शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतीची पुर्नरचना गरजेची : मुणगेकर, क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:44 IST

सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण सुरु आहे. कायमस्वरुपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी सारख्या निर्णय, जीएसटीची चांगल्या अमंलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पूर्नरचना करणे गरजे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

ठळक मुद्दे‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यानजेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांची ९८ वी जयंतीताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला

कोल्हापूर : सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण सुरु आहे. कायमस्वरुपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी सारख्या निर्णय, जीएसटीची चांगल्या अमंलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पूर्नरचना करणे गरजे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.डॉ.व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने जेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालात ‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ.पाटील होते.

    ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने जेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त प्रथमच क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी झालेल्या व्याख्यान मालेत विद्यार्थीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)

    डॉ. मुणगेकर म्हणाले, गेली दहा वर्षाचा विचार करता गेल्या चार वर्षात विकासचा दर कमी झाला आहे. यांचे एक कारण म्हणजे नोटबंदी होय. नोटबंदी मुळे भारतामधील अर्थव्यवस्था सहा ते सात महिने ठप्प झाला.

    काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटाना आळा घालणे आणि अतिरेकीच्या कारवाई रोखणे या उद्देशाने नोट बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र पैकी कोणतेही एकही कारण या निर्णयामुळे साध्य झाले नाही. जी.एस.टी हा सर्वांत चांगला निर्णय आहे. मात्र त्यांची अमंलबजावणी व्यवस्थित केली गेली नाही.गेली तीन - चार वर्षात रोजगाराची चर्चा केली जात नाहा. मोठ्या रोजगारामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते मात्र,रोजगार निर्मिती होत नाही. लहान - लहान उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होती. त्याला उभारी देणे गजेचे आहे. विरोध पक्षांनी सत्ताधार्याच्यावर अंकूश ठेवणे गरजेचे आहे. असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितेल.याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रस्ताविक केले. एस. डी. चव्हाण यांनी आभार तर प्रा. तेजस्विनी मुडेकर स्वागत व सूत्रसंचलन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस.एन. पोवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश हिलगे, उपाध्यक्ष अशोक पर्वते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    गुजरातची कॉलनी बनेल....मुंबई - अहमदाबाद ही बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे. ही ट्रेन फक्त गुजरात मधील व्यापार्यांच्या सोईसाठी ही जर सुरु झाली तर महाराष्ट्र गुजरातमधील एक कॉलनी होऊन बसेल. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काहीच बोलत नाहीत.

    डॉ. मुणगेकर म्हणाले......

    1. - फळावर प्रक्रिया करणे गरजेचे
    2. शिक्षणाचे खासगीकरण धोकादायक
    3.  कामयस्वरुपी रोजगार हमी पाहिजे
    4.  महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे 

     

    टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक