शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी चार वर्षांपूर्वीच बंद, कर्मचाऱ्यांना पगार सुरुच; कोल्हापूर महापालिकेचा आंधळा कारभार

By भारत चव्हाण | Updated: September 16, 2022 12:10 IST

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत.

भारत चव्हाण

कोल्हापूर : ‘महानगरपालिकेचे काम आणि सहा महिने थांब’ ही प्रतिमा बदलण्याचा प्रशासक कादंबरी बलकवडे या सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे अवलोकन केले जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी अनावश्यक कर्मचारी, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एलबीटी बंद होऊन चार वर्षे झाली तरीही या विभागातील ३० पेक्षा अधिक कर्मचारी केवळ बसून पगार घेत आहेत.

एलबीटीची जुनी वसुली अद्याप प्रलंबित आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटीचे स्वयंमूल्यांकन करायचे होते. त्याच्या सुनावण्या घेऊन कर निश्चिती करायची कामे बाकी आहेत. पण ही कामे किती वर्षे सुरू राहणार, हाच प्रश्न आहे. तेथील कर्मचारी जेवढा पगार घेतात तेवढीही वसुली त्यांच्याकडून होत नाही.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. नगरसेवक, युनियन पदाधिकारी यांचे वशिले लावले गेल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करणेही जिकिरीचे झाले आहे. वरिष्ठ अधिकारी चतुर्थश्रेणी, लिपिक यांच्या कामकाजात फारसे लक्ष घालत नाहीत. त्यांना तेवढा वेळही मिळत नाही. हीच संधी साधून अनेकांनी वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडले आहे.

विभागांचा आढावा आवश्यक

महानगरपालिकेची कोणतीच यंत्रणा विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेताना दिसत नाही. प्रशासनात कोणत्या विभागात जास्त कर्मचारी आहेत, कोणत्या विभागात कर्मचारी कमी आहेत, याचे अवलोकन केले जात नाही. त्यामुळे काही विभाग कमी कर्मचाऱ्यांवरही काम करत आहेत आणि काही विभागात कर्मचारी जास्त असल्याने निवांत बसून दिवस काढत जात आहेत. काही शिपाई एक विभागातून दुसऱ्या विभागात फाईल घेऊन जातानासुध्दा केवढे कष्ट पडत असल्याचा आव चेहऱ्यावर आणत असतात.

घरफाळा विभागात कर्मचारी कमी

घरफाळा हा सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याच्या सतत तक्रारी होत आहेत. परंतु ज्या विभागाकडून आता फारसे काम उरलेले नाही, अशा एलबीटी विभागात मात्र तीसहून अधिक कर्मचारी बसून आहेत. एलबीटी बंद होऊन चार ते पाच वर्षे होऊन गेली. त्यामुळे तेथे आता फारसे काम राहिलेले नाही. तरीही त्या विभागाकडे वरिष्ठांचे लक्ष नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर