शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा, माफक दरात शंभर खोल्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 18:31 IST

कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधा , माफक दरात शंभर खोल्यांची सोय, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा

कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण्याचा संकल्प केला आहे.

पहिल्या टप्प्यात २५ खोल्या येत्या मे महिन्यापर्यंत भाविकांच्या सेवेत दाखल होतील, तर ७५ खोल्यांचे बांधकाम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. ही केवळ धर्मशाळाच असणार नाही, तर भाविकांच्या दृष्टीने हे राहण्याची सर्वोत्तम, चांगल्या दर्जाची सुविधा देणारे केंद्र असेल, असा विश्वास ट्रस्टींनी व्यक्त केला आहे.याबाबत ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र चालविण्याचा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे चालविला जात असून, उत्तम सेवा, गुणवत्ता यांच्या जोरावर ट्रस्टने भाविक वर्गात नावलौकिक प्राप्त केला आहे.

सध्या भाविकांच्या राहण्याची उत्कृष्ट सेवा महालक्ष्मी भक्त मंडळ देत आहे. तरीही जागेअभावी आणखी सोय करता येत नाही; म्हणूनच ही गरज लक्षात घेऊन महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे नवीन धर्मशाळा उभी करण्याचा संकल्प केला आहे. अंबाबाई मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या राजोपाध्ये बोळातील पंतवाडा विकत घेऊन त्या ठिकाणी ही धर्मशाळा बांधण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील २५ खोल्या मे महिन्यापर्यंत, तर उर्वरित ७५ खोल्यांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा निश्चय असून, धर्मशाळेत रेस्टॉरंट, पार्किंगसह राहण्याची उत्तम सोय केली जाईल. प्रत्येक खोलीत टी.व्ही., गरम पाण्याची सोय, वाय-फाय सुविधा, अंतर्गत सजावट चांगली असेल. एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च त्यासाठी अपेक्षित असला तरी तो देणगी आणि कर्ज यांच्या माध्यमातून उभा केला जाईल.

विशेष म्हणजे या प्रकल्पास काही बॅँकांही कर्ज देण्याकरिता पुढे आलेल्या आहेत. भविष्यात एक हजार खोल्यांची धर्मशाळा उभारण्याचे ट्रस्टचे उद्दिष्ट असले तरी पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने हे कार्य पूर्ण केले जाईल. आजकाल भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येतात; परंतु त्यांना राहण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने ते आल्यादिवशीच देवीचे दर्शन घेऊन परत जातात.

भाविक कोल्हापुरात मुक्काम करायला लागले की येथील व्यवसायांत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळेच आम्ही धर्मशाळा उभारण्याच्या प्रयत्नात आहोत, असे राजू मेवेकरी यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय जोशी, कार्यवाह सुनील खडके, खजानिस प्रशांत तहसीलदार, राजेश सुगंधी, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmbadevi Mandirअंबादेवी संस्थान