शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

कोल्हापूर : आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 11:13 IST

ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली. ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडेयेत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात

कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली.

ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जि. प. महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, ग्राहक सल्लागार समिती पुणे विभाग किशोर लुल्ला आदी उपस्थित होते.बैठकीत अरुण देशपांडे यांनी अन्न व औषध प्रशासन, वजन-मापे, कृषी, शिक्षण, आरोग्य, महावितरण आदी विभागांच्या ग्राहक तक्रारींबाबतचा सविस्तर आढावा घेतला.देशपांडे म्हणाले, येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यस्तरावर सुरू आहे. ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा याबाबत या ग्राहक धोरणांमध्ये विचार करण्यात आला आहे.नंदकुमार काटकर यांनी जिल्ह्यात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आलेल्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले.यावेळी जिल्हा ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य जगन्नाथ जोशी, अनिल जाधव, पांडुरंग घाटगे, पुलाजी खैरे, दिलीपराव घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टोल फ्री क्रमांकावरील तक्रारीनंतर ७२ तासांत कारवाईग्राहकांची फसवणूक झाल्यास किंवा योग्य सेवा मिळाली नाही तर त्यांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार तत्काळ नोंदवावी. तक्रार नोंद केल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधितांवर कारवाई करून त्याचा अहवाल ग्राहकाला मिळतो. हा क्रमांक चोवीस तास सुरू आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार