शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापूर : तीन लाख अपात्र खात्यांची फेरतपासणी : कोल्हापूर विभागातील कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:41 IST

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या

ठळक मुद्देकुटुंबाचा निकष बदलल्याने निर्णय; नवीन कर्जपुरवठ्याची शहानिशाखातेदारांच्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे तपासणीसाठीअहवाल चार दिवसांत आयुक्तांना द्यायचा

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील एकूण तीन लाख खातेदारांचा समावेश आहे.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ, या निकषामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते; पण आता कुटुंबातील इतरांनाही लाभ देण्याचा निर्णय झाल्याने अपात्र खात्यांच्या फेरतपासणीचे आदेश दिले असून, कोल्हापूर विभागातील तीन लाख खात्यांची तपासणी तालुकास्तरीय समितीने सुरू केली आहे.

राज्य सरकारने जून २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत, दीड लाखावरील शेतकºयांना एकरकमी परतफेड योजना व नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान अशी कर्जमाफीची योजना आणली. निकषानुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ दिला. त्यामुळे कुटुंबातील इतर खातेदार लाभांपासून वंचित राहिले. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत चार लाख ६९ हजार ३४९ खातेदारांना ९४८ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे; पण लाखो शेतकरी वेगवेगळ्या निकषांत आडकल्याने ते वंचित राहिले. सरकारने मध्यंतरी या निकषांत बदल करून कुटुंबातील सर्वच व्यक्तींना लाभ देण्याचा निर्णय घेतला.

कुटुंब निकष आणि इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खातेदारांचा डाटा पुन्हा जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे फेरतपासणीसाठी पाठविला आहे. कोल्हापूर विभागात तीन लाख १ हजार १६४ असे खातेदार आहेत. त्यामध्ये कोल्हापुरात सर्वाधिक एक लाख ३३ हजार २८२, सांगलीत ७६ हजार ८१९ तर साताºयात ९१ हजार ६३ खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांच्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे तपासणीसाठी आल्या आहेत. त्यांची तपासणी करून पात्र खातेदारांची यादी १० आॅक्टोबरपर्यंत सरकारकडे सादर करायची आहे.

त्याशिवाय २०१६-१७ या आर्थिक वर्षातील ज्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ झाला, त्यांना पीक व मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा बॅँकांनी केला का? याची तपासणी करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना दिले आहेत. त्याचबरोबर शेतकरी पात्र झाले; पण त्यांना खरोखरच पैशांचा लाभ झाला का? याची शहानिशाही लेखापरीक्षक करणार आहेत. त्यासाठी विकास संस्थांसह शेतकºयांना अर्थपुरवठा करणाºया संस्थांसाठी १ ते ६६ कॉलमचा नमुना दिला आहे. त्यांनी पात्र झालेल्या खातेदारांची संपूर्ण माहिती भरायची, लेखापरीक्षक त्याची तपासणी करणार असून त्याचा अहवाल चार दिवसांत आयुक्तांना द्यायचा आहे.कोल्हापूर विभागामध्येआतापर्यंत झालेली कर्जमाफीजिल्हा पात्र खातेदारांची संख्या कर्जमाफीची रक्कमकोल्हापूर एक लाख ७० हजार ९०१ ३१४ कोटीसांगली एक लाख १४ हजार ५९१ २५९ कोटीसातारा एक लाख ८३ हजार ८५७ ३७४ कोटीएकूण ४ लाख ६९ हजार ३४९ ९४८ कोटी

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर