शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कोल्हापूर : शेतीची पुर्नरचना गरजेची : मुणगेकर, क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:44 IST

सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण सुरु आहे. कायमस्वरुपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी सारख्या निर्णय, जीएसटीची चांगल्या अमंलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पूर्नरचना करणे गरजे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

ठळक मुद्दे‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यानजेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांची ९८ वी जयंतीताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला

कोल्हापूर : सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण सुरु आहे. कायमस्वरुपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी सारख्या निर्णय, जीएसटीची चांगल्या अमंलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पूर्नरचना करणे गरजे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.डॉ.व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने जेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालात ‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ.पाटील होते.

    ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने जेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त प्रथमच क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी झालेल्या व्याख्यान मालेत विद्यार्थीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)

    डॉ. मुणगेकर म्हणाले, गेली दहा वर्षाचा विचार करता गेल्या चार वर्षात विकासचा दर कमी झाला आहे. यांचे एक कारण म्हणजे नोटबंदी होय. नोटबंदी मुळे भारतामधील अर्थव्यवस्था सहा ते सात महिने ठप्प झाला.

    काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटाना आळा घालणे आणि अतिरेकीच्या कारवाई रोखणे या उद्देशाने नोट बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र पैकी कोणतेही एकही कारण या निर्णयामुळे साध्य झाले नाही. जी.एस.टी हा सर्वांत चांगला निर्णय आहे. मात्र त्यांची अमंलबजावणी व्यवस्थित केली गेली नाही.गेली तीन - चार वर्षात रोजगाराची चर्चा केली जात नाहा. मोठ्या रोजगारामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते मात्र,रोजगार निर्मिती होत नाही. लहान - लहान उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होती. त्याला उभारी देणे गजेचे आहे. विरोध पक्षांनी सत्ताधार्याच्यावर अंकूश ठेवणे गरजेचे आहे. असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितेल.याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रस्ताविक केले. एस. डी. चव्हाण यांनी आभार तर प्रा. तेजस्विनी मुडेकर स्वागत व सूत्रसंचलन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस.एन. पोवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश हिलगे, उपाध्यक्ष अशोक पर्वते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    गुजरातची कॉलनी बनेल....मुंबई - अहमदाबाद ही बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे. ही ट्रेन फक्त गुजरात मधील व्यापार्यांच्या सोईसाठी ही जर सुरु झाली तर महाराष्ट्र गुजरातमधील एक कॉलनी होऊन बसेल. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काहीच बोलत नाहीत.

    डॉ. मुणगेकर म्हणाले......

    1. - फळावर प्रक्रिया करणे गरजेचे
    2. शिक्षणाचे खासगीकरण धोकादायक
    3.  कामयस्वरुपी रोजगार हमी पाहिजे
    4.  महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे 

     

    टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक