शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोल्हापूर : आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:58 IST

आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या हिंसा रोखण्यासाठी नवा कायदा करण्यात यावा. वंचित भटक्या समाजाला आरोग्य सेवा मिळाव्यात, अशा विविध मागण्या शुक्रवारी राज्य महिला आरोग्य हक्क परिषदेत करण्यात आल्या. महिलांच्या आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आदी प्रश्नांवर विचारमंथन होत असलेल्या या परिषदेचा  शनिवारी समारोप होणार आहे.

ठळक मुद्देआंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावामहिला आरोग्य हक्क परिषदेत विविध मागण्या; शनिवारी समारोप

कोल्हापूर : आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या हिंसा रोखण्यासाठी नवा कायदा करण्यात यावा. वंचित भटक्या समाजाला आरोग्य सेवा मिळाव्यात, अशा विविध मागण्या शुक्रवारी राज्य महिला आरोग्य हक्क परिषदेत करण्यात आल्या. महिलांच्या आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आदी प्रश्नांवर विचारमंथन होत असलेल्या या परिषदेचा  शनिवारी समारोप होणार आहे.शिवाजी विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीतर्फे आयोजित विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहात राज्य महिला आरोग्य हक्क परिषद होत आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात ‘धर्म, जाती आधारित उन्मादाचे अस्वस्थ वर्तमान आणि महिलांवर होणारे परिणाम’ याविषयावरील सत्राने झाली. त्यामध्ये अग्रणी सोशल फौंडेशनच्या रिटा माने यांनी भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मांडला.

भारतीय महिला फेडरेशनच्या वसुधा कल्याणकर यांनी औरंगाबाद येथील दंगलीमध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळावी, अशी मागणी केली. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते रवि देसाई यांनी शासनाने महिला धोरणामध्ये आरोग्यविषयक हक्काचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सर्वसमावेशक संस्थेच्या शैला यादव यांनी भटक्या विमुक्त समाजाबाबतचा भेदभाव शासनाने दूर करावा. रोजगार हमी योजनेमध्ये या समाजाचा समावेश करण्याची मागणी केली. शब्बीर कलेगार यांनी अल्पसंख्यांक समाजातील महिलांच्या प्रश्नांची मांडणी केली.

यानंतर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे वास्तव, वेश्या व्यवसायातील महिला आणि आरोग्य अधिकार, दिव्यांग महिला, एचआयव्हीची लागण असणाऱ्यां गरोदर स्त्रियांना आरोग्य व्यवस्थेत मिळणारी भेदभावाची वागणूक, विषमता मूलक आर्थिक धोरण आदी विषयांवर चर्चा झाली.परिषदेतील या सत्रांवेळी ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या मनीषा गुप्ते, संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) जनरल सेक्रेटरी मीना शेषू, अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील, तनुजा शिपूरकर, अनुराधा भोसले, स्मिता पानसरे, सुमन पुजारी, विभुती पटेल, शुभदा देशमुख, लता भिसे, आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. परिषदेच्या समन्वयक काजल जैन यांनी सूत्रसंचालन केले.

‘आसमा’ला अश्रू अनावरआंतरधर्मिय विवाह करणाऱ्या ‘आसमा’ यांनी पहिल्या सत्रावेळी अनुभवकथन केले. माझ्या आई-वडीलांनी हा विवाह अजूनही मान्य केलेला नसल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावर सभागृहातील उपस्थित देखील गहिवरले. पुणे येथील इकोनेट संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्याद्वारे आंतरजातीय, धर्मियविवाहाबाबतची समाजातील वातावरण, होणारा हिंसाचार यावर प्रकाशझोत टाकला. 

 

टॅग्स :WomenमहिलाShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर