शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

कोल्हापूर ‘नागरी वस्ती’चा वर्षभरात अर्धाच निधी खर्च,अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:44 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाल्याशिवाय सन २०१७-१८ साठी मंजूर झालेला सात कोटींचा निधी वितरित ...

ठळक मुद्दे ३१ मार्चपर्यंत खर्च करा : पालकमंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाल्याशिवाय सन २०१७-१८ साठी मंजूर झालेला सात कोटींचा निधी वितरित केला जाणार नाही, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील खर्चाचा आढावा आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल), अरविंद लाटकर, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतून महानगरपालिका आणि नगरपालिकांना कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा निधी दोन वर्षांमध्ये संपूर्ण खर्च होणे आवश्यक आहे, असे असतानाही अनेक यंत्रणांकडील हा निधी अद्यापही अखर्चित आहे. योजनेतील सन २०१६-१७ चा निधी मार्चअखेरपर्यंत संपूर्ण खर्च करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे यंत्रणांनी तो खर्च करावा त्याशिवाय सन २०१७-१८ मधील निधी वितरित केला जाणार नाही. त्याचबरोबर या कामांचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करून घ्यावे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.‘नावीन्यपूर्ण’मधील तीन कोटींच्या कामांना मान्यतानाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्याला ११ कोटींचा निधी प्राप्त असून, आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांच्या कामाच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. यंत्रणांनी या योजनेसाठीही प्रस्ताव तत्काळ प्रशासनाकडे द्यावेत. या योजनेतून शहर व जिल्ह्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात, असे मंत्री पाटील म्हणाले.समाजकल्याण विभागाने दक्ष राहावेनागरी वस्ती सुधार योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने समाजकल्याण विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शहरातील आमदारांना निधी उपलब्ध करून द्यावामहानगरपालिकेने शहरातील आमदारांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; तसेच महानगरपालिकेने पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ प्रस्ताव द्यावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद लाटकर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आमदार राजेश क्षीरसागर, नितीन देसाई उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील