शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर : लिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा, अराफत शेख यांनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:24 IST

लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा न मिळाल्याने मुलांना शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यथा लिंगायत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अराफत शेख यांच्यासमोर मांडल्या.

ठळक मुद्देलिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा अराफत शेख यांनी साधला संवाद

कोल्हापूर : लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा न मिळाल्याने मुलांना शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यथा लिंगायत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अराफत शेख यांच्यासमोर मांडल्या.

अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यपदी ख्रिस्ती व्यक्तीचा समावेश केल्यास समाजाच्या भावना चांगल्या प्रकारे सरकारसमोर मांडता येतील, यासह विविध मागण्यांचे निवेदन ख्रिस्ती युवाशक्तीने दिले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी शासकिय विश्रामगृह येथे अल्पसंख्यांक बांधवांशी संवाद साधला.लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक सरला पाटील, बाबूराव तारळी, मिलींद साखरपे यांच्या शिष्टमंडळाने शेख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लिंगायत धर्माचे लोक महाराष्ट्रात  अल्पसंख्यांक दर्जा व स्वतंत्र दर्जा मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे आंदोलने करत आहेत.

समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रात  अल्प असल्याने राज्यस्तरीय अल्पसंख्यांक दर्जा मिळावा. त्यामुळे समाजातील संस्थांद्वारे मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अधिक सोयी पुरविता येऊ शकतील. तसेच इतरही समाज विकास केला जाऊ शकतो, त्यामुळे या मागणीचा गांभिर्याने विचार व्हावा, असे या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी निळकंठ मुगल खोड, विलास आंबोळे, राजशेखर तंबाखे, चंद्रशेखर बटकडली, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.ख्रिस्ती युवा शक्तीचे राज्याध्यक्ष राकेश सावंत यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदनाद्वारे मागण्या सादर केल्या. यामध्ये जिल्हानिहाय अल्पसंख्यांक समितीवर सदस्यपदी ख्रिश्चनांची निवड करावी, नवबौध्दांच्या धर्तीवर ख्रिस्ती धर्म स्विकारलेल्यांना नवख्रिस्ती म्हणून मान्यता मिळावी.

गरीब ख्रिस्ती मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात यावी, स्थानिक स्वराज संस्थांकडून मोफत शवपेटी मिळावी, ख्रिस्ती समाजातील व्यक्तीला विधानपरिषदेवर संधी द्यावी, तसेच स्थानिक स्वराज संस्थेत स्विकृत सदस्य म्हणून घ्यावे अशा मागण्यांचा समावेश आहे. यावेळी संजय बेनाडे, प्रणिता माळी, रमेश भोसले, राम केंगार, नितीन माळी, के. पी. सोनवणे, शम्युवेल परब, ज्योती खोडवे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर