शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कोल्हापूर : वीज बिल दुरूस्त न करता वसुली केल्यास ‘महावितरण’ला टाळे, काँग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:56 IST

शेतीपंपाचे वीजबिल दुरूस्त न करता वसुलीचा तगादा लावल्यास ‘महावितरण’चे कार्यालय बंद पाडून टाळे लावू, असा इशारा मंगळवारी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी ‘महावितरण’चे कोल्हापूर परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. बी. मारूळकर यांना निवेदनाद्वारे दिला. त्याचबरोबर त्रयस्थ यंत्रणेमार्फत शेतीपंपाची पटपडताळणी करून सत्य उजेडात आणावे, अशी मागणीही करण्यात आली.

ठळक मुद्देवीज बिल दुरूस्त न करता वसुली केल्यास ‘महावितरण’ला टाळेकाँग्रेसचा इशारा : शेतीपंपांची पटपडताळणी

कोल्हापूर : शेतीपंपाचे वीजबिल दुरूस्त न करता वसुलीचा तगादा लावल्यास ‘महावितरण’चे कार्यालय बंद पाडून टाळे लावू, असा इशारा मंगळवारी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी ‘महावितरण’चे कोल्हापूर परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. बी. मारूळकर यांना निवेदनाद्वारे दिला. त्याचबरोबर त्रयस्थ यंत्रणेमार्फत शेतीपंपाची पटपडताळणी करून सत्य उजेडात आणावे, अशी मागणीही करण्यात आली.सकाळी साडेअकराच्या सुमारास ताराबाई पार्क येथील ‘महावितरण’च्या कार्यालयात संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एस. बी. मारूळकर यांची भेट घेऊन शेतीपंपांबाबतच्या चुकीच्या धोरणांबाबत जाब विचारला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, वीज गळती कमी केली हे दाखविण्यासाठी शेतीपंपाचा वीज वापर वाढवून दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. आय.आय.टी. मुंबईने केलेल्या पाहणी अहवालानुसार शेतीपंपांचा वीज वापर १०६४ तास वर्षापोटी निश्चित केला आहे; परंतु ‘महावितरण’ने तो वाढवून १९०० ते २००० तास दाखविला आहे. त्यामुळे वापर निम्मा असूनही दुप्पट दाखविला गेला आहे. मीटर नसलेल्या शेतीपंप ग्राहकांचा जोडभार वाढविण्यात आला आहे.

मीटर रिडिंग न घेता दरमहा प्रतिहॉर्सपॉवर १२५ युनिटस्प्रमाणे बिलिंग करण्यात आले आहे. दि. १३ जुलै २०१७ ला ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची वीज बिले दुरूस्त करून बिलिंग सुरू करू, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप कार्यवाही शून्य झाली आहे.

प्रत्यक्ष जागेवर तपासणी करून मार्च २०१७ अखेरचे बिल दुरूस्त व अचूक करून मिळाले तसेच एप्रिल २०१६ पासूनची सर्व बिले दुरूस्त करून मिळावीत तसेच त्रयस्थ यंत्रणेमार्फत शेतीपंपांची पटपडताळणी करून त्याचे सत्य उजेडात आणावे तसेच शेतीपंपाची विज बिले अचूक व दुरूस्त न करता वीज तोडणे, वसुलीसाठी तगादा लावणे अशा बाबी समोर आल्यास ‘महावितरण’च्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल. यावेळी रोहन रेडेकर, योगेश हत्तलगे, प्रथमेश तेली, तानाजी मोरे, योगेश कांबळे, सौरभ परळीकर, राज पुजारी, दत्तू भोसले आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरण