शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 17:35 IST

राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्दे‘राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलनग्रामविकास विभागाची पदभरती थांबविण्याचा निर्णय दहा दिवसांत

कोल्हापूर : राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.कर्मचाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी २१ एप्रिल २०१८ रोजी बैठक घेऊन सकारात्मक आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता न केल्याबद्दल ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्रिसदस्यीय समिती स्थापण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल. त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेता येईल.

पहिली बैठक घेऊन त्यामध्ये एन. एच. एम.अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांच्या समायोजनाच्या दृष्टीने आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभागाची पदभरती थांबविण्याचा निर्णय दहा दिवसांत घेण्यात येईल.समिती स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत एन. एच. एम.अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांच्या आर. आर.मध्ये बदल करून समायोजन करण्यात येईल, अशी सकारात्मक आश्वासने आरोग्यमंत्र्यांनी दिली होती.त्यामुळे यापूर्वीचे आंदोलन स्थागित करण्यात आले होते; परंतु दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गोसावी, राजकिरण सावडकर, नजिया खान, पूनम चौगले, अलका महाडिक, राणी रजपूत, कौसर बांदर, गौरी कुरुंदवाडे, संदीप पाटील, आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर