शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

कोल्हापूर : पानसरे खटल्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वकील नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:55 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्याने तातडीने नियुक्ती होण्याची गरज असल्याचे या कुटुंबियांनी निदर्शनास आणून दिले.

ठळक मुद्देपानसरे खटल्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वकील नेमामुख्यमंत्र्यांकडे मागणी : पानसरे-दाभोलकर कुटुंबीयांचे पत्र

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्याने तातडीने नियुक्ती होण्याची गरज असल्याचे या कुटुंबियांनी निदर्शनास आणून दिले.पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पत्नी श्रीमती उमादेवी कलबुर्गी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणांत तपासांत फारशी प्रगती नाही, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालायाने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनामध्ये अनेक साम्यस्थळे असल्याने या सर्व खूनांचा तपास सीबीआय सारख्या एकाच तपास यंत्रणेकडून का होऊ नये, असे मत व्यक्त केले होते व सीबीआयला आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते.

पानसरे यांच्या खूनाचा तपास सुरुवातीपासून एसआयटी मार्फत सुरु आहे. लंकेश यांच्या खूनाचा तपास कर्नाटक एसआयटीमार्फत सुरु आहे. आता तपासाच्या या टप्प्यावर तपास यंत्रणा बदलल्यावर पुन्हा सगळा नवीन श्रीगणेशा होईल व त्यातून तपास कामावर परिणाम होईल असे मेघा पानसरे व लंकेश यांची बहिण कविता लंकेश यांचे म्हणणे आहे. म्हणून या खटल्यात महाराष्ट्र शासनातर्फे पानसरे खूनप्रकरणी ठामपणे बाजू मांडण्याची गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची नियुक्ती होण्याची गरज आहे.

आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख जवळ आल्याने ही नियुक्ती लगेच व्हावी, अशी पानसरे कुटुंबियांची अपेक्षा आहे. मेघा पानसरे यांनी कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व एसआयटीच्या प्रमुखांनाही त्यासंबंधीचे पत्र पाठविले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या पत्राची प्रत पाठवली आहे. मुख्यमंत्री या खटल्याचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा पानसरे कुटुंबियांना आहे.

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर