शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापूर : तीन लाख अपात्र खात्यांची फेरतपासणी : कोल्हापूर विभागातील कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:41 IST

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या

ठळक मुद्देकुटुंबाचा निकष बदलल्याने निर्णय; नवीन कर्जपुरवठ्याची शहानिशाखातेदारांच्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे तपासणीसाठीअहवाल चार दिवसांत आयुक्तांना द्यायचा

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील एकूण तीन लाख खातेदारांचा समावेश आहे.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ, या निकषामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते; पण आता कुटुंबातील इतरांनाही लाभ देण्याचा निर्णय झाल्याने अपात्र खात्यांच्या फेरतपासणीचे आदेश दिले असून, कोल्हापूर विभागातील तीन लाख खात्यांची तपासणी तालुकास्तरीय समितीने सुरू केली आहे.

राज्य सरकारने जून २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत, दीड लाखावरील शेतकºयांना एकरकमी परतफेड योजना व नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान अशी कर्जमाफीची योजना आणली. निकषानुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ दिला. त्यामुळे कुटुंबातील इतर खातेदार लाभांपासून वंचित राहिले. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत चार लाख ६९ हजार ३४९ खातेदारांना ९४८ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे; पण लाखो शेतकरी वेगवेगळ्या निकषांत आडकल्याने ते वंचित राहिले. सरकारने मध्यंतरी या निकषांत बदल करून कुटुंबातील सर्वच व्यक्तींना लाभ देण्याचा निर्णय घेतला.

कुटुंब निकष आणि इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खातेदारांचा डाटा पुन्हा जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे फेरतपासणीसाठी पाठविला आहे. कोल्हापूर विभागात तीन लाख १ हजार १६४ असे खातेदार आहेत. त्यामध्ये कोल्हापुरात सर्वाधिक एक लाख ३३ हजार २८२, सांगलीत ७६ हजार ८१९ तर साताºयात ९१ हजार ६३ खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांच्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे तपासणीसाठी आल्या आहेत. त्यांची तपासणी करून पात्र खातेदारांची यादी १० आॅक्टोबरपर्यंत सरकारकडे सादर करायची आहे.

त्याशिवाय २०१६-१७ या आर्थिक वर्षातील ज्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ झाला, त्यांना पीक व मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा बॅँकांनी केला का? याची तपासणी करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना दिले आहेत. त्याचबरोबर शेतकरी पात्र झाले; पण त्यांना खरोखरच पैशांचा लाभ झाला का? याची शहानिशाही लेखापरीक्षक करणार आहेत. त्यासाठी विकास संस्थांसह शेतकºयांना अर्थपुरवठा करणाºया संस्थांसाठी १ ते ६६ कॉलमचा नमुना दिला आहे. त्यांनी पात्र झालेल्या खातेदारांची संपूर्ण माहिती भरायची, लेखापरीक्षक त्याची तपासणी करणार असून त्याचा अहवाल चार दिवसांत आयुक्तांना द्यायचा आहे.कोल्हापूर विभागामध्येआतापर्यंत झालेली कर्जमाफीजिल्हा पात्र खातेदारांची संख्या कर्जमाफीची रक्कमकोल्हापूर एक लाख ७० हजार ९०१ ३१४ कोटीसांगली एक लाख १४ हजार ५९१ २५९ कोटीसातारा एक लाख ८३ हजार ८५७ ३७४ कोटीएकूण ४ लाख ६९ हजार ३४९ ९४८ कोटी

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर