शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कोल्हापूर :घरकुल चोरीप्रकरणी कारवाईस जिल्हा परिषदेकडून चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:18 IST

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील घरकुल योजनेतील घरे चोरून शासकीय निधीची लुबाडणूक करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी, ग्रामसेवक अतुल इरनक, लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिले होते; पण जिल्हा परिषदेने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्देहातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीचा आरोपजि.प.समोर १० डिसेंबरपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील घरकुल योजनेतील घरे चोरून शासकीय निधीची लुबाडणूक करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी, ग्रामसेवक अतुल इरनक, लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिले होते; पण जिल्हा परिषदेने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही.

जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा निषेध म्हणून आणि तातडीने कारवाई व्हावी, या मागणीसाठी १० डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा देणारे निवेदन हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विभागाला दिले.मौजे तळसंदे (ता. हातकणंगले) येथे घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याबद्दल हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीने पुराव्यासह जून २०१७ मध्ये जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. पावसाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा होऊन ग्रामविकास मंत्र्यांनी तातडीने फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले होते.

या घटनेला दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात हातकणंगले गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी यांनी ग्रामसेवक अतुल इरनक व लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर कारवाईसंदर्भात शासनाकडून आलेल्या आदेशाचेही पालन केले नाही.

लिपिक चव्हाण यांनी पत्नीच्या नावे ग्रामपंचायतीची मिळकत हडप केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी दप्तरात खाडाखोडही केल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात जानेवारी २०१८ मध्ये फौजदारी गुन्हाही दाखल झाला आहे.या घरकुल चोरीत लिपिक, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी हे तिघेही दोषी असताना केवळ खाडाखोड केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करून इतरांना वाचविण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वत: गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चुकीचा अहवाल पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप हातकणंगले तालुका कृती समितीने निवेदनातून केला आहे.

या संदर्भात ६ जुलैला २०१८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तक्रार आली नसल्याचे सांगितले. ‘आपले सरकार पोर्टल’वर आॅनलाईन तक्रार नोंदविली असतानाही तक्रारच नसल्याचे ‘महासरकार’च्या प्रतिनिधीने उत्तर दिले आहे.या सर्वांचा निषेध व दोषींवर तातडीने कारवाई व्हावी म्हणून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषदेत सुभाष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात डी. आर. चव्हाण, अ. वा. शिंदे, बा. बा. चव्हाण, भरत कांबळे, कृ. आ. चव्हाण यांचा समावेश होता.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर