शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोल्हापूर : ‘सेमिस्टर’बाबत विद्या परिषदेचा निर्णय ठरणार महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:01 IST

कला, वाणिज्य विद्याशाखेची सेमिस्टर (सत्र) परीक्षा पद्धत बंद करावी, असा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत मंगळवारी (दि. २७) एकमताने मंजूर झाला. मात्र, या ठरावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी परीक्षा मंडळ आणि विद्या परिषद या अधिकार मंडळांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

ठळक मुद्दे‘सेमिस्टर’बाबत विद्या परिषदेचा निर्णय ठरणार महत्त्वाचापदवीच्या प्रथम वर्षापासून सुरुवात; विज्ञान शाखेच्या समावेशाची मागणी

कोल्हापूर : कला, वाणिज्य विद्याशाखेची सेमिस्टर (सत्र) परीक्षा पद्धत बंद करावी, असा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत मंगळवारी (दि. २७) एकमताने मंजूर झाला. मात्र, या ठरावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी परीक्षा मंडळ आणि विद्या परिषद या अधिकार मंडळांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील एकूण १४७ महाविद्यालये शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित आहेत. एकूण २ लाख ४२ हजार ८९७ विद्यार्थी-विद्यार्थिनी विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत आहेत. विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राद्वारे २६ हजार ७१५ विद्यार्थी-विद्यार्र्थिनी शिकत आहेत.

दहा वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठाने सत्रपद्धती स्वीकारली. सध्या सर्वच विद्याशाखा आणि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होत आहेत. सेमिस्टरमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना वर्षातून दोन वेळा परीक्षांचे कामकाज करावे लागत आहे.

शिक्षक, विद्यार्थी यांचा अधिकतर वेळ परीक्षांमध्ये व्यतीत होत आहे. कला, वाणिज्य परीक्षांमध्ये सेमिस्टर पद्धतीमुळे सर्व विद्यार्थी व महाविद्यालये शिक्षणार्थीऐवजी परीक्षार्थी झाली आहेत. त्यामुळे या विद्याशाखांची सेमिस्टर बंद करावी, याबाबत ठराव मंगळवारी (दि. २७) अधिसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.

अधिसभेतील हा ठराव आता विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर चर्चेसाठी मांडण्यात येईल. यानंतर पुन्हा संबंधित ठराव विद्या परिषदेमध्ये सादर होईल. या दोन्ही अधिकार मंडळांनी जर सेमिस्टर बंद करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आणि कुलपतींनी त्याला मान्यता दिली, तरच कला, वाणिज्य शाखेच्या परीक्षा वार्षिक पद्धतीने होतील.

सकारात्मक निर्णय झाल्यास पहिल्यांदा पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सत्र पद्धतीने होतील. त्यानंतर द्वितीय आणि तृतीय वर्षाला संबंधित पद्धती लागू होईल. दरम्यान, कला आणि वाणिज्य शाखेसह विज्ञान शाखेचीही सेमिस्टर बंद करण्याची मागणी शिक्षक, विद्यार्थ्यांतून झाली आहे.

वर्षभरात ११६८ परीक्षाप्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, आदी नऊ विद्याशाखांतील १८६ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. सुमारे पावणेसहा लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षा देतात. सत्र पद्धतीच्या परीक्षा ४२-४५ दिवसांमध्ये घेण्यात येतात. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर