शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव, गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 18:50 IST

राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याचे राज्य सरकारचे पाऊल म्हणजे मराठी आणि सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळणार हा प्रश्न आहे. गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कुटिल कारस्थान आहे, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त झाली.

ठळक मुद्दे‘कॉर्पोरेट शाळा’ निर्णयाबाबत शिक्षणक्षेत्रातून नाराजीकोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून तीव्र नाराजी सरकारच्या या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ जनआंदोलन करेलसरकारचे धाडसी पाऊल : डॉ. बी. एम. हिर्डेकर

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याचे राज्य सरकारचे पाऊल म्हणजे मराठी आणि सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळणार हा प्रश्न आहे. गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कुटिल कारस्थान आहे, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त झाली.यात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे म्हणाल्या, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास शासन मान्यता देणार असल्याचे यातून दिसते. स्वयंअर्थसहाय्यित असल्याने या शाळा निश्चितपणे शुल्क आकारणी करणार. या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळेल हा प्रश्न आहे.

कॉर्पोरेट कंपन्यांच्या शाळा सुरू झाल्यास शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आणखी वाढेल. त्यादृष्टीने पारंपरिक शाळांनी अद्यावत होणे गरजेचे ठरणार आहे. या ‘कॉर्पोरेट शाळा’आणि गरिबांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या पारंपरिक व अनुदानित शाळांमध्ये सरकारने समतोल साधणे आवश्यक आहे. त्यात ‘कॉर्पोरेट शाळा’ मर्यादा घालण्यात याव्यात. पारंपरिक शाळांबाबत लवचिक धोरण ठेऊन त्यांना अनुदानाचे बळ आणि अद्ययावत होण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे ठरणार आहे.कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्याबाबत मान्यता देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे गरीब, सर्वसामान्यांचे शिक्षण बंद करण्याचे कुटील कारस्थान आहे. कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीचा अंतिम उद्देश हा नफा मिळविणे असतो. त्यामुळे ग्रामीण भागात दहा ते बारा पटसंख्या असते. अशा ठिकाणी या कंपन्या शाळा सुरू करणार नाहीत.

त्यामुळे तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा उद्देश साध्य होणार नाही. या कंपन्यांच्या शाळा एकदा सुरू झाल्यानंतर हळू-हळू सरकारी शाळा बंद होतील. मग, कॉर्पोरेट कंपन्यांनी सुरू केलेल्या शाळांकडून अवाजवी शुल्काची आकारणी केली जाईल. ते सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना परवडणार नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ जनआंदोलन करेल. त्यात पालकांना सहभागी करून घेईल.

खासगी शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे म्हणाले, ‘कॉर्पोरेट शाळा’ बाबतचे शासनाचे हे धोरण म्हणजे सरकारी आणि मराठी शाळा मोडीत काढण्यातचा डाव आहे. मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला आहे. हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अन्यथा सरकारला सन २०१९ मध्ये त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.सरकारचे धाडसी पाऊल‘कॉर्पोरेट शाळा’ हे सरकारचे एक धाडसी पाऊल आहे. त्याची एक चांगली बाजू अशी आहे की, कंपन्यांचा जो ‘सीएसआर फंड’ सध्या येथे-तेथे खर्च होतो, हा खर्च शिक्षणाकडे वळेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपचे हे चांगले मॉडेल आहे.

यासाठी निश्चितपणे कंपन्या पुढे येतील. त्यातून नियमित शिक्षणावरील खर्चाचा भार कमी होईल. मात्र, एक भीती अशी व्यक्त होत आहे. ती म्हणजे कंपन्यांची शाळा झाल्याने नफेखोरी होईल. संबंधित भीती कमी करण्यासाठी सरकारने या शाळांसाठी समावेशी धोरण ठरविण्यासह त्याचे योग्य नियमन करणे आवश्यक आहे. या शाळांमध्ये समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर