शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

कोल्हापूर : आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, शाखा अभियंत्याचा उर्मटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:54 IST

आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का’ अशा शब्दांत सुनावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला.

ठळक मुद्देकोल्हापूर : आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना , लोकशाही दिनात तक्रारदारऐकवला शाखा अभियंत्याचा उर्मटपणा

कोल्हापूर : आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का’ अशा शब्दांत सुनावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. तक्रारदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोरच हा घडलेला प्रकार ऐकवला तेव्हा खवळलेल्या आयुक्तांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना चांगलेच सुनावले. जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर त्यानंतर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, असा सज्जड दम आयुक्तांनी दिला. अचानक समोर आलेल्या या प्रकाराने अधिकाऱ्यांची एकच भंबेरी उडाली.शनिवार पेठेत भाऊसिंगजी रस्त्यावर राहणाऱ्या मनोज रामचंद्र पाटील यांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून काही तांत्रिक कारणाने पाणीपुरवठा होत नव्हता. जेमतेम तासभर आणि तेही कमी दाबाने पाणी मिळत होते. त्यामुळे पाटील यांनी संबंधित शाखा अभियंता, अन्य कर्मचाऱ्यांच्याकडे तक्रार करत होते; परंतु त्यांच्या तक्रारीची कोणीच दखल घेत नव्हते.

एके दिवशी संतापाने त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा त्या अधिकाऱ्यांना दिला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेण्याऐवजी उलट पाटील यांनाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरांना सांगा, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का?’ अशा उर्मट भाषेत पाटील यांचा अवमान केला होता. काही दिवसांपूर्वीचा हा किस्सा आहे.पाटील सोमवारी लोकशाही दिनात आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांच्यासमोर आयुक्त अभिजित चौधरी यांना हा प्रकार ऐकवला. अचानक चर्चा उपस्थित झाल्यामुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. आयुक्तांचाही रागाचा पार चढला. त्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना धारेवर धरले. ‘तुमच्याबद्दलच्या असल्या तक्रारी ऐकायला मी येथे बसलो आहे का’ अशी विचारणा करत जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निरसन झाले नाही तर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, अशा शब्दांत दम भरला.महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा उर्मटपणा, त्यांच्या कामाची पद्धत, बेजबाबदारपणाचा एक अस्सल नमुना पाहायला मिळाल्याने आयुक्त चौधरी यांनी तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. आपापल्या कार्यकक्षेतील कामे तातडीने पूर्ण करा, लोकशाही दिनापर्यंत तक्रारीही येता कामा नयेत, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांवर राग व्यक्त केला. सोमवारच्या लोकशाही दिनात एकूण १३ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर