शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

शहराच्या पर्यावरणाकडे कोल्हापूर महापालिकेची आठ वर्षांपासून पाठ

By संदीप आडनाईक | Updated: January 11, 2025 15:55 IST

संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक : मधुकर बाचूळकर

संदीप आडनाईककोल्हापूर : पर्यावरण संरक्षण कायदा आणि मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमांतर्गत दरवर्षी महानगरपालिकेस पर्यावरण स्थिती अहवाल (ईएसआर) प्रकाशित करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. असे असतानाही कोल्हापूर महानगरपालिकेने गेली आठ वर्षे पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल तयारच केलेला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेला पर्यावरणाचे वावडे आहे का ? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींमधून उपस्थित होत आहे.टेरी या संस्थेने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी २०१६ मध्ये शेवटचा पर्यावरण स्थिती अहवाल तयार केला होता. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नुकत्याच झालेल्या कोल्हापूर भेटीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर भेटीदरम्यान त्यांनी पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती, हे विशेष. संबंधित अहवाल तयार करण्यास आठ वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल म्हणजे काय?शहर पातळीवरील पर्यावरणविषयक समस्या आणि संधी ओळखण्यात मदत करण्यासाठी हा एक सर्वसमावेशक दस्तऐवज मानला जातो. लोकसंख्या, शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक आणि नागरिकांचे आरोग्य तसेच सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांना ओळखून अशा घटकांच्या निराकरणासाठी पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल महत्त्वाचा असतो. हा अहवाल शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण धोरण तयार करण्यासाठी आणि कृती आराखडा तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यास मदत करतो. ७४व्या घटनादुरुस्ती कायदा १९९२ नुसार पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल तयार करणे अनिवार्य आहे. सी.ए.ए.च्या बाराव्या शेड्युलमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणीय पैलूंचा प्रचार यांसह अनेक कार्ये समाविष्ट आहेत.माहिती देण्यासाठी लागले आठ दिवसगडहिंग्लज येथील प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींच्या विरोधातील जनहित याचिकाकर्ते श्रीकांत कुंभार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ तपासले असता त्यांना पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल आढळले नाहीत. त्यामुळे त्यांनी २४ डिसेंबर रोजी माहिती अधिकारांतर्गत महानगरपालिकेकडे माहिती मागितली असता आठ दिवस शोधाशोध करून पर्यावरण अधिकाऱ्यांनी ३० डिसेंबरला लेखी पत्राद्वारे अहवाल उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर पर्यावरण अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी ही गंभीर प्रकार उघडकीस आणला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण