शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

साखर निर्यातीत ‘कोल्हापूरच भारी’

By admin | Updated: March 23, 2016 00:55 IST

सरासरी ८० टक्के कोटा पूर्ण : केंद्राच्या अनुदानाचा पोत्यामागे सरासरी ३०० रुपये फायदा

राजाराम लोंढे -कोल्हापूर -केंद्र सरकारच्या आदेशानुसार १२ टक्के साखर निर्यातीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे आहे. दोन कारखान्यांचा अपवादवगळता बहुतांशी कारखान्यांनी आपल्या ठरलेल्या कोट्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाख क्विंटल साखरेची निर्यात केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल साखर जिल्ह्यातून निर्यात करायची असून सप्टेंबर २०१६ अखेर निर्यातीसाठी मुभा आहे. निर्यात करणाऱ्या कारखान्यांना पोत्यामागे सरासरी तीनशे रुपये अनुदानाचा फायदा होणार आहे. यंदाचा साखर हंगाम सुरू होतानाच साखरेचा दर १९ रुपयांपर्यंत खाली आल्याने संपूर्ण साखर कारखानदारी हादरून गेली होती. साखर कारखानदारीला सावरण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत कारखान्यांना निर्यातीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पादित साखरेच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याचे आदेश दिले होेते. त्यासाठी प्रतिटनास ४५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बाजारपेठेतील साखरेत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर प्रत्यक्षात निर्यात सुरू झाल्यानंतर साखरेने २५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यात न करणाऱ्या कारखान्यांना दम दिल्यानंतर पुन्हा गती वाढली आणि दरही वाढले. सध्या साखर तीस रुपयांच्या पुढे आहे. सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्यात करण्याची मुदत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात १२ टक्क्यांप्रमाणे २५ लाख क्विंटल साखरेपैकी तब्बल २० लाख क्विंटल साखर निर्यात केली आहे. राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकेंद्र सरकारच्या आदेशानुसार १२ टक्के साखर निर्यातीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे आहे. दोन कारखान्यांचा अपवादवगळता बहुतांशी कारखान्यांनी आपल्या ठरलेल्या कोट्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाख क्विंटल साखरेची निर्यात केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल साखर जिल्ह्यातून निर्यात करायची असून सप्टेंबर २०१६ अखेर निर्यातीसाठी मुभा आहे. निर्यात करणाऱ्या कारखान्यांना पोत्यामागे सरासरी तीनशे रुपये अनुदानाचा फायदा होणार आहे. यंदाचा साखर हंगाम सुरू होतानाच साखरेचा दर १९ रुपयांपर्यंत खाली आल्याने संपूर्ण साखर कारखानदारी हादरून गेली होती. साखर कारखानदारीला सावरण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत कारखान्यांना निर्यातीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पादित साखरेच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याचे आदेश दिले होेते. त्यासाठी प्रतिटनास ४५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बाजारपेठेतील साखरेत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर प्रत्यक्षात निर्यात सुरू झाल्यानंतर साखरेने २५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यात न करणाऱ्या कारखान्यांना दम दिल्यानंतर पुन्हा गती वाढली आणि दरही वाढले. सध्या साखर तीस रुपयांच्या पुढे आहे. सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्यात करण्याची मुदत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात १२ टक्क्यांप्रमाणे २५ लाख क्विंटल साखरेपैकी तब्बल २० लाख क्विंटल साखर निर्यात केली आहे. असा होतो निर्यातीचा फायदा५ लाख गाळप व १२.५ टक्के उतारा गृहीत धरला तरसाखर उत्पादन - ६ लाख २५ हजार पोती१२ टक्क्यांप्रमाणे निर्यात कोटा - ७५ हजार पोती४५ रुपयांप्रमाणे मिळणारे अनुदान - २ कोटी २५ लाखप्रतिपोते होणारे अनुदान - ३०० रुपये आवाहनाला प्रतिसाद देणारा जिल्हाकेंद्र व राज्य सरकारची योजना तंतोतंत पालन करणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा नावलौकीक आहे. ‘एफआरपी’च्या ‘८०-२० फॉर्मुल्या’चा काटेकोरपणे अवलंब करण्याचे कामही कोल्हापूरनेच केले आहे. १०० टक्क्यांप्रमाणे २१६५ कोटी ६३ लाख एफआरपी होते, त्यापैकी ७६५ कोटी एफआरपी देय आहे. ‘गुरुदत्त’, ‘वारणा’ निर्यातीत मागेगुरुदत्त व वारणा साखर कारखाने निर्यातीत एकदम मागे आहेत. ‘गुरुदत्त’ने अद्याप एकही पोते निर्यात केलेले नाही. आगामी काळात बाजारपेठेतील साखरेचे दर ३५ रुपयांच्या पुढे जातील, अशी अपेक्षा या कारखान्यांना असल्याने त्यांनी निर्यातीकडे दुर्लक्ष केले आहे. कारखानानिहाय निर्यातीची टक्केवारी अशीआजरा १००भोगावती१००शाहू८३बिद्री८३राजाराम८२नलवडे ८०शरद ८०गायकवाड ८०जवाहर ७६दालमिया ८२घोरपडे ८५डी. वाय. पाटील७०दत्त-शिरोळ ६६पंचगंगा ८०मंडलिक ६१शाहू ८३महाडिक ८१