शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:47 IST

गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.

ठळक मुद्देअंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन इरिगेशन फेडरेशनतर्फे सर्वपक्षीय शेतकरी मेळावा२१ जानेवारीला चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारीला पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन होणार आहे. याच्या नियोजनासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला. प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संपतबापू पाटील, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे, माजी सभापती बाबासो पाटील-भुयेकर, मारुतराव जाधव, मारुती पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकार आश्वासन देत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून आंदोलनाची तारीख पुढे सरकत गेली. आता थांबणे शक्य नाही. शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. वीज कनेक्शन तुटू नये म्हणून संयमाने घेतले; पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, पदरात पाडून घ्यायची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ताकदीने आंदोलनात उतरावे.खासदार महाडिक म्हणाले, नुसती आश्वासने देणाऱ्या सरकारला कोणाच्याच मागण्या मान्य करायच्या नाहीत, असे दिसत आहे. उद्योजकांना रस्त्यावर आणणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना उपाययोजना राहू देत, मृत्यूची आकडेवारीदेखील बाहेर जाऊ नये, याची दक्षता हे सरकार घेत आहे. या सरकारला घरी बसविण्याची हीच संधी आहे. आजचे मरण उद्यावर ढकलून चालणार नाही. तलवार शेतकऱ्यांच्या मानेवर पडणार आहे.माजी आमदार संपतबापू पाटील म्हणाले, सरकारकडे पैसे नाहीत आणि शेतकऱ्यांकडेही नाहीत. दोघेही कंगाल आणि रिकामे आहेत. कंगालाकडून कसली वसुली करताय. सरकारने रिकाम्या माणसाला समजून घ्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. भगवान काटे यांनी कळणाऱ्या भाषेतच आम्ही आंदोलने करतो, राज्यकर्त्यांना गांधीगिरी कळत नाही. हातात बुडका घेऊनच वठणीवर आणतो, असे सांगून ऊस बिलाचा पत्ता नाही आणि मग वीजेची बिले कशी काय मागता? असा सवाल केला. आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मनोगत व्यक्त करताना चक्काजाम ताकदीने करण्याचे आवाहन केले.महाडिक नको, राष्ट्रवादीचे म्हणाधनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणावर आणावे, असे इरिगेशन फेडरेशनचे कार्यकर्ते रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले. यावर खासदार महाडिक यांनी पटकन महाडिक नको राष्ट्रवादीची युवा शक्ती म्हणा, असे हळूच सांगितले. खासदारांना राष्ट्रवादीतून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर किती धसका घेतलाय, याचीच प्रचिती आली.

पवारांचेच सरकार येणारआता पवारांचेच सरकार येणार आहे, त्यांनी माफी द्यायचे मान्य केले आहे. मग कशाला आमच्या डोक्यावर बसलाय? असे स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत म्हटल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले.

साडेसतरा एचपीचा पंपच नाही, तर बिल कसे येतेसाडेसतरा एचपीचा पंपच बाजारात उपलब्ध नाही, तरीही महावितरणकडून साडेसतरा एचपी पंपाची बिले शेतकºयांना काढली असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणून देताना राज्यातील ४२ लाखांपैकी केवळ ३५ हजार पंपांचीच बिले व मीटर रीडिंग जुळत आहे. उर्वरित बिले अंदाजे काढली जात आहेत.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात आणि विशेष म्हणजे पंप आणि ट्रान्स्फॉर्मर काढून ठेवलेला असतानाही १२५ युनिटचे बिल शेतकऱ्याला येते. ३0 टक्के गळती असताना ती १५ टक्के दाखविली जाते. एक टक्का म्हणजे ७00 कोटी, असा हिशेब धरला, तर १0 हजार ५00 कोटींची बोगस बिले काढली जातात. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकºयांची थकबाकी वाढविली जाते, हे सर्व ऊर्जा खात्यातील मंत्री, अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

 

 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पkolhapurकोल्हापूर