शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोल्हापूर : यंत्रणा सक्षम, अधिकारी मात्र अकार्यक्षम जयंती नाल्याचे दुखणे : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:50 IST

आवश्यक मशिनरी म्हणाल, तर जागेवर आहे. मनुष्यबळ म्हणाल, तर आवश्यकतेएवढे आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जनरेटरचीदेखील सोय आहे. फक्त जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कष्टाळू अधिकाºयांची वानवा आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाºयांचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष या कारणांनी जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण वाढले

ठळक मुद्देजयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे रोजचंच दुखणंकारणे दाखवा’ नोटीस बजावल्या, आयुक्त व महापौरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

भारत चव्हाण /

कोल्हापूर : आवश्यक मशिनरी म्हणाल, तर जागेवर आहे. मनुष्यबळ म्हणाल, तर आवश्यकतेएवढे आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जनरेटरचीदेखील सोय आहे. फक्त जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कष्टाळू अधिकाºयांची वानवा आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाºयांचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष या कारणांनी जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही कितीही पंचनामे करा, कारणे दाखवा नोटीस द्या, वीज कनेक्शन तोडा, आम्ही आमच्या पद्धतीनेच काम करणार या अधिकाºयांच्या मानसिकतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, ही बाब अतिशय गंभीर आहे.

जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे रोजचंच दुखणं झाल्यामुळे अधिकाºयांच्या संवेदनाही बोथट झाल्या आहेत; पण याच बोथट संवेदना नदीच्या खालच्या बाजूकडील नागरिकांच्या जीवावर उठायला लागल्या आहेत, तरीही त्याचे काहीच वाटत नाही, हे मात्र भयंकर आहे. गेल्या सात- आठ वर्षांत असंख्यवेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्या, आयुक्त व महापौरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाले, वीज कनेक्शन तोडले, न्यायालयाने फटकारले, राष्ट्रीय हरित लवादाने फैलावर घेत प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करण्याचे बंधन घातले, अधिकाºयांना दंड करण्यात आला. तरीही महानगरपालिकेचा कारभार सुधारत नाही म्हटल्यावर आता काय करायला पाहिजे हाच प्रश्न आहे.

जरा पाऊस पडला, वीज पुरवठा बंद झाला, की जयंती नाल्याचे सांडपाणी वाहू लागते. रोजचेच दुखणं असल्याने अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी अशा सांडपाण्यात लक्ष घालत नाहीत; त्यामुळे जयंती नाला वाहतच आहे.शहरातील जवळपास ६० एम. एल. डी. सांडपाणी उपसा करण्याची क्षमता असलेले ४५० एच. पी. क्षमतेचे पाच उपसा पंप बसविले आहेत. जनरेटर बसविला आहे; पण या यंत्रांचा पुरेपूर वापर करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. एकाही अधिकाºयाने यात लक्ष घालून हा प्रश्न कसा सोडविला पाहिजे, याचा अभ्यास केलेला नाही. हा केवळ निष्काळजीपणाच म्हणायला पाहिजे.- जयंती नाल्यावरून रोज ६० एम. एल. डी. सांडपाण्याचा उपसा- ४५० एच. पी. चे दोन उपसा पंप कायम सुरू, ४५० एच. पी.चे ३ पंप स्टॅँन्डबाय म्हणून राखीव.- सांडपाणी वाहून नेण्यासाठी दसरा चौक ते प्रक्रिया केंद्रापर्यंत १००० एम. एम. जाडीची जलवाहिनी.- लाईट गेल्यास जनरेटरची सोय; पण या जनरेटरचा वापर होत नाही.

अधिकाºयांचा हलगर्जीपणा नडतोयशहरातील सांडपाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने जीवनमरणाचा प्रश्न आहे. ड्रेनेज विभागाचा कारभार एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाकडे सोपविण्यात आलेला असून, त्याची जबाबदारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्यावर पाणी पुरवठ्याची मुख्य जबाबदारी आहे; त्यामुळे ते पूर्णवेळ सांडपाणी प्रक्रियांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. ‘आग लागली की बंब जसे धावतात’ तसे हे कुलकर्णी काही प्रश्न निर्माण झाला की जयंती नाल्यावर धावतात, अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. जनरेटर खरेदी केला असला, तरी त्याला अद्याप कनेक्शन दिले गेले नाही, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे.आता काय करायला पाहिजे ?१. जयंती नाला बंधारा येथून सांडपाणी प्रक्रि या केंद्राकडे सांडपाणी वाहून नेण्याकरिता १००० एम. एम. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. जलवाहिनी टाकली त्यावेळचे सांडपाणी आणि आताचे सांडपाणी याचे प्रमाण वाढलेले आहे. महापालिकेकडे पाच उपसा पंप आहेत, त्यातील दोन २४ तास सुरू असतात. तीन स्टॅँडबाय म्हणून राखीव ठेवले जातात. जेव्हा पहाटे ५ ते दुपारी २ पर्यंत सांडपाण्याचा प्रवाह वाढतो, तेव्हा स्टॅँडबायपैकी आणखी एक - दोन पंप सुरू करावे म्हटले, तर जलवाहिनीची तितकी क्षमता नाही; त्यामुळे स्टॅँडबाय सुरू करता येत नाहीत. ही अडचण आणि पुढील काही वर्षांचा विचार करता आणखी एक जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे.२. जयंती नाल्यावर जो बंधारा बांधण्यात आला आहे, त्याची उंची खूपच कमी आहे. त्यामध्ये पाणी अडविण्याची क्षमता कमी झाली आहे. बंधाºयाची उंची आणखी काही मीटरनी वाढवून सांडपाणी अडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. याशिवाय बंधाºयालगत जयंती नाल्याच्या पात्रातील साचलेला गाळ काढला गेला पाहिजे. तसेच नाल्याच्या पात्राची खोली वाढविली पाहिजे, ज्यामुळे सांडपाणी नदीत वाहण्याचे थांबेल.

३. जितका स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याचा विषय महत्त्वाचा आहे, तितकाच सांडपाणी निर्गतीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे; त्यामुळे या कामावर एक जबाबदार अधिकाºयाची नेमणूक तातडीने केली पाहिजे. त्यांच्याकडे अन्य कोणताही अतिरिक्त कार्यभार देता कामा नये.दोन दिवस नाला वाहतोय थेट नदीतजयंती नाला गेले दोन दिवस थेट नदीत मिसळत आहे. मंगळवारी दुपारी अचानक केबल शॉर्टसर्किटमुळे जळाली. ती बदलण्यासाठी दोन तासांहून अधिककाळ उपसा यंत्रणा बंद ठेवावी लागली. बुधवारी सकाळीदेखील हा नाला नदीत वाहत होता. ड्यूटीवरील कर्मचाºयांनी ब्लीचिंगचा डोस वाढवला; पण हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर