शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

कोल्हापूर : गावगाड्यात घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलले : कृष्णात खोत : भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:46 IST

गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देकोल्हापूर : भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालागावगाड्यात घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलले : कृष्णात खोत

कोल्हापूर : गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली.करवीर नगर वाचन मंदिर येथे आयोजित भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘बदलता गाव-एक चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कनवा’चे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते. प्रमुख उपस्थिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव, ‘कनवा’चे कार्यवाह सतीश कुलकर्णी, दीपक गाडवे, प्रा. अनंत जयतीर्थ आदींची होती.प्रा. खोत म्हणाले, ग्रामशैली आता बदलत चालली आहे. अगदी चुलीपासून स्वयंपाकघर, गोठा यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसत आहे. या सुधारणा म्हणायच्या की सूज हाच एक प्रश्न निर्माण झाला आहे. माणसांनी आता घरांबरोबर ग्रामदैवतही बदलली आहेत. या देवतांऐवजी राजकीय पक्षांची आणि नेत्यांचीच मंदिरे झाली आहेत.

कारण गावातील एका राजकीय गटाकडून एका देवाचे मंदिर बांधले तर दुसऱ्या गटाकडून त्याच देवाचे मंदिर बांधले जाते. त्यामुळे मूळ ग्रामदैवताकडे दुर्लक्ष होऊन ते अडगळीत पडून सोयी-सुविधांपासून वंचित राहत असल्याचे सद्य:चित्र आहे.ते पुढे म्हणाले, गावातील चुलीवर काय शिजतयं त्यावर तेथील संस्कृती, अर्थशास्त्र व समाजशास्त्र कळायचे, परंतु त्या चुलीवर काय शिजत नसेल तर नक्कीच काही तरी अर्थशास्त्र बिघडले आहे हे समजून यायचे. सर्वाधिक प्रयोग हे शेती व शिक्षणावर झाले; परंतु दुर्दैवाने दोन्ही क्षेत्रे मागे आहेत.

शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न झाला पण शेतकऱ्यांचा नाही हे वास्तव आहे. पूर्वी शेतीत राबविली जाणारी पद्धतीच आता नव्याने सांगितली जात आहे. ग्रंथपाल मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य