शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोल्हापूर : पानसरे खटल्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वकील नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:55 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्याने तातडीने नियुक्ती होण्याची गरज असल्याचे या कुटुंबियांनी निदर्शनास आणून दिले.

ठळक मुद्देपानसरे खटल्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वकील नेमामुख्यमंत्र्यांकडे मागणी : पानसरे-दाभोलकर कुटुंबीयांचे पत्र

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्याने तातडीने नियुक्ती होण्याची गरज असल्याचे या कुटुंबियांनी निदर्शनास आणून दिले.पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पत्नी श्रीमती उमादेवी कलबुर्गी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणांत तपासांत फारशी प्रगती नाही, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालायाने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनामध्ये अनेक साम्यस्थळे असल्याने या सर्व खूनांचा तपास सीबीआय सारख्या एकाच तपास यंत्रणेकडून का होऊ नये, असे मत व्यक्त केले होते व सीबीआयला आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते.

पानसरे यांच्या खूनाचा तपास सुरुवातीपासून एसआयटी मार्फत सुरु आहे. लंकेश यांच्या खूनाचा तपास कर्नाटक एसआयटीमार्फत सुरु आहे. आता तपासाच्या या टप्प्यावर तपास यंत्रणा बदलल्यावर पुन्हा सगळा नवीन श्रीगणेशा होईल व त्यातून तपास कामावर परिणाम होईल असे मेघा पानसरे व लंकेश यांची बहिण कविता लंकेश यांचे म्हणणे आहे. म्हणून या खटल्यात महाराष्ट्र शासनातर्फे पानसरे खूनप्रकरणी ठामपणे बाजू मांडण्याची गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची नियुक्ती होण्याची गरज आहे.

आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख जवळ आल्याने ही नियुक्ती लगेच व्हावी, अशी पानसरे कुटुंबियांची अपेक्षा आहे. मेघा पानसरे यांनी कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व एसआयटीच्या प्रमुखांनाही त्यासंबंधीचे पत्र पाठविले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या पत्राची प्रत पाठवली आहे. मुख्यमंत्री या खटल्याचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा पानसरे कुटुंबियांना आहे.

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर