शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कोल्हापूर : लिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा, अराफत शेख यांनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:24 IST

लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा न मिळाल्याने मुलांना शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यथा लिंगायत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अराफत शेख यांच्यासमोर मांडल्या.

ठळक मुद्देलिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा अराफत शेख यांनी साधला संवाद

कोल्हापूर : लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा न मिळाल्याने मुलांना शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यथा लिंगायत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अराफत शेख यांच्यासमोर मांडल्या.

अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यपदी ख्रिस्ती व्यक्तीचा समावेश केल्यास समाजाच्या भावना चांगल्या प्रकारे सरकारसमोर मांडता येतील, यासह विविध मागण्यांचे निवेदन ख्रिस्ती युवाशक्तीने दिले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी शासकिय विश्रामगृह येथे अल्पसंख्यांक बांधवांशी संवाद साधला.लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक सरला पाटील, बाबूराव तारळी, मिलींद साखरपे यांच्या शिष्टमंडळाने शेख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लिंगायत धर्माचे लोक महाराष्ट्रात  अल्पसंख्यांक दर्जा व स्वतंत्र दर्जा मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे आंदोलने करत आहेत.

समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रात  अल्प असल्याने राज्यस्तरीय अल्पसंख्यांक दर्जा मिळावा. त्यामुळे समाजातील संस्थांद्वारे मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अधिक सोयी पुरविता येऊ शकतील. तसेच इतरही समाज विकास केला जाऊ शकतो, त्यामुळे या मागणीचा गांभिर्याने विचार व्हावा, असे या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी निळकंठ मुगल खोड, विलास आंबोळे, राजशेखर तंबाखे, चंद्रशेखर बटकडली, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.ख्रिस्ती युवा शक्तीचे राज्याध्यक्ष राकेश सावंत यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदनाद्वारे मागण्या सादर केल्या. यामध्ये जिल्हानिहाय अल्पसंख्यांक समितीवर सदस्यपदी ख्रिश्चनांची निवड करावी, नवबौध्दांच्या धर्तीवर ख्रिस्ती धर्म स्विकारलेल्यांना नवख्रिस्ती म्हणून मान्यता मिळावी.

गरीब ख्रिस्ती मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात यावी, स्थानिक स्वराज संस्थांकडून मोफत शवपेटी मिळावी, ख्रिस्ती समाजातील व्यक्तीला विधानपरिषदेवर संधी द्यावी, तसेच स्थानिक स्वराज संस्थेत स्विकृत सदस्य म्हणून घ्यावे अशा मागण्यांचा समावेश आहे. यावेळी संजय बेनाडे, प्रणिता माळी, रमेश भोसले, राम केंगार, नितीन माळी, के. पी. सोनवणे, शम्युवेल परब, ज्योती खोडवे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर