शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

कोल्हापूर : अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:47 IST

गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.

ठळक मुद्देअंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन इरिगेशन फेडरेशनतर्फे सर्वपक्षीय शेतकरी मेळावा२१ जानेवारीला चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारीला पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन होणार आहे. याच्या नियोजनासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला. प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संपतबापू पाटील, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे, माजी सभापती बाबासो पाटील-भुयेकर, मारुतराव जाधव, मारुती पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकार आश्वासन देत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून आंदोलनाची तारीख पुढे सरकत गेली. आता थांबणे शक्य नाही. शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. वीज कनेक्शन तुटू नये म्हणून संयमाने घेतले; पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, पदरात पाडून घ्यायची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ताकदीने आंदोलनात उतरावे.खासदार महाडिक म्हणाले, नुसती आश्वासने देणाऱ्या सरकारला कोणाच्याच मागण्या मान्य करायच्या नाहीत, असे दिसत आहे. उद्योजकांना रस्त्यावर आणणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना उपाययोजना राहू देत, मृत्यूची आकडेवारीदेखील बाहेर जाऊ नये, याची दक्षता हे सरकार घेत आहे. या सरकारला घरी बसविण्याची हीच संधी आहे. आजचे मरण उद्यावर ढकलून चालणार नाही. तलवार शेतकऱ्यांच्या मानेवर पडणार आहे.माजी आमदार संपतबापू पाटील म्हणाले, सरकारकडे पैसे नाहीत आणि शेतकऱ्यांकडेही नाहीत. दोघेही कंगाल आणि रिकामे आहेत. कंगालाकडून कसली वसुली करताय. सरकारने रिकाम्या माणसाला समजून घ्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. भगवान काटे यांनी कळणाऱ्या भाषेतच आम्ही आंदोलने करतो, राज्यकर्त्यांना गांधीगिरी कळत नाही. हातात बुडका घेऊनच वठणीवर आणतो, असे सांगून ऊस बिलाचा पत्ता नाही आणि मग वीजेची बिले कशी काय मागता? असा सवाल केला. आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मनोगत व्यक्त करताना चक्काजाम ताकदीने करण्याचे आवाहन केले.महाडिक नको, राष्ट्रवादीचे म्हणाधनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणावर आणावे, असे इरिगेशन फेडरेशनचे कार्यकर्ते रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले. यावर खासदार महाडिक यांनी पटकन महाडिक नको राष्ट्रवादीची युवा शक्ती म्हणा, असे हळूच सांगितले. खासदारांना राष्ट्रवादीतून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर किती धसका घेतलाय, याचीच प्रचिती आली.

पवारांचेच सरकार येणारआता पवारांचेच सरकार येणार आहे, त्यांनी माफी द्यायचे मान्य केले आहे. मग कशाला आमच्या डोक्यावर बसलाय? असे स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत म्हटल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले.

साडेसतरा एचपीचा पंपच नाही, तर बिल कसे येतेसाडेसतरा एचपीचा पंपच बाजारात उपलब्ध नाही, तरीही महावितरणकडून साडेसतरा एचपी पंपाची बिले शेतकºयांना काढली असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणून देताना राज्यातील ४२ लाखांपैकी केवळ ३५ हजार पंपांचीच बिले व मीटर रीडिंग जुळत आहे. उर्वरित बिले अंदाजे काढली जात आहेत.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात आणि विशेष म्हणजे पंप आणि ट्रान्स्फॉर्मर काढून ठेवलेला असतानाही १२५ युनिटचे बिल शेतकऱ्याला येते. ३0 टक्के गळती असताना ती १५ टक्के दाखविली जाते. एक टक्का म्हणजे ७00 कोटी, असा हिशेब धरला, तर १0 हजार ५00 कोटींची बोगस बिले काढली जातात. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकºयांची थकबाकी वाढविली जाते, हे सर्व ऊर्जा खात्यातील मंत्री, अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

 

 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पkolhapurकोल्हापूर