शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: हॉटेल्स फुल्ल, जेवणावळी जोरात, यंत्रणा अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:04 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

कोल्हापूर : प्रचारासाठी मुंबईपासून विदर्भापर्यंतचे नेते, कार्यकर्ते कोल्हापुरात आल्याने हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. कार्यकर्त्यांना जेवणाची कुपन्स वाटली जात आहेत. अपार्टमेंट, कॉलन्यांमध्ये जेवणावळी झडत असल्याचे चित्र सध्या कोल्हापुरात दिसत आहे. विशेष म्हणजे याबद्दल निवडणूक यंत्रणा अनभिज्ञ आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यभरातून माजी मंत्री, आमदार, माजी आमदार, महापौरांसह पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांची फौजच भाजपने कोल्हापुरात आणली आहे. एका नेत्याबरोबर चार-पाच कार्यकर्ते आले आहेत. त्यांची व्यवस्था हॉटेल्समध्ये करण्यात आल्याने हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. प्रत्येकाकडे विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे. दलित मतदार मुख्यत: काँग्रेसच्या पाठीशी असतो म्हणून शहरातील दलित वसाहती, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन केंद्र सरकार व देवेंद्र फडणवीस सरकारने तुमच्यासाठी कशा योजना राबविल्या हे सांगितले जाते. आपण काय केले हे सांगतानाच काँग्रेसने काय केले नाही, हे जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धार्मिक धुव्रीकरणासाठी सुरुवातीच्या टप्प्यात काश्मीर फाईल्स चित्रपटाची तिकिटे वाटप करण्यात आली होती. आता त्याच यंत्रणेकडून जेवणाची कुपन्स दिली जात आहेत. त्यामुळे मुख्यत: मांसाहारी खाणावळी, हॉटेल्स गर्दीने तुडुंब आहेत. अर्धा-अर्धा तास थांबल्याशिवाय जेवण मिळत नाही, असाही अनुभव येत आहे. निवडणूक विभागाकडे रोज सादर होणाऱ्या खर्चामध्ये हा खर्च मात्र कुठेच येत नाही.

लोकसभा पडली मागे...

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदार संघ आहेत. या दोन्ही मतदार संघाच्या निवडणुकीत जेवढा खर्च झाला नसेल तेवढा खर्च दोन्ही पक्षांकडून या एका जागेच्या पोटनिवडणुकीवर केला जात आहे.

रामनवमीला झेंडे वाटणार

निवडणूक असल्याने रविवारी असलेल्या रामनवमीला यंदा कमालीचे महत्त्व आले आहे. त्या दिवशी जय श्रीराम लिहिलेले झेंडे घरोघरी वाटण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यासाठी पुण्यातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. कोल्हापुरात रामनवमीनिमित्त अंबाबाई मंदिरात प्रतिवर्षी सायंकाळी पारंपरिक उत्साहात रामाचा रथ काढण्याची प्रथा आहे. परंतु त्याला कधीच अशी हिंदुत्वाची झालर नव्हती. समस्त श्रीराम भक्त कोल्हापूर असे सांगून उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ‘रामराज्य आणूया... प्रत्येक घरावर भगवा फडकवू या,’ असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा