शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

Kolhapur: =पंचगंगेची पातळी ४९ फूटावर गेल्यास कोल्हापुरातून रेल्वे वाहतूक होणार बंद, प्रवासाला निघण्यापूर्वी करा चौकशी

By संदीप आडनाईक | Updated: July 27, 2024 21:08 IST

Kolhapur News: पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा.

- संदीप आडनाईक

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील पूलाव ४८ फूट पाणी आले आहे. पाण्याची पातळी जर ४९ फूटावर गेली तर कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वेची वाहतूक बंद होण्याची शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.

रेल्वेच्या पुणे विभागाने याबाबत इशारा दिला आहे. कोल्हापूर मार्गावरील कोल्हापूर मालधक्का ते रुकडी यादरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी या ठिकाणी पाण्याची पातळी ४८ फूट इतकी आहे. कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी पुलाजवळ वाढतच आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील. यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

महालक्ष्मी, कलबुर्गी सुटलीदरम्यान, शनिवारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कलबुर्गी एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांनी प्रवासी घेउन प्रयाण केले आहे. या दोन गाडया रुकडी येथील पंचगंगा नदीवरील पूलावरुन पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. रात्री उशिरा पुण्याकडे धावणारी विशेष रेल्वेसह ४.३० वाजता कोल्हापुरात येणारी हरिप्रिया एक्सप्रेस येणार की नाही हे समजल्यानंतरच इतर सर्व रेल्वे सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. जर पाणीपातळी वाढली तर पुढील आठवड्यात रेल्वेसेवा बंद राहणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkolhapurकोल्हापूर