल्याच्या दरात वाढ, आवक घटल्याने कांदाही वधारला  अननस, तोतापुरीने फळबाजार हाऊसफुल्ल

कोल्हापूर : पावसामुळे भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावल्याने दरात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली दिसते. अननस व तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढल्याने फळबाजार या दोन फळांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. आवक कमी झाल्याने कांदा मात्र चांगलाच वधारला आहे.गेल्या आठ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीतील भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यात स्थानिक भाजीपाल्याची आवक पूर्णपणे ठप्प असल्याने दर वाढले आहेत.

बाजार समितीत २०० पोती कोबी, तर ४०० पोती ओल्या मिरच्यांची आवक होते. कारली, गवार, भेंडी, दोडक्याची आवकही कमी झाल्याने दर चांगलेच तेजीत आहेत. घेवड्याची आवक सुरू झाली असून मागणी अधिक असल्याने दर चांगलेच भडकले आहेत.

घेवड्याचा दर घाऊक बाजारात ५५ रुपये, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढली असून, दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात १२ रुपये पेंढी आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून घाऊक बाजारात कांदा १५ रुपये किलो झाला आहे. बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा चढउतार नसला तरी गेले दोन-तीन महिने घसरलेला लसणाचे दर सुधारण्यास सुरुवात झाली आहे.

पावसामुळे फळबाजारामध्ये थोडी शांतता दिसत असली तरी तोतापुरी आंबा व अननसची आवक चांगली आहे. कोल्हापुरात तोतापुरी आंब्याची रोज १५ टन आवक होत आहे.

कर्नाटकातून अजून आंब्याची आवक होत आहे. रायवळ, दशेरी आंबा बाजारात दिसत आहे. डाळिंबाची आवक व दर स्थिर आहे. लिंबूची आवक कमालीची वाढली असून, दर एकदमच खाली आले आहेत. लहान लिंबू रुपयांना दोन मिळत आहेत.साखर, तूरडाळ, हरभरा डाळीसह सर्वच डाळींचे दर तुलनेने स्थिर आहेत. सरकी तेल, खोबरेल व शेंगतेलाच्या दरातही फारशी चढउतार दिसत नाही. पोहे, शाबूदाण्याच्या दरात थोडीफार वाढ झालेली दिसते.मक्याच्या कणसांची आवक वाढलीमक्याच्या कणसांची आवक वाढली आहे. पावसाचा जोर जसा वाढेल तशी मागणीही वाढत आहे. घाऊक बाजारात सरासरी पाच रुपये कणीस मिळत असले तरी किरकोळ बाजारात दहा रुपये दर आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर