शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 11:13 IST

ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली. ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडेयेत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात

कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली.

ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जि. प. महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, ग्राहक सल्लागार समिती पुणे विभाग किशोर लुल्ला आदी उपस्थित होते.बैठकीत अरुण देशपांडे यांनी अन्न व औषध प्रशासन, वजन-मापे, कृषी, शिक्षण, आरोग्य, महावितरण आदी विभागांच्या ग्राहक तक्रारींबाबतचा सविस्तर आढावा घेतला.देशपांडे म्हणाले, येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यस्तरावर सुरू आहे. ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा याबाबत या ग्राहक धोरणांमध्ये विचार करण्यात आला आहे.नंदकुमार काटकर यांनी जिल्ह्यात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आलेल्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले.यावेळी जिल्हा ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य जगन्नाथ जोशी, अनिल जाधव, पांडुरंग घाटगे, पुलाजी खैरे, दिलीपराव घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टोल फ्री क्रमांकावरील तक्रारीनंतर ७२ तासांत कारवाईग्राहकांची फसवणूक झाल्यास किंवा योग्य सेवा मिळाली नाही तर त्यांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार तत्काळ नोंदवावी. तक्रार नोंद केल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधितांवर कारवाई करून त्याचा अहवाल ग्राहकाला मिळतो. हा क्रमांक चोवीस तास सुरू आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार