शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

कोल्हापूर : उद्योग क्षेत्राने जगभरातील नवतंत्रज्ञान स्वीकारावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:31 IST

उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देउद्योग क्षेत्राने जगभरातील नवतंत्रज्ञान स्वीकारावे : चंद्रकांत पाटीलवेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स् प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन

कोल्हापूर : उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे कोल्हापुरात दि. १५ ते १८ डिसेंबर दरम्यान वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स् २०१८ हे औद्योगिक प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक जयेश ओसवाल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘स्टार्ट अप’मधील संकल्पनांना बळ दिले पाहिजे. नवीन उद्योग, उद्योजक पुढे येण्यासाठी त्यांना केवळ भांडवल उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांच्या उद्योग उभारणीला आवश्यक ती मदत केली पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदीपभाई कापडिया, धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.

मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र संकल्पनाया कार्यक्रमात ‘महाराष्ट्र चेंबर’चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्तविकात या प्रदर्शनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र’ अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे. त्यात देशविदेशातील विविध कंपन्या सहभागी होणार आहेत. व्यापार-उद्योग क्षेत्राशी संबंधित शासनाच्या नवीन योजना, जगभरातील नवतंत्रज्ञान आणि संधी, आदींबाबत चर्चासत्रे होणार आहेत. कोल्हापुरात गूळ आणि संरक्षण विभागाला लागणाऱ्या साधनसामुग्री उत्पादनाचे क्लस्टर व्हावे.

व्यावसायिकांचे प्रश्न समजून घेणारविमानतळ नियमित सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत कोल्हापुरात विविध व्यावसायिक, त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहे. त्यातून त्यांचे प्रश्न समजून घेणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर