शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कोल्हापूर : सर्किट बेेंच ठरावाचे पत्र मूख्य न्यायमूर्तींना देणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी शेंडा पार्क येथे इमारत उभारण्यासाठी लागणारे ११ कोटींच्या निधीची तरतूद मुख्य न्यायमूर्तींनी निर्णय देताच लगेच करु, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसर्किट बेेंच ठरावाचे पत्र मूख्य न्यायमूर्तींना देणारपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही ज्येष्ठ विधीतज्ज्ञ डी. बी. भोसले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी शेंडा पार्क येथे इमारत उभारण्यासाठी लागणारे ११ कोटींच्या निधीची तरतूद मुख्य न्यायमूर्तींनी निर्णय देताच लगेच करु, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.न्याय संकुल इमारतीच्या शाहु सभागृहात ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. डी. बी. भोसले यांनी लिहलेल्या ‘अधिकार अभिलेखाबाबतचा कायदा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख व सत्र न्यायाधीश एम. ए. लवेकर होते.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, अ‍ॅड. भोसले यांनी न्यायव्यवस्था सुकर होणारे पुस्तक लिहले आहे. त्याचा फायदा शासन, न्याय व्यवस्था, वकील आणि नागरिकांना होणार आहे. महसुल कायदा हा ब्रिटीशन कालिन कायदा आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल झाले नाही, मात्र खूप कमी बदल झाले. ई-सातबाराची कल्पना रेंगाळलेली होती. गेल्या दोन वर्षात ३७ हजार गावांचे ई-सातबारा पूर्ण झाला आहे. सहा हजार गावे प्रलिंबित आहेत. ती एप्रिल अखेर पूर्ण करुन दि. १ मे ला ३५६ तालुक्यांपैकी ३०० तालुक्यामध्ये ई-सातबाऱ्याचे काम पूर्ण होवून तो आॅनलाईन दिला जाणार आहे.

ब्रिटीशांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार कायदा तयार केला. स्वातंत्र्य मिळालेनंतर तो आपल्या आवश्यक्तेनुसार केला पाहिजे. त्यासाठी महसूल कायदा बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून नुकत्याच झालेल्या अधिवेशनात चार कायदे बदलण्यात आले आहेत. अ‍ॅड. भोसले यांनी लिहलेले पुस्तकही महसूल कायदा निट करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावत आलो आहे. अंबाबाईचा कायदा केला. मंदिरासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी भव्य आणि सर्वसोयीनियुक्त असा दर्शन मंडप उभा केला जाणार आहे. कोल्हापूरचा टोल कायमचा बंद करुन त्याचे ४५९ कोटी रुपये देणे आहे. ३१ मार्चच्या आधी १०० कोटी सरकारने दिले.

वकील आणि पक्षकारांच्या जिव्हाळ्याचा प्रलंबित असलेला सर्किट बेंच चा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मूख न्यायाधिश रुजू होताच त्यांना राज्य सरकारच्या वतीने कोल्हापूरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी पत्र देणार आहोत. त्यासाठी मुखमंत्री फडणवीस आग्रही आहेत. हा प्रश्न लवकरच संपूण जाईल अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश लवेकर यांनी अ‍ॅड. भोसले यांनी ‘अधिकार अभिलेखाबाबतचा कायदा’ हा गुंतागुंतीचा विषय आपल्या सर्वांसाठी पुस्तकरुपाने सोपा करुन सांगितला आहे. त्यांनी मांडलेले काही बदल, सुचना यावर येत्या काही कालावधीमध्ये विचार होवू शकतो. सर्वांना उपयोगी पडणारे उत्तम पुस्तक आहे. स्वागत अ‍ॅड. किरण पाटील तर आभार अ‍ॅड. नारायण भांदीगरे यांनी मानले. सूत्रसंचलन अ‍ॅड. असावरी कुलकर्णी यांनी केले. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे, शिवाजीराव राणे, डी. बी. घाटगे, यांचेसह वकील उपस्थित होते.आखाडी जमिनी परत करणारआखाडी पड प्रकार काय आहे, हे जाणून घेतले असता त्या काळात सारा भरला नाही, त्या शेतकऱ्याच्या जमिनी सरकारने जप्त केल्या आहेत. मात्र राज्य सरकारने आकार भरणाऱ्यांना आखाडपड जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना महसुल कायद्यासंबधी जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.ग्रामीण भागातील व्यक्तिला प्रॉपर्डी कार्ड मिळणारग्रामीण भागामध्ये प्रॉपर्टी कार्ड नाही. त्याचे प्रात्यक्षिक घेतले तर यासाठी दहावर्ष लागतील अशी चर्चा झाली. जमावबंदी आयुक्त चोखलिंगम यांचेशी बैठक घेवून दीड वर्षामध्ये प्रत्येक ग्रामीण माणसाला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नकाशा, मोजणी आता डिजीलाईन आॅनलाईन मिळणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील