शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हापूर ‘नागरी वस्ती’चा वर्षभरात अर्धाच निधी खर्च,अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:44 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाल्याशिवाय सन २०१७-१८ साठी मंजूर झालेला सात कोटींचा निधी वितरित ...

ठळक मुद्दे ३१ मार्चपर्यंत खर्च करा : पालकमंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाल्याशिवाय सन २०१७-१८ साठी मंजूर झालेला सात कोटींचा निधी वितरित केला जाणार नाही, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील खर्चाचा आढावा आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल), अरविंद लाटकर, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतून महानगरपालिका आणि नगरपालिकांना कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा निधी दोन वर्षांमध्ये संपूर्ण खर्च होणे आवश्यक आहे, असे असतानाही अनेक यंत्रणांकडील हा निधी अद्यापही अखर्चित आहे. योजनेतील सन २०१६-१७ चा निधी मार्चअखेरपर्यंत संपूर्ण खर्च करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे यंत्रणांनी तो खर्च करावा त्याशिवाय सन २०१७-१८ मधील निधी वितरित केला जाणार नाही. त्याचबरोबर या कामांचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करून घ्यावे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.‘नावीन्यपूर्ण’मधील तीन कोटींच्या कामांना मान्यतानाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्याला ११ कोटींचा निधी प्राप्त असून, आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांच्या कामाच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. यंत्रणांनी या योजनेसाठीही प्रस्ताव तत्काळ प्रशासनाकडे द्यावेत. या योजनेतून शहर व जिल्ह्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात, असे मंत्री पाटील म्हणाले.समाजकल्याण विभागाने दक्ष राहावेनागरी वस्ती सुधार योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने समाजकल्याण विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शहरातील आमदारांना निधी उपलब्ध करून द्यावामहानगरपालिकेने शहरातील आमदारांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; तसेच महानगरपालिकेने पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ प्रस्ताव द्यावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद लाटकर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आमदार राजेश क्षीरसागर, नितीन देसाई उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील