शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा : गिरीष चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:38 IST

उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा  : गिरीष चितळेसॅटर्डे क्लबतर्फे किरण पाटील उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘कोल्हापूर उद्योगरत्न’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अशोक दुगाडे, महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे, सॅटर्डे क्लबचे विश्वस्त प्रदीप ताम्हाणे प्रमुख उपस्थित होते.

घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे चेअरमन किरण पाटील यांना चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांच्या हस्ते कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गिरीष चितळे म्हणाले, कोल्हापूर ही उद्योगनगरी आहे. येथील उद्योजकता हे मोठे नेतृत्व आहे. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे उद्योजकांनी बदल स्वीकारून आपला उद्योग वाढविण्यासाठी गतिमान राहणे आवश्यक आहे. किरण पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या मातीने मला भरूभरून दिले आहे. हा पुरस्कार मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.कार्यक्रमास महेश यादव, श्रीकृष्ण पाटील, योगेश कुलकर्णी, ओंकार देशपांडे, राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सुधीर राऊत, नितीन वाडीकर, नवीन महाजन, एच. सी. मित्तल, सूरजितसिंग पवार, विजय पाटील, हर्षवर्धन भुरके, आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज गुणे यांनी प्रास्ताविक केले. दिशा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. जयेश पाटील यांनी आभार मानले.

नियमित विमानसेवेची प्रतीक्षाउद्योगाला पूरक असणाऱ्या विविध गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेत. मात्र, येथे दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात नियमित विमानसेवा कधी सुरू होते याची आम्ही उद्योजक प्रतीक्षा करीत आहोत, असे गिरीष चितळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उद्योगात मराठी माणूस स्थिर होत आहे. स्वत:ची क्षमता सिद्ध करीत आहे.

 

 

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूर