शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चित्रनगरीकडील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:25 IST

आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देचित्रनगरीकडील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची गरजइंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

कोल्हापूर : आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.आर. के.नगरकडून भारती विद्यापीठ आणि के. आय. टी. कॉलेजला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी या परिसरात ये-जा करीत असतात; तर या बाजूने हायवेलाही जाता येत असल्याने तीदेखील वाहतूक आता वाढली आहे.कंदलगाव कमान ते चित्रनगरीशेजारून जाणारा रस्ता हा एकेरी मार्ग आहे. त्यामुळे समोरून एखादा टेम्पो जरी आला तरी दुचाकी रस्त्यावरून खाली घ्यावी लागते. रस्त्याच्या काटाळ्या भरून न घेतल्याने गाडी खाली घेताना आणि पुन्हा रस्त्यावर आणताना नेहमी या ठिकाणी अपघात होत असतात.येथून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात; त्यामुळे अनेकदा समोरासमोरही अपघातांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळेच या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. यासाठी केवळ पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र हा निधी अपुरा असल्याने या संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यामधून होणे शक्य नाही.आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, त्यांचे पालक यांमुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. एका बाजूला चित्रनगरीची भिंत असल्यानेही या कडेने वाहने चालविताना अतिशय दक्षता घ्यावी लागते. यावर उपाय म्हणून विरोधी बाजूचे रुंदीकरण करून भराव टाकून घेण्याची गरज आहे.

पालकांचा जीव टांगणीलारस्त्याची ही अवस्था असल्याने या ठिकाणी कॉलेजला जाणाºया मुलामुलींच्या पालकांचा जीव दिवसभर टांगणीला लागलेला असतो. संध्याकाळी मुले घरी येईपर्यंत पालकांच्या जिवात जीव नसतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने निधी वाढवून या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

‘केआयटी’कडील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच लाखचित्रनगरी ते केआयटी कॉलेज या ३०० मीटरच्या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी या रस्त्यावरून गाडी चालविण्यापेक्षा रस्त्याच्या कडेने गाडी चालविणे पसंत करतात. मात्र यंदा जिल्हा परिषदेने यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम याच दोन दिवसांत सुरू होण्याची गरज असून ते दर्जेदार झाल्यास विद्यार्थ्यांसाठी हिताचे ठरणार आहे.

 

शहराबाहेर जाणाऱ्या या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकही जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा करीत असलेला वापर यांचा विचार करता या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण आवश्यक आहे. या रस्त्यावरून आमची मुले गाड्या घेऊन जातात. मात्र रस्त्याची अवस्था पाहून त्यांच्या हातात गाडी देण्यासाठीही मन धजावत नाही. रस्ता रुंदीकरण लवकर करणे आवश्यक आहे.विनायक कुलकर्णीपालक

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदroad transportरस्ते वाहतूक