शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 11:13 IST

ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली. ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडेयेत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात

कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली.

ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जि. प. महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, ग्राहक सल्लागार समिती पुणे विभाग किशोर लुल्ला आदी उपस्थित होते.बैठकीत अरुण देशपांडे यांनी अन्न व औषध प्रशासन, वजन-मापे, कृषी, शिक्षण, आरोग्य, महावितरण आदी विभागांच्या ग्राहक तक्रारींबाबतचा सविस्तर आढावा घेतला.देशपांडे म्हणाले, येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यस्तरावर सुरू आहे. ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा याबाबत या ग्राहक धोरणांमध्ये विचार करण्यात आला आहे.नंदकुमार काटकर यांनी जिल्ह्यात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आलेल्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले.यावेळी जिल्हा ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य जगन्नाथ जोशी, अनिल जाधव, पांडुरंग घाटगे, पुलाजी खैरे, दिलीपराव घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टोल फ्री क्रमांकावरील तक्रारीनंतर ७२ तासांत कारवाईग्राहकांची फसवणूक झाल्यास किंवा योग्य सेवा मिळाली नाही तर त्यांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार तत्काळ नोंदवावी. तक्रार नोंद केल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधितांवर कारवाई करून त्याचा अहवाल ग्राहकाला मिळतो. हा क्रमांक चोवीस तास सुरू आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार