शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कोल्हापूर :घरकुल चोरीप्रकरणी कारवाईस जिल्हा परिषदेकडून चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:18 IST

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील घरकुल योजनेतील घरे चोरून शासकीय निधीची लुबाडणूक करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी, ग्रामसेवक अतुल इरनक, लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिले होते; पण जिल्हा परिषदेने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्देहातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीचा आरोपजि.प.समोर १० डिसेंबरपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील घरकुल योजनेतील घरे चोरून शासकीय निधीची लुबाडणूक करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी, ग्रामसेवक अतुल इरनक, लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिले होते; पण जिल्हा परिषदेने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही.

जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा निषेध म्हणून आणि तातडीने कारवाई व्हावी, या मागणीसाठी १० डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा देणारे निवेदन हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विभागाला दिले.मौजे तळसंदे (ता. हातकणंगले) येथे घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याबद्दल हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीने पुराव्यासह जून २०१७ मध्ये जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. पावसाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा होऊन ग्रामविकास मंत्र्यांनी तातडीने फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले होते.

या घटनेला दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात हातकणंगले गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी यांनी ग्रामसेवक अतुल इरनक व लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर कारवाईसंदर्भात शासनाकडून आलेल्या आदेशाचेही पालन केले नाही.

लिपिक चव्हाण यांनी पत्नीच्या नावे ग्रामपंचायतीची मिळकत हडप केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी दप्तरात खाडाखोडही केल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात जानेवारी २०१८ मध्ये फौजदारी गुन्हाही दाखल झाला आहे.या घरकुल चोरीत लिपिक, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी हे तिघेही दोषी असताना केवळ खाडाखोड केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करून इतरांना वाचविण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वत: गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चुकीचा अहवाल पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप हातकणंगले तालुका कृती समितीने निवेदनातून केला आहे.

या संदर्भात ६ जुलैला २०१८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तक्रार आली नसल्याचे सांगितले. ‘आपले सरकार पोर्टल’वर आॅनलाईन तक्रार नोंदविली असतानाही तक्रारच नसल्याचे ‘महासरकार’च्या प्रतिनिधीने उत्तर दिले आहे.या सर्वांचा निषेध व दोषींवर तातडीने कारवाई व्हावी म्हणून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषदेत सुभाष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात डी. आर. चव्हाण, अ. वा. शिंदे, बा. बा. चव्हाण, भरत कांबळे, कृ. आ. चव्हाण यांचा समावेश होता.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर