शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

कोल्हापूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य प्रेरणादायी : महापौर यवलुजे; हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:43 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध आझाद हिंद सेनेच्या वतीने उभा केलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासात नोंद झालेला फार मोठा लढा आहे. नेताजींचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणल्यास भारत निश्चितच महासत्ता होईल, असा विश्वास महापौर स्वाती यवलुजे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देनेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य प्रेरणादायी : महापौर यवलुजेविविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ‘हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थे’चे पदाधिकारी उपस्थित हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन

कोल्हापूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध आझाद हिंद सेनेच्या वतीने उभा केलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासात नोंद झालेला फार मोठा लढा आहे. नेताजींचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणल्यास भारत निश्चितच महासत्ता होईल, असा विश्वास महापौर स्वाती यवलुजे यांनी व्यक्त केला.नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (मिरजकर तिकटी) येथे मंगळवारी सकाळी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने नेताजींच्या १२१ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.याप्रसंगी महापौर स्वाती यवलुजे आणि ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तिपर गीतांनी वातावरण देशप्रेमाने भारून गेले होते. कार्यक्रमाप्रसंगी ‘अमर रहे... अमर रहे... सुभाषबाबू अमर रहे...’ ‘इन्कलाब जिंदाबाद,’ ‘आझाद हिंद सेनेचा विजय असो,’ ‘क्रांतिकारकांचा विजय असो,’ अशा घोषणांनी चौकाचा परिसर दणाणून गेला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा क्रांती संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी नेताजींच्या कार्याचा आढावा घेऊन नेताजींच्या कार्याच्या स्मृती जागविल्या. संस्थेचे सेक्रेटरी पद्माकर कापसे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष मधुकर रामाणे यांनी क्रांतिकारकांच्या स्मृती सदैव आठवणीत राहाव्यात, यासाठी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था नेहमीच अग्रभागी राहील, असे सांगून मनोगत व्यक्त केले.

हुतात्मा क्रांती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किसनराव कल्याणकर यांनी सुभाषचंद्र बोस चौक असे नामफलक महापालिकेने त्वरित उभा करावेत, अशी मागणी केली.

यावेळी उपमहापौर सुनील पाटील, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, बाबूराव चव्हाण, अजित सासने, सुरेश पोवार, अनिल कोळेकर, किशोर घाटगे, संभाजी साळुंखे, अशोक पोवार, महेश उरसाल, जयकुमार शिंदे, राहुल चौधरी, प्रशांत बरगे, श्रीकांत मनोळे, गुरुदत्त म्हाडगुत, बाबा सावंत, शंकरराव शेळके, सचिन मंत्री, सुमित खानविलकर यांच्यासह भागातील व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त विनय पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे नेताजी जयंती उत्साहातशिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक विनय पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी उदय अतकिरे, लालासाहेब गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, राजेंद्र राऊत, शिवाजी पोवार, प्रदीप साळोखे, शिरीष पाटील, बॉबी राऊत, नंदू साळोखे, संतोष राऊत, अजिंक्य साळोखे, रवींद्र राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस