शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

एलबीटी चार वर्षांपूर्वीच बंद, कर्मचाऱ्यांना पगार सुरुच; कोल्हापूर महापालिकेचा आंधळा कारभार

By भारत चव्हाण | Updated: September 16, 2022 12:10 IST

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत.

भारत चव्हाण

कोल्हापूर : ‘महानगरपालिकेचे काम आणि सहा महिने थांब’ ही प्रतिमा बदलण्याचा प्रशासक कादंबरी बलकवडे या सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे अवलोकन केले जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी अनावश्यक कर्मचारी, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एलबीटी बंद होऊन चार वर्षे झाली तरीही या विभागातील ३० पेक्षा अधिक कर्मचारी केवळ बसून पगार घेत आहेत.

एलबीटीची जुनी वसुली अद्याप प्रलंबित आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटीचे स्वयंमूल्यांकन करायचे होते. त्याच्या सुनावण्या घेऊन कर निश्चिती करायची कामे बाकी आहेत. पण ही कामे किती वर्षे सुरू राहणार, हाच प्रश्न आहे. तेथील कर्मचारी जेवढा पगार घेतात तेवढीही वसुली त्यांच्याकडून होत नाही.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. नगरसेवक, युनियन पदाधिकारी यांचे वशिले लावले गेल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करणेही जिकिरीचे झाले आहे. वरिष्ठ अधिकारी चतुर्थश्रेणी, लिपिक यांच्या कामकाजात फारसे लक्ष घालत नाहीत. त्यांना तेवढा वेळही मिळत नाही. हीच संधी साधून अनेकांनी वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडले आहे.

विभागांचा आढावा आवश्यक

महानगरपालिकेची कोणतीच यंत्रणा विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेताना दिसत नाही. प्रशासनात कोणत्या विभागात जास्त कर्मचारी आहेत, कोणत्या विभागात कर्मचारी कमी आहेत, याचे अवलोकन केले जात नाही. त्यामुळे काही विभाग कमी कर्मचाऱ्यांवरही काम करत आहेत आणि काही विभागात कर्मचारी जास्त असल्याने निवांत बसून दिवस काढत जात आहेत. काही शिपाई एक विभागातून दुसऱ्या विभागात फाईल घेऊन जातानासुध्दा केवढे कष्ट पडत असल्याचा आव चेहऱ्यावर आणत असतात.

घरफाळा विभागात कर्मचारी कमी

घरफाळा हा सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याच्या सतत तक्रारी होत आहेत. परंतु ज्या विभागाकडून आता फारसे काम उरलेले नाही, अशा एलबीटी विभागात मात्र तीसहून अधिक कर्मचारी बसून आहेत. एलबीटी बंद होऊन चार ते पाच वर्षे होऊन गेली. त्यामुळे तेथे आता फारसे काम राहिलेले नाही. तरीही त्या विभागाकडे वरिष्ठांचे लक्ष नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर