शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

एलबीटी चार वर्षांपूर्वीच बंद, कर्मचाऱ्यांना पगार सुरुच; कोल्हापूर महापालिकेचा आंधळा कारभार

By भारत चव्हाण | Updated: September 16, 2022 12:10 IST

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत.

भारत चव्हाण

कोल्हापूर : ‘महानगरपालिकेचे काम आणि सहा महिने थांब’ ही प्रतिमा बदलण्याचा प्रशासक कादंबरी बलकवडे या सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे अवलोकन केले जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी अनावश्यक कर्मचारी, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एलबीटी बंद होऊन चार वर्षे झाली तरीही या विभागातील ३० पेक्षा अधिक कर्मचारी केवळ बसून पगार घेत आहेत.

एलबीटीची जुनी वसुली अद्याप प्रलंबित आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटीचे स्वयंमूल्यांकन करायचे होते. त्याच्या सुनावण्या घेऊन कर निश्चिती करायची कामे बाकी आहेत. पण ही कामे किती वर्षे सुरू राहणार, हाच प्रश्न आहे. तेथील कर्मचारी जेवढा पगार घेतात तेवढीही वसुली त्यांच्याकडून होत नाही.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. नगरसेवक, युनियन पदाधिकारी यांचे वशिले लावले गेल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करणेही जिकिरीचे झाले आहे. वरिष्ठ अधिकारी चतुर्थश्रेणी, लिपिक यांच्या कामकाजात फारसे लक्ष घालत नाहीत. त्यांना तेवढा वेळही मिळत नाही. हीच संधी साधून अनेकांनी वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडले आहे.

विभागांचा आढावा आवश्यक

महानगरपालिकेची कोणतीच यंत्रणा विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेताना दिसत नाही. प्रशासनात कोणत्या विभागात जास्त कर्मचारी आहेत, कोणत्या विभागात कर्मचारी कमी आहेत, याचे अवलोकन केले जात नाही. त्यामुळे काही विभाग कमी कर्मचाऱ्यांवरही काम करत आहेत आणि काही विभागात कर्मचारी जास्त असल्याने निवांत बसून दिवस काढत जात आहेत. काही शिपाई एक विभागातून दुसऱ्या विभागात फाईल घेऊन जातानासुध्दा केवढे कष्ट पडत असल्याचा आव चेहऱ्यावर आणत असतात.

घरफाळा विभागात कर्मचारी कमी

घरफाळा हा सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याच्या सतत तक्रारी होत आहेत. परंतु ज्या विभागाकडून आता फारसे काम उरलेले नाही, अशा एलबीटी विभागात मात्र तीसहून अधिक कर्मचारी बसून आहेत. एलबीटी बंद होऊन चार ते पाच वर्षे होऊन गेली. त्यामुळे तेथे आता फारसे काम राहिलेले नाही. तरीही त्या विभागाकडे वरिष्ठांचे लक्ष नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर