शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कोल्हापूर मनपाला फेरनिवडणूक परवडणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:29 IST

कोल्हापूर : जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत निवडणूक आयोगास सादर न केलेल्या नगरसेवकांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, १९ प्रभागांत फेरनिवडणुका घेणे केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सर्वच बाजूंनी विचार केल्यास कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणेस परवडणारे नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महापालिकेची निवडणूक घेणे गैरसोईचे असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ...

कोल्हापूर : जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत निवडणूक आयोगास सादर न केलेल्या नगरसेवकांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, १९ प्रभागांत फेरनिवडणुका घेणे केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सर्वच बाजूंनी विचार केल्यास कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणेस परवडणारे नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महापालिकेची निवडणूक घेणे गैरसोईचे असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मनपाचे अधिकारी अंगावरील धूळ झटकून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यामुळे आता वकिलांचा अभिप्राय, राज्य सरकारचा आदेश काय येतो याकडे डोळे लावून बसले आहेत.राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्यांच्या जातीची वैधता प्रमाणपत्रे निवडणूक आयोगास सादर केलेली नव्हती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर ज्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केलेले नाही, त्यांचे नगरसेवकपद रद्द होणार हे आता स्पष्ट झाले आहे. राज्य सरकार अथवा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी लोकप्रतिनिधींना संरक्षण देणे कितपत शक्य आहे, यावर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राज्य सरकारचे अधिकार यावर बरीच चर्चा झाली. कायदेतज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू आहेत. राज्य सरकारचे सचिव स्तरावरील अधिकारी कायद्याचा अभ्यास करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या ‘कलम ९ अ’मध्ये बदल अथवा सुधारणा करता येईल का ? आणि कशाप्रकारे करता येईल या अनुषंगाने चर्चा करत आहेत.निवडणूक घेण्याची वेळ आलीच, तर आपण तयार असले पाहिजे, म्हणून महापालिकेचे अधिकारी धूळ झटकून कामाला लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील महापालिकेचे वकील अभिजित आडगुळे यांच्याशी संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि त्यावरील अभिप्राय देण्याविषयी विनंती केली आहे; परंतु अद्याप निकालाची प्रत हाती पडलेली नाही. अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या निवडणूक कार्यालय तसेच नगरसचिव कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. निवडणूक घ्यावीच लागली, तर पूर्वतयारी कशी करावी यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.जर शहरातील १९ प्रभागांत निवडणूक लागलीच, तर ती परवडणारी नाही, असाच बहुतेकांचा दावा आहे. प्रशासनाच्या पातळीवर विचार केला, तर तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेची निवडणूक घेण्यास नेहमी महसूलच्या कर्मचाºयांचे सहकार्य घेतले जाते. सध्या हेच कर्मचारी मतदार याद्यांच्या तयारीत असताना महापालिका निवडणूक घ्यायची म्हटले तर खूपच गडबड होणार आहे.निवडणूक लढविणाºया इच्छुकांचीही ती एक डोकेदुखी होणार आहे; कारण गणेशोत्सव व नवरात्रौत्सव पुढच्या एक-दीड महिन्यात येत आहेत; त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी मोठी वर्गणी द्यावी लागणार आहे.म्हणूनच प्रशासनास जशा अडचणी आहेत, तशाच त्या इच्छुकांनाही आहेत. इच्छुकांनी जरी मोठा खर्च केला, तरी त्यांना काम करण्यास केवळ एक ते दीड वर्षच मिळणार आहे.महापालिका निवडणूक झाली खर्चिकमहापालिकेची निवडणूक अलीकडील काही वर्षांत खूपच खर्चिक झालेली आहे. उमेदवाराच्या हातात २० ते २५ लाख रुपयांचा निधी असल्याखेरीज राजकीय पक्षदेखील पक्षाचे तिकीट देत नाहीत. विद्यमान सभागृहात काही नगरसेवक तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करून निवडून आले आहेत. महापालिकेची निवडणूक लागलीच आणि प्रत्येक प्रभागात पहिल्या तीन उमेदवारांनी १० ते ३० लाखांच्या दरम्यान खर्च केला, तर एकेक प्रभागातच ५० ते ६० लाखांचा चुराडा होणार आहे; त्यामुळे विद्यमान नगरसेवक तसेच अन्य इच्छुकदेखील निवडणुकीला सामोरे जाण्यास नाखूश आहेत.सन २०१५मध्ये झालेला निवडणूक खर्चइतर खर्च- १ कोटी ९३ लाख ८८ हजार ५५९कर्मचारी भत्ते- ५ लाख ४८ हजारएकूण खर्च- १ कोटी ९८ लाख ३७ हजार ५९५संभाव्य निवडणूक खर्च२०१५ च्या निवडणुकीत प्रशासनाचा प्रत्येक प्रभागासाठी सरासरी २ लाख ४६ हजार१४२ रुपये खर्चया हिशेबाने संभाव्य निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागास २.५० ते ३लाख खर्च येईल.१९ प्रभागांसाठी एकूण खर्च५० ते ५५ लाख रुपये येईल, असा अंदाज आहे.