शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

साखर निर्यातीत ‘कोल्हापूरच भारी’

By admin | Updated: March 23, 2016 00:55 IST

सरासरी ८० टक्के कोटा पूर्ण : केंद्राच्या अनुदानाचा पोत्यामागे सरासरी ३०० रुपये फायदा

राजाराम लोंढे -कोल्हापूर -केंद्र सरकारच्या आदेशानुसार १२ टक्के साखर निर्यातीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे आहे. दोन कारखान्यांचा अपवादवगळता बहुतांशी कारखान्यांनी आपल्या ठरलेल्या कोट्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाख क्विंटल साखरेची निर्यात केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल साखर जिल्ह्यातून निर्यात करायची असून सप्टेंबर २०१६ अखेर निर्यातीसाठी मुभा आहे. निर्यात करणाऱ्या कारखान्यांना पोत्यामागे सरासरी तीनशे रुपये अनुदानाचा फायदा होणार आहे. यंदाचा साखर हंगाम सुरू होतानाच साखरेचा दर १९ रुपयांपर्यंत खाली आल्याने संपूर्ण साखर कारखानदारी हादरून गेली होती. साखर कारखानदारीला सावरण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत कारखान्यांना निर्यातीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पादित साखरेच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याचे आदेश दिले होेते. त्यासाठी प्रतिटनास ४५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बाजारपेठेतील साखरेत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर प्रत्यक्षात निर्यात सुरू झाल्यानंतर साखरेने २५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यात न करणाऱ्या कारखान्यांना दम दिल्यानंतर पुन्हा गती वाढली आणि दरही वाढले. सध्या साखर तीस रुपयांच्या पुढे आहे. सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्यात करण्याची मुदत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात १२ टक्क्यांप्रमाणे २५ लाख क्विंटल साखरेपैकी तब्बल २० लाख क्विंटल साखर निर्यात केली आहे. राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकेंद्र सरकारच्या आदेशानुसार १२ टक्के साखर निर्यातीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे आहे. दोन कारखान्यांचा अपवादवगळता बहुतांशी कारखान्यांनी आपल्या ठरलेल्या कोट्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाख क्विंटल साखरेची निर्यात केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल साखर जिल्ह्यातून निर्यात करायची असून सप्टेंबर २०१६ अखेर निर्यातीसाठी मुभा आहे. निर्यात करणाऱ्या कारखान्यांना पोत्यामागे सरासरी तीनशे रुपये अनुदानाचा फायदा होणार आहे. यंदाचा साखर हंगाम सुरू होतानाच साखरेचा दर १९ रुपयांपर्यंत खाली आल्याने संपूर्ण साखर कारखानदारी हादरून गेली होती. साखर कारखानदारीला सावरण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत कारखान्यांना निर्यातीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पादित साखरेच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याचे आदेश दिले होेते. त्यासाठी प्रतिटनास ४५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बाजारपेठेतील साखरेत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर प्रत्यक्षात निर्यात सुरू झाल्यानंतर साखरेने २५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यात न करणाऱ्या कारखान्यांना दम दिल्यानंतर पुन्हा गती वाढली आणि दरही वाढले. सध्या साखर तीस रुपयांच्या पुढे आहे. सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्यात करण्याची मुदत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात १२ टक्क्यांप्रमाणे २५ लाख क्विंटल साखरेपैकी तब्बल २० लाख क्विंटल साखर निर्यात केली आहे. असा होतो निर्यातीचा फायदा५ लाख गाळप व १२.५ टक्के उतारा गृहीत धरला तरसाखर उत्पादन - ६ लाख २५ हजार पोती१२ टक्क्यांप्रमाणे निर्यात कोटा - ७५ हजार पोती४५ रुपयांप्रमाणे मिळणारे अनुदान - २ कोटी २५ लाखप्रतिपोते होणारे अनुदान - ३०० रुपये आवाहनाला प्रतिसाद देणारा जिल्हाकेंद्र व राज्य सरकारची योजना तंतोतंत पालन करणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा नावलौकीक आहे. ‘एफआरपी’च्या ‘८०-२० फॉर्मुल्या’चा काटेकोरपणे अवलंब करण्याचे कामही कोल्हापूरनेच केले आहे. १०० टक्क्यांप्रमाणे २१६५ कोटी ६३ लाख एफआरपी होते, त्यापैकी ७६५ कोटी एफआरपी देय आहे. ‘गुरुदत्त’, ‘वारणा’ निर्यातीत मागेगुरुदत्त व वारणा साखर कारखाने निर्यातीत एकदम मागे आहेत. ‘गुरुदत्त’ने अद्याप एकही पोते निर्यात केलेले नाही. आगामी काळात बाजारपेठेतील साखरेचे दर ३५ रुपयांच्या पुढे जातील, अशी अपेक्षा या कारखान्यांना असल्याने त्यांनी निर्यातीकडे दुर्लक्ष केले आहे. कारखानानिहाय निर्यातीची टक्केवारी अशीआजरा १००भोगावती१००शाहू८३बिद्री८३राजाराम८२नलवडे ८०शरद ८०गायकवाड ८०जवाहर ७६दालमिया ८२घोरपडे ८५डी. वाय. पाटील७०दत्त-शिरोळ ६६पंचगंगा ८०मंडलिक ६१शाहू ८३महाडिक ८१