शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापूर : पिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:13 IST

पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली.

ठळक मुद्देपिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्लाआठ जणांवर गुन्हा : पूर्व वैमनस्यातून कृत्य

कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली.याप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित सूरज तिवले, आकाश डोंगळे (रा. शिवाजी पेठ), अक्षय हात्तेकर (रा. लक्ष्मीपुरी), जावेद (पूर्ण नाव नाही) यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते.अधिक माहिती अशी, फिर्यादी पवन सरनाईक व संशयित सूरज तिवले यांच्यामध्ये २०१५ मध्ये कॉलेजमधील ट्रॅडिशनल डे च्या वादातून हाणामारी झाली होती. दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. पवन सरनाईक याच्या वाढदिवसानिमित्त तो मित्रांना घेऊन पिरवाडी येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री जेवणासाठी गेला होता.

या ठिकाणी संशयित जेवणासाठी आले होते. यावेळी जेवण करीत असताना संशयित तिवले याने पूर्वीच्या वादातून पवनला तुला आता सोडत नाही, असे म्हणून चाकुने व लाकडी ओंडक्याने हल्ला केला. त्यामध्ये डोक्यात वर्मी घाव लागून पवन गंभीर जखमी झाला.

त्याच्या मित्रांनी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजताच करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर