शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूरची आमदारकी पन्नाशीच्या आत..!

By admin | Updated: October 22, 2014 00:25 IST

प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून शिवसेना नेहमीच नव्या दमाच्या उमेदवारांना निवडणुकीस उभे करीत आली आहे.

विश्वास पाटील - कोल्हापूरची आमदारकी वयाने सरासरी पन्नाशीच्या आत आली आहे. दहापैकी तब्बल सात आमदार वयाने पन्नासच्या आतील असल्याचे चित्र आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर व हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचेच आमदार साठी ओलांडलेले आहेत. भाजपचे सुरेश हाळवणकर यांनी नुकतीच पन्नाशी पूर्ण केली आहे. प्रत्येक मतदारसंघातील पस्तीस वयाच्या आतील मतदारांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पक्षांचाही तरुण उमेदवारांना संधी देण्याकडे कल आहे. त्यातही कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार जास्त निवडून आल्याने सरासरी वय कमी झाले आहे; कारण प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून शिवसेना नेहमीच नव्या दमाच्या उमेदवारांना निवडणुकीस उभे करीत आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राज्यभरातील उमेदवारांचे वयही अन्य सर्व पक्षांच्या उमेदवारांपेक्षा कमी आहे.जिल्ह्यात आतापर्यंतच्या राजकारणात काँग्रेसचा पगडा होता. काँग्रेसमध्ये प्रस्थापितांचे राजकारण आजही चालते. त्यामुळे त्याच-त्याच उमेदवारांना पुन:पुन्हा उमेदवारी हा त्या पक्षात पारंपरिक हक्कच मानला जातो. या निवडणुकीतही सा. रे. पाटील, भरमू पाटील, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे अशी नावे पाहिल्यास हे लक्षात येते. नऊपैकी कर्णसिंह गायकवाड, सतेज पाटील व सत्यजित कदम हेच काँग्रेसचे नव्या दमाचे उमेदवार होते. अन्य वयाने ज्येष्ठ आहेत. आतापर्यंत उमेदवार कोण यापेक्षा पक्ष म्हणून काँग्रेसचे वर्चस्व राहिल्याने वयाने जास्त असलेले उमेदवार आमदार होत आले. ही परंपरा मुख्यत: शिवसेनेने मोडून काढली. फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, परंतु नव्या दमाच्या उमेदवारास रिंगणात उतरवून हवा तयार करण्यात या पक्षाचा हातखंडा. मागच्या दहा वर्षांत तर ‘गळ्यात भगवी फडकी घालून गावातील चार पोरं शिवसेनेसाठी फिरतात,’ अशी हेटाळणी काँग्रेसवाले करीत असत. त्यात या पोरांनीच कोल्हापूरसह महाराष्ट्रातही दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांच्या तोंडाला फेस आणल्याचे विधानसभेचा निकाल सांगतो आहे. आता काँग्रेस व राष्ट्रवादीही त्यापासून काही धडा घेते का, हेच पाहायचे...!तरुणाईची मतदारसंख्या अशी...कोल्हापूर जिल्ह्यात ३१ जुलैअखेर प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार २९ लाख ५ हजार मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सहा लाख ५१ हजार ३५ मतदार हे ३० ते ३९ वयोगटातील आहेत. त्याखालोखाल ४० ते ४९ वयोगटातील ६ लाख १२ हजार ८९२, तर २० ते २९ वयोगटातील जिल्ह्यात ५ लाख ७० हजार मतदार आहेत, तर प्रथमच मतदार करणारे (१८ ते १९) या वयोगटातील ५७ हजार १८५ मतदार आहेत. याचा अर्थ असा की, जिल्ह्यात १८ ते ४९ वयोगटातील १८ लाख ९१ हजार ३७८ मतदार आहेत. मतदार तरुण झाल्याने नाइलाजाने का असेना, तरुणांना उमेदवारी देण्याकडे कल वाढतो आहे, हेदेखील सुचिन्हच म्हटले पाहिजे.