शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

कोल्हापूर : ‘सेमिस्टर’बाबत विद्या परिषदेचा निर्णय ठरणार महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:01 IST

कला, वाणिज्य विद्याशाखेची सेमिस्टर (सत्र) परीक्षा पद्धत बंद करावी, असा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत मंगळवारी (दि. २७) एकमताने मंजूर झाला. मात्र, या ठरावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी परीक्षा मंडळ आणि विद्या परिषद या अधिकार मंडळांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

ठळक मुद्दे‘सेमिस्टर’बाबत विद्या परिषदेचा निर्णय ठरणार महत्त्वाचापदवीच्या प्रथम वर्षापासून सुरुवात; विज्ञान शाखेच्या समावेशाची मागणी

कोल्हापूर : कला, वाणिज्य विद्याशाखेची सेमिस्टर (सत्र) परीक्षा पद्धत बंद करावी, असा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत मंगळवारी (दि. २७) एकमताने मंजूर झाला. मात्र, या ठरावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी परीक्षा मंडळ आणि विद्या परिषद या अधिकार मंडळांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील एकूण १४७ महाविद्यालये शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित आहेत. एकूण २ लाख ४२ हजार ८९७ विद्यार्थी-विद्यार्थिनी विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत आहेत. विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राद्वारे २६ हजार ७१५ विद्यार्थी-विद्यार्र्थिनी शिकत आहेत.

दहा वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठाने सत्रपद्धती स्वीकारली. सध्या सर्वच विद्याशाखा आणि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होत आहेत. सेमिस्टरमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना वर्षातून दोन वेळा परीक्षांचे कामकाज करावे लागत आहे.

शिक्षक, विद्यार्थी यांचा अधिकतर वेळ परीक्षांमध्ये व्यतीत होत आहे. कला, वाणिज्य परीक्षांमध्ये सेमिस्टर पद्धतीमुळे सर्व विद्यार्थी व महाविद्यालये शिक्षणार्थीऐवजी परीक्षार्थी झाली आहेत. त्यामुळे या विद्याशाखांची सेमिस्टर बंद करावी, याबाबत ठराव मंगळवारी (दि. २७) अधिसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.

अधिसभेतील हा ठराव आता विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर चर्चेसाठी मांडण्यात येईल. यानंतर पुन्हा संबंधित ठराव विद्या परिषदेमध्ये सादर होईल. या दोन्ही अधिकार मंडळांनी जर सेमिस्टर बंद करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आणि कुलपतींनी त्याला मान्यता दिली, तरच कला, वाणिज्य शाखेच्या परीक्षा वार्षिक पद्धतीने होतील.

सकारात्मक निर्णय झाल्यास पहिल्यांदा पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सत्र पद्धतीने होतील. त्यानंतर द्वितीय आणि तृतीय वर्षाला संबंधित पद्धती लागू होईल. दरम्यान, कला आणि वाणिज्य शाखेसह विज्ञान शाखेचीही सेमिस्टर बंद करण्याची मागणी शिक्षक, विद्यार्थ्यांतून झाली आहे.

वर्षभरात ११६८ परीक्षाप्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, आदी नऊ विद्याशाखांतील १८६ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. सुमारे पावणेसहा लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षा देतात. सत्र पद्धतीच्या परीक्षा ४२-४५ दिवसांमध्ये घेण्यात येतात. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर