शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अमृत योजनेची कामे पूर्ण करण्यास कोल्हापूर महापालिकेची नकारघंटा

By भारत चव्हाण | Updated: December 23, 2023 12:12 IST

अशी ही कामाची विचित्र पद्धत

भारत चव्हाण कोल्हापूर : अमृत योजनेतून सुरू असलेली पाणीपुरवठा, तसेच ड्रेनेज विभागाची कामे रखडण्यास जसा ठेकेदार जबाबदार आहे, तशी महापालिकेची यंत्रणाही तितकीच जबाबदारी असल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंत पालिकेची यंत्रणा ठेकेदाराकडे बोट दाखवून ‘तो’ काम करत नसल्याचा दावा करत होती, पण ठेकेदाराला कामे करण्यास असहकार्य करायचे आणि मुदतही वाढवून देण्यास टाळाटाळ करायची, अशी नकारात्मक घंटा वाजविण्याचे काम पालिकेच्या प्रशासन करत असल्याची टीका होत आहे.कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत २०१७ पासून अमृत योजनेतील कामे सुरू आहेत. शहरात विविध ठिकाणी जलवाहिनी, ड्रेनेज लाइन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे अशी कामे योजनेतून सुरू आहेत. या कामांचा अनुभव फारच वाईट असल्याने त्यावर भरपूर टीका झाली. महापालिका अधिकाऱ्यांनी या अपूर्ण कामाचे खापर ठेकेदाराच्या माथी फोडले. ठेकेदाराचा उद्दामपणा नडत असल्याचा आभास निर्माण केला, परंतु ठेकेदारासह महापालिका यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याची बाब समोर येत आहे.याबाबतची माहिती घेतली असता, पालिकेच्या कर्तव्यातील कसुरीही समोर आली. योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यापासून नगरसेवकांचा हस्तक्षेप, कामे करण्यासाठी लागणाऱ्या जागा तत्काळ उपलब्ध करून देण्याबरोबरच आलेल्या अडचणी दूर करण्याची जबाबदारी पालिकेची होती, पण या अडचणी सोडवून काम करण्यास योग्य वातावरण तयार केले नाही. रस्ते खुदाईला, तसेच काही शेतकऱ्यांकडून काम करण्यास विरोध झाला. त्यातही हस्तक्षेप करण्यात आला नाही. पाण्याच्या टाक्या, एसटीपी उभारण्यास जागा उपलब्ध करून दिली नाही.कोरोना, महापूर यांसारख्या अनेक अडचणी समोर असल्याने काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे ठेकेदाराने वेळोवेळी मुदतवाढ मागण्याचा प्रयत्न केला, परंतु पंधरा महिने झाले, तरी मुदतवाढ दिली नाही. मुदत वाढवून दिली नाही म्हटल्यावर ठेकेदाराने काम करण्याचे थांबविले. या काळात त्याची बिले दिली, पण मुदतवाढ दिली नाही.

अशी ही कामाची विचित्र पद्धतड्रेनेजची कामे करण्यास २०१७ पासून दोन वेळा मुदतवाढ दिली. ही मुदत ३०-०९-२०२१ पर्यंत होती. तिसरी मुदतवाढ ३१-१२-२०२२ पर्यंत दिली. त्यानंतर, काम थांबले, मुदतवाढ मागितली, तरीही अद्याप दिलेली नाही. अशीच परिस्थिती पाणीपुरवठ्याबाबतची आहे. २०१८ मध्ये काम सुरू झाले. त्याची मुदत २०२० मध्ये संपली. त्यानंतर, पंधरा महिन्यांनी मुदत वाढवून दिली, तीही दंडाची आकारणी करूनच दिली. मार्च, २०२३ पासून मात्र आजपर्यंत या कामांना मुदतवाढ दिलेली नाही. एकीकडे अडचणी दूर करायच्या नाहीत, कामात विलंब झाल्यानंतर मुदतवाढ द्यायची नाही, यामुळे ठेकेदार काम करायचे की नाही, या संभ्रमात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर