शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोल्हापूर : आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, शाखा अभियंत्याचा उर्मटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:54 IST

आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का’ अशा शब्दांत सुनावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला.

ठळक मुद्देकोल्हापूर : आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना , लोकशाही दिनात तक्रारदारऐकवला शाखा अभियंत्याचा उर्मटपणा

कोल्हापूर : आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का’ अशा शब्दांत सुनावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. तक्रारदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोरच हा घडलेला प्रकार ऐकवला तेव्हा खवळलेल्या आयुक्तांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना चांगलेच सुनावले. जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर त्यानंतर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, असा सज्जड दम आयुक्तांनी दिला. अचानक समोर आलेल्या या प्रकाराने अधिकाऱ्यांची एकच भंबेरी उडाली.शनिवार पेठेत भाऊसिंगजी रस्त्यावर राहणाऱ्या मनोज रामचंद्र पाटील यांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून काही तांत्रिक कारणाने पाणीपुरवठा होत नव्हता. जेमतेम तासभर आणि तेही कमी दाबाने पाणी मिळत होते. त्यामुळे पाटील यांनी संबंधित शाखा अभियंता, अन्य कर्मचाऱ्यांच्याकडे तक्रार करत होते; परंतु त्यांच्या तक्रारीची कोणीच दखल घेत नव्हते.

एके दिवशी संतापाने त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा त्या अधिकाऱ्यांना दिला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेण्याऐवजी उलट पाटील यांनाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरांना सांगा, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का?’ अशा उर्मट भाषेत पाटील यांचा अवमान केला होता. काही दिवसांपूर्वीचा हा किस्सा आहे.पाटील सोमवारी लोकशाही दिनात आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांच्यासमोर आयुक्त अभिजित चौधरी यांना हा प्रकार ऐकवला. अचानक चर्चा उपस्थित झाल्यामुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. आयुक्तांचाही रागाचा पार चढला. त्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना धारेवर धरले. ‘तुमच्याबद्दलच्या असल्या तक्रारी ऐकायला मी येथे बसलो आहे का’ अशी विचारणा करत जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निरसन झाले नाही तर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, अशा शब्दांत दम भरला.महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा उर्मटपणा, त्यांच्या कामाची पद्धत, बेजबाबदारपणाचा एक अस्सल नमुना पाहायला मिळाल्याने आयुक्त चौधरी यांनी तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. आपापल्या कार्यकक्षेतील कामे तातडीने पूर्ण करा, लोकशाही दिनापर्यंत तक्रारीही येता कामा नयेत, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांवर राग व्यक्त केला. सोमवारच्या लोकशाही दिनात एकूण १३ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर