शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कोल्हापूर : बदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा : गिरीष चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:38 IST

उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा  : गिरीष चितळेसॅटर्डे क्लबतर्फे किरण पाटील उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘कोल्हापूर उद्योगरत्न’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अशोक दुगाडे, महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे, सॅटर्डे क्लबचे विश्वस्त प्रदीप ताम्हाणे प्रमुख उपस्थित होते.

घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे चेअरमन किरण पाटील यांना चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांच्या हस्ते कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गिरीष चितळे म्हणाले, कोल्हापूर ही उद्योगनगरी आहे. येथील उद्योजकता हे मोठे नेतृत्व आहे. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे उद्योजकांनी बदल स्वीकारून आपला उद्योग वाढविण्यासाठी गतिमान राहणे आवश्यक आहे. किरण पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या मातीने मला भरूभरून दिले आहे. हा पुरस्कार मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.कार्यक्रमास महेश यादव, श्रीकृष्ण पाटील, योगेश कुलकर्णी, ओंकार देशपांडे, राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सुधीर राऊत, नितीन वाडीकर, नवीन महाजन, एच. सी. मित्तल, सूरजितसिंग पवार, विजय पाटील, हर्षवर्धन भुरके, आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज गुणे यांनी प्रास्ताविक केले. दिशा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. जयेश पाटील यांनी आभार मानले.

नियमित विमानसेवेची प्रतीक्षाउद्योगाला पूरक असणाऱ्या विविध गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेत. मात्र, येथे दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात नियमित विमानसेवा कधी सुरू होते याची आम्ही उद्योजक प्रतीक्षा करीत आहोत, असे गिरीष चितळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उद्योगात मराठी माणूस स्थिर होत आहे. स्वत:ची क्षमता सिद्ध करीत आहे.

 

 

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूर