शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कोल्हापूर : गावगाड्यात घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलले : कृष्णात खोत : भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:46 IST

गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देकोल्हापूर : भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालागावगाड्यात घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलले : कृष्णात खोत

कोल्हापूर : गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली.करवीर नगर वाचन मंदिर येथे आयोजित भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘बदलता गाव-एक चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कनवा’चे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते. प्रमुख उपस्थिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव, ‘कनवा’चे कार्यवाह सतीश कुलकर्णी, दीपक गाडवे, प्रा. अनंत जयतीर्थ आदींची होती.प्रा. खोत म्हणाले, ग्रामशैली आता बदलत चालली आहे. अगदी चुलीपासून स्वयंपाकघर, गोठा यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसत आहे. या सुधारणा म्हणायच्या की सूज हाच एक प्रश्न निर्माण झाला आहे. माणसांनी आता घरांबरोबर ग्रामदैवतही बदलली आहेत. या देवतांऐवजी राजकीय पक्षांची आणि नेत्यांचीच मंदिरे झाली आहेत.

कारण गावातील एका राजकीय गटाकडून एका देवाचे मंदिर बांधले तर दुसऱ्या गटाकडून त्याच देवाचे मंदिर बांधले जाते. त्यामुळे मूळ ग्रामदैवताकडे दुर्लक्ष होऊन ते अडगळीत पडून सोयी-सुविधांपासून वंचित राहत असल्याचे सद्य:चित्र आहे.ते पुढे म्हणाले, गावातील चुलीवर काय शिजतयं त्यावर तेथील संस्कृती, अर्थशास्त्र व समाजशास्त्र कळायचे, परंतु त्या चुलीवर काय शिजत नसेल तर नक्कीच काही तरी अर्थशास्त्र बिघडले आहे हे समजून यायचे. सर्वाधिक प्रयोग हे शेती व शिक्षणावर झाले; परंतु दुर्दैवाने दोन्ही क्षेत्रे मागे आहेत.

शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न झाला पण शेतकऱ्यांचा नाही हे वास्तव आहे. पूर्वी शेतीत राबविली जाणारी पद्धतीच आता नव्याने सांगितली जात आहे. ग्रंथपाल मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य