शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोल्हापूर महापालिकेचा प्रवास खडतरच! । उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष; इतर कामांवर खर्च; शासनाच्या निधीवर डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:57 IST

विनोद सावंत । कोल्हापूर : महापालिका आज, रविवारी ४७ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महापालिकेचा प्रवास ...

ठळक मुद्दे महत्त्वाची पदे रिक्त

विनोद सावंत ।कोल्हापूर : महापालिका आज, रविवारी ४७ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महापालिकेचा प्रवास खडतर आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने तिला डोलारा सांभाळण्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागत आहे. या स्थितीला प्रशासन, सत्ताधारीच जबाबदार असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उत्पन्नवाढीकडे केलेले दुर्लक्ष आणि मूलभूत सुविधांऐवजी इतर कामांकडेच केलेला अतिरिक्त खर्च हे कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने महापालिकेला स्वनिधीतून ही सर्व कामे करावी लागतात. ५० वर्षांकडे वाटचाल करणाºया महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. उजकात, एलबीटी बंद झाल्यानंतर महापालिकेची खºया अर्थाने आर्थिक कोंडी होण्यास सुरुवात झाली. सध्या घरफाळा हा एकमेव उत्पन्नाचे स्रोत राहिला आहे. शासनाकडून दरमहा मिळणाºया जी.एस.टी.च्या परताव्यावरच महापालिकेचा डोलारा अवलंबून आहे. जी.एस.टी.च्या परताव्याला उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगाराला विलंब होत आहे.

महापालिकेकडून दरवर्षी फेब्रुवारीमध्ये बजेट सादर केले जाते. ५०० कोटींचे बजेट फुगवून १३०० कोटींवर नेले आहे. त्यामुळे वास्तवात कधीही बजेटप्रमाणे कामे होत नाहीत. परिणामी, दरवर्षीच बजेट कागदावरच राहते. अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली होऊन तीन वर्षे झाली तरी उपायुक्तपद रिक्त आहे. वर्ग एकमधील अशी १० पदे रिक्त आहेत; त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर महापालिकेचा गाडा चालवायचा कसा, असा सवाल कार्यरत असणाºया अधिकाºयांसमोर आहे. ही पदे भरण्यासाठी प्रशासनासह राजकीय नेत्यांनी फारसे लक्ष दिले नाही.

खर्च वाढला, उत्पन्न घटलेनगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन ५० वर्षे होत आली तरी आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी ढासळत चाललेली आहे. प्रशासनाने भविष्याचा वेध घेऊन उत्पन्नाची साधने वाढविली नाहीत. इस्टेट. नगररचना, घरफाळा विभागातून सुमोर १00 कोटींची तूट आली आहे. या उलट पाचव्या, सहाव्या वेतन आयोगांमुळे आस्थापनावरील खर्च ५७ टक्क्यांवर गेला. उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. किंबहुना उत्पन्नात घटच होत गेली.

पगार झाला, विषय संपलाकर्मचारी, अधिकारीही महापालिकेच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन ते तीन वर्षांनंतर बदली होत असल्यामुळे त्यांच्याकडून कोल्हापूरच्या विकासासह महापालिकेच्या उत्पन्नवाढीकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. ‘महिन्याचा पगार झाला, विषय संपला,’ अशी त्यांची वृत्तीच महापालिकेच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे.

नेत्यांना फक्त सत्तेशी मतलब!महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर १५ ते २० वर्षे जे पदाधिकारी होते, त्यांनी महापालिकेचे हिताचे निर्णय घेतले. स्वत:चे पैसे खर्च करून नागरिकांची कामे केली. यानंतर मात्र, काही नेत्यांनी केवळ सत्ता मिळविण्यासाठी महापालिकेचा पद्धतशीर उपयोग केला. नाराजी टाळण्यासाठी महापौरपदाची खंडोळी केली. काळम्मावाडी थेट पाईपलाईनला आणलेला निधी, टोलसाठी दिलेले ४८० कोटी वगळता नवीन कोणतेच प्रकल्प आले नाहीत. वास्तविक केंद्रात आणि राज्यात राजकीय ताकद वापरून कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज आणणे शक्य होते. मात्र, श्रेयवादामुळे त्यांनी हे पद्धतशीर टाळले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका