शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने पुनित श्री क्षेत्र वडणगे, कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:01 IST

कोंबड्याला पुजणारे एकमेव गाव

कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील वडणगे येथे दरवर्षी महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. आज, शुक्रवारी या यात्रेला प्रारंभ होत आहे. शंकर आणि पार्वतीची दोन स्वतंत्र मंदिरे असणारे महाराष्ट्रातील हे एकमेव गाव असल्याने या दिवशी तालुक्याबरोबरच जिल्हा व राज्यातून येणारे भाविक पहाटेपासूनच दर्शनाला गर्दी करतात. ‘करवीर महात्म्य’ ग्रंथात उल्लेख असणाऱ्या भगवान शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्री क्षेत्र वडणगे ग्रामक्षेत्राला विशेष महत्त्व आहे.

येथील शिव-पार्वती तलाव पूर्वी ‘संबकेश्वर तळे’ म्हणून ओळखला जात होता. फार वर्षांपूर्वी संबकेश येथील राजा गौतमी याने वडणगे येथे वास्तव्य केले होते. या तलावाशेजारीच शंकर आणि पार्वती यांची श्रद्धास्थाने आहेत.

महाशिवरात्रीच्या दिवशी या देवतांचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते. भगवान शंकर-पार्वती यांचे वास्तव्य आणि मंदिराबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात. फार वर्षांपूर्वी गुणवंती नामक एका शिवभक्त स्त्रीला लिंगेश्वर प्रसन्न झाले आणि त्याचवेळी येथे लिंगेश्वराची स्थापना झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. एके दिवशी पार्वतीने शंकराला नदी ओलांडून प्रवेश करून भक्तांना तारक मंत्राने आशीर्वाद देण्याविषयी विनंती केली. साक्षात अंबाबाई येथे वास्तव्यास असून, मला येथून जाण्याची गरज नाही, असे शंकराने सांगितले. तेव्हा पार्वतीला प्रचिती दाखविण्यासाठी भगवान शंकरांनी मृत ब्राह्मणाचे रूप धारण केले. पार्वतीने स्त्रीरूप धारण करून जो कोणी अश्वमेध यज्ञ करेल त्याचे शव चितेवर ठेवणे शक्य होईल, असे सांगितले.

ब्रह्म वैदूने पंचगंगेत स्नान करून ब्रह्मदेवाची पूजा आणि विष्णूचे स्मरण केले. शव उचलताच विष्णूरूप दिसून आले. दरम्यान, तिसरा प्रहर झाल्याने भगवान शंकराला जाग आली आणि पार्वती त्याच गावात स्वतंत्र धावा करत राहिली. त्याचवेळी कोंबडा आरवल्याने भगवान शंकर-पार्वतीचे वास्तव्य येथेच राहिले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

शंकर आणि पार्वती या दोन मंदिरांच्या मध्यभागी कोंबड्याचे दुर्मिळ असे शिल्प आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर-पार्वतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. आसपासच्या खेड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात. यात्रेदिवशी पहाटे शंकर आणि पार्वती यांच्या मूर्तीला ग्रामस्थांतर्फे अभिषेक घालण्यात येतो. शंकराच्या मंदिरातील पिंडी काळ्या पाषाणाची आहे. अतिशय देखणे आणि सुरेख असे मंडपाचे काम केले असून, ८८ फूट उंचीच्या शिखरावर देवदेवतांच्या व संतांच्या आकर्षक व सुबक मूर्ती कौशल्याने कोरलेल्या आहेत. बदलत्या काळात यात्रेच्या मूळ स्वरूपाला धक्का न लागू देण्याची जबाबदारी ग्रामस्थ घेतात.

यात्रेदिवशी पार्वती गल्लीच्या मार्गावर दुतर्फा तसेच मरगाई मंदिर चौक परिसरात दुकाने थाटली जातात. महाशिवरात्री उत्सवाबरोबरच श्रावण सोमवार, नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. नवरात्र काळात पालखीला खांदा देण्याचा व इतर मान गावातील बराले, माने, चेचर, संकपाळ, दिंंडे, सासने, जंगम या कुटुंबांना आहे. यावेळी देवीची वेगवेगळ्या रूपांत सालंकृत पूजा बांधली जाते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी मंदिरात श्री सत्यनारायणाची महापूजा घातली जाते. याशिवाय मंदिरात भजन, ग्रंथवाचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण असे कार्यक्रम वर्षभर सुरूच असतात. पार्वती मंदिर परिसरात होणारा दीपोत्सवही डोळ्यांचे पारणे फेडणारा साजरा होतो.

येथील प्राचीन कालीन संबकेश्वर तलाव सुमारे ३२ एकरांत विस्तारलेला असून, अलीकडच्या काळात तो ‘शिव-पार्वती तलाव’ या नावाने परिचित आहे. प्राचीन काळी गावात संबकेश येथील गौतमी राजाने काही काळ वास्तव्य केले होते. त्याच काळात या तलावाची खोदाई झालेली होती, असे काही उल्लेख ग्रंथात आढळतात. अशी पौराणिक संदर्भ असलेली वडणगेची यात्रा उत्साहात साजरी होत आहे.

कोंबड्याला पुजणारे एकमेव गाव‘कोंबडा’ या पाळीव पक्ष्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु भारतातील वडणगे हे एकमेव गाव असे असावे की, ज्याठिकाणी कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा होते. करवीरच्या भ्रमणासाठी शंकर-पार्वती गावात आले असताना तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आहेत. कोंबड्यामुळेच केवळ वडणगे गावात शिव-पार्वती कायमचे वास्तव्यास राहिले म्हणून या कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा केली जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahashivratriमहाशिवरात्री