शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर : आता रिक्षात बसताच वीस रुपये; प्राधिकरणच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 12:06 IST

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या परिचलन बैठकीतील निर्णयानुसार आॅटोरिक्षाच्या भाडेदर वाढीस शुक्रवारी मान्यता देण्यात आली. त्यानुसार पहिल्या एक किलोमीटर अंतरासाठी २० रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देआता रिक्षात बसताच वीस रुपये; प्राधिकरणच्या बैठकीत निर्णयअंमलबजावणी सुरू पुढील प्रत्येक किलोमीटरला १७ रुपये

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या परिचलन बैठकीतील निर्णयानुसार आॅटोरिक्षाच्या भाडेदर वाढीस शुक्रवारी मान्यता देण्यात आली. त्यानुसार पहिल्या एक किलोमीटर अंतरासाठी २० रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.यापूर्वी पहिल्या एक किलोमीटरसाठी १७ रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये दर होता. गेल्या महिन्याभरापासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठेत पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतुकीचा एक हिस्सा असलेल्या आॅटोरिक्षा चालकांवरही झाला. त्याचा एकंदरीत विचार करता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार अध्यक्ष असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत सरकारी नियमानुसार पहिल्या एक किलोमीटरसाठी २०, तर पुढील प्रत्येक किलोमीटरला १७ असा दर निश्चित केला आहे.

या भाडेवाढीचा फायदा जिल्ह्यातील तीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांना होणार आहे . आॅटोरिक्षा परवानाधारकांना सुधारित भाडेदराप्रमाणे मीटरचे पुनर्प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) ४५ दिवसांच्या आत म्हणजे २१ जुलैपर्यंत करणे बंधनकारक आहे. मीटरचे पुनर्प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) केल्याशिवाय नवीन दराने भाडे आकारणी केल्यास व तशी तक्रार प्राप्त झाल्यास परवानाधारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिला आहे.जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक रिक्षा परवानाधारक आहेत. त्यातील कोल्हापूर शहरात १३ हजार रिक्षा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करीत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश रिक्षाचालक शेअर-ए-रिक्षा पद्धतीने व्यवसाय करीत आहेत. यापूर्वी जुलै २०१६ ला १४ रुपयांऐवजी १७ रुपये अशी तीन रुपये भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी तीन रुपयांनीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षात बसताच प्रवाशांना २० रुपये मोजावे लागणार आहेत.

 

जनतेचा विचार करून मनात नसतानाही व पेट्रोल परवडत नसल्याने ही दरवाढ आम्ही मान्य करीत आहोत. या भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याचे प्रवासी नाराज होणार आहेत. त्याचाही फटका आम्हा रिक्षाचालकांना बसणार आहे.- चंद्रकांत भोसले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर