शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून अत्यावश्यक कामातही दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:59 IST

महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. पंचगंगा नदी प्रदुषणपश्नी एकीकडे राष्टÑीय हरित लवादाकडून फटके लगावले जात असतानासुध्दा प्रदुषण रोखण्याच्या कामात कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून निष्काळजीपणा दाखविला जात असून ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे.

ठळक मुद्देमहिन्यानंतरही पाईप जोडणीच्या कामाला सुरवात नाहीजयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगा थेट नदीत

कोल्हापूर : एक महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.

पंचगंगा नदी प्रदुषणपश्नी एकीकडे राष्टÑीय हरित लवादाकडून फटके लगावले जात असतानासुध्दा प्रदुषण रोखण्याच्या कामात प्रशासनाकडून निष्काळजीपणा दाखविला जात असून ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे.

शहरातील सर्व भागातील जयंती नाल्यातून वाहून येणारे सांडपाणी दसरा चौक येथील पंप अ‍ॅन्ड संप हाऊस येथे अडविण्यात येते. तेथून ते पाणी उपसा करुन कसबा बावडा येथील सांडपाणी शुध्दीकरण केंद्राकडे पाठविण्यात येते. उपसा केलेले सांडपाणी वाहून नेण्याकरीता संप अ‍ॅन्ड पंप हाऊस येथे पूर्वी २०० अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात आल्या होत्या. परंतू २०१४ मध्ये त्याची क्षमता वाढविण्यात आली. सध्या ४५० अश्वशक्तीच्या ४ मोटारी हे काम करत आहेत.

१३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्याला अक्षरश: उधाण आले होते. त्यावेळी पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने नाल्यातून जाणाºया तीन पाईप पैकी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. चुकीच्या पध्दतीने या पूलाचे डिझाईन केल्यामुळे कधी ना कधी तो कोसळणार याची अधिकाºयांना खात्री होतीच, तो १३ सप्टेंबरच्या पावसात कोसळला.

गेल्या महिन्याभरापासून हा पूल व पाईप कोसळलेल्या अवस्थेतच नाल्यात पडलेला आहे. त्यामुळे नाल्यातील सर्व मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यातून प्रदुषणाचा मात्र वाढत चालला असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.महिन्याभरात फक्त अंदाजपत्रकच

जयंती नाल्यातील मैलामिश्रीत सांडपाणी वाहून नेणारी पाईप पूलासह कोसळल्यानंतर त्याचे दुरुस्तीचे अथवा नवीन पूल बांधून पाईप जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र मनपा प्रशासनाने केवळ नवीन काम करताना कशा प्रकारे करावे आणि त्याला किती खर्च येऊ शकेल याचे अंदाजपत्रक तयार करुन घेतले.

सांगलीच्या वालचंद कॉलेजमधील तज्ज्ञांनी नवीन पूल बांधताना लोखंडी न करता कॉँक्रीटचे पिलर उभे करुन त्यावर ही पाईप जोडावी असा अभिप्राय दिला असून त्यांनी सुचविलेल्या पध्दतीप्रमाणे काम केल्यास त्याला २८ लाख रुपये खर्च येणार आहे.एक महिन्यात काम पूर्ण होणे अशक्य

ड्रेनेज विभागाकडील दुरुस्तीची कामे अत्यावश्यक सेवेत मोडतात. एक जयंती नाल्यात पाईप फुटून एक महिना झाला तरी प्रशासकीय पातळीवर कागदोपत्री कामाच्या जोडण्या करण्यात वेळ घालविला जात आहे. बुधवारी वालचंद्र कॉलेजच्या तज्ज्ञांचा अहवाल महापालिका प्रशासनास मिळाला आहे. त्यांच्या सल्लयाप्रमाणे काम करण्यासाठी आयुक्तांची मान्यता घ्यावी लागणार आहे.

निविदा काढाव्या लागणार आहेत. पंधरा ते वीस दिवसांची निविदा प्रक्रीया राबवावी लागणार आहे. त्यानंतर पुढे महिना ते दीड महिना काम पूर्ण होण्यास लागणार आहे. तोपर्यंत नदीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरीकांना प्रदुषीत पाणी प्यावे लागणार आहे.२५ ते ३० एमएलडी सांडपाणी नदीत

जयंती नाल्यावरील सांडपाणी अडविण्यासाठी टाकलेल्या सर्व फळ्या काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे नाल्यातील २५ ते ३० एम.एल.डी. मैलामिश्रीत सांडपाणी नदीत मिसळत आहे. तसेच दुधाळी नाल्यातून १८ ते २० एम.एल.डी. सांडपाणी नदीत मिसळते.

मनपा प्रशासनाने कसबा बावडा येथे अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रीया केंद्र उभारले आहे. तेथे फक्त जयंती नाल्यातील पाण्यावरच प्रक्रीया केली जात होती. परंतु आता गेल्या महिन्यापासून जयंती नाल्यातील सांडपाणी बावडा येथील प्रक्रीया कें्रद्राकडे जात नाही. केवळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे यंत्रणा सक्षम असूनही काम व्यवस्थीत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण ही बाब अतिशय गंभीर आहे.कुठं गेले पर्यावरणवादी?

गेले महिनाभर जयंती नाला थेट पंचगंगा नदीत जाऊन मिळत आहे, त्यामुळे नदी प्रदुषीत होत आहे. परंतु याकडे मनपा अधिकाºयांचे तर लक्ष नाहीत, शिवाय शहरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचेही दुर्लक्ष झालेले आहे. काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी पंगा घेण्याचे बंद केले आहे, तर काही जण सोयीची भुमिका घेत आहेत. त्यामुळेच या घटनेचे गांभीर्य कोणालाच राहिलेले नाही. नदीच्या खालच्या बाजूला रहात असलेल्या लोकांना साथीचे आजार उद्भवल्यावरच यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.