शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

कोल्हापूर : उद्योग क्षेत्राने जगभरातील नवतंत्रज्ञान स्वीकारावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:31 IST

उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देउद्योग क्षेत्राने जगभरातील नवतंत्रज्ञान स्वीकारावे : चंद्रकांत पाटीलवेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स् प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन

कोल्हापूर : उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे कोल्हापुरात दि. १५ ते १८ डिसेंबर दरम्यान वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स् २०१८ हे औद्योगिक प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक जयेश ओसवाल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘स्टार्ट अप’मधील संकल्पनांना बळ दिले पाहिजे. नवीन उद्योग, उद्योजक पुढे येण्यासाठी त्यांना केवळ भांडवल उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांच्या उद्योग उभारणीला आवश्यक ती मदत केली पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदीपभाई कापडिया, धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.

मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र संकल्पनाया कार्यक्रमात ‘महाराष्ट्र चेंबर’चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्तविकात या प्रदर्शनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र’ अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे. त्यात देशविदेशातील विविध कंपन्या सहभागी होणार आहेत. व्यापार-उद्योग क्षेत्राशी संबंधित शासनाच्या नवीन योजना, जगभरातील नवतंत्रज्ञान आणि संधी, आदींबाबत चर्चासत्रे होणार आहेत. कोल्हापुरात गूळ आणि संरक्षण विभागाला लागणाऱ्या साधनसामुग्री उत्पादनाचे क्लस्टर व्हावे.

व्यावसायिकांचे प्रश्न समजून घेणारविमानतळ नियमित सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत कोल्हापुरात विविध व्यावसायिक, त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहे. त्यातून त्यांचे प्रश्न समजून घेणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर