शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोल्हापूर : सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव, गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 18:50 IST

राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याचे राज्य सरकारचे पाऊल म्हणजे मराठी आणि सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळणार हा प्रश्न आहे. गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कुटिल कारस्थान आहे, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त झाली.

ठळक मुद्दे‘कॉर्पोरेट शाळा’ निर्णयाबाबत शिक्षणक्षेत्रातून नाराजीकोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून तीव्र नाराजी सरकारच्या या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ जनआंदोलन करेलसरकारचे धाडसी पाऊल : डॉ. बी. एम. हिर्डेकर

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याचे राज्य सरकारचे पाऊल म्हणजे मराठी आणि सरकारी शाळा मोडीत काढण्याचा डाव आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळणार हा प्रश्न आहे. गरिबांचे शिक्षण बंद करण्याचे कुटिल कारस्थान आहे, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त झाली.यात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे म्हणाल्या, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास शासन मान्यता देणार असल्याचे यातून दिसते. स्वयंअर्थसहाय्यित असल्याने या शाळा निश्चितपणे शुल्क आकारणी करणार. या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी कितपत मिळेल हा प्रश्न आहे.

कॉर्पोरेट कंपन्यांच्या शाळा सुरू झाल्यास शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आणखी वाढेल. त्यादृष्टीने पारंपरिक शाळांनी अद्यावत होणे गरजेचे ठरणार आहे. या ‘कॉर्पोरेट शाळा’आणि गरिबांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या पारंपरिक व अनुदानित शाळांमध्ये सरकारने समतोल साधणे आवश्यक आहे. त्यात ‘कॉर्पोरेट शाळा’ मर्यादा घालण्यात याव्यात. पारंपरिक शाळांबाबत लवचिक धोरण ठेऊन त्यांना अनुदानाचे बळ आणि अद्ययावत होण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे ठरणार आहे.कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्याबाबत मान्यता देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे गरीब, सर्वसामान्यांचे शिक्षण बंद करण्याचे कुटील कारस्थान आहे. कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीचा अंतिम उद्देश हा नफा मिळविणे असतो. त्यामुळे ग्रामीण भागात दहा ते बारा पटसंख्या असते. अशा ठिकाणी या कंपन्या शाळा सुरू करणार नाहीत.

त्यामुळे तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा उद्देश साध्य होणार नाही. या कंपन्यांच्या शाळा एकदा सुरू झाल्यानंतर हळू-हळू सरकारी शाळा बंद होतील. मग, कॉर्पोरेट कंपन्यांनी सुरू केलेल्या शाळांकडून अवाजवी शुल्काची आकारणी केली जाईल. ते सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना परवडणार नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ जनआंदोलन करेल. त्यात पालकांना सहभागी करून घेईल.

खासगी शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे म्हणाले, ‘कॉर्पोरेट शाळा’ बाबतचे शासनाचे हे धोरण म्हणजे सरकारी आणि मराठी शाळा मोडीत काढण्यातचा डाव आहे. मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला आहे. हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अन्यथा सरकारला सन २०१९ मध्ये त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.सरकारचे धाडसी पाऊल‘कॉर्पोरेट शाळा’ हे सरकारचे एक धाडसी पाऊल आहे. त्याची एक चांगली बाजू अशी आहे की, कंपन्यांचा जो ‘सीएसआर फंड’ सध्या येथे-तेथे खर्च होतो, हा खर्च शिक्षणाकडे वळेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपचे हे चांगले मॉडेल आहे.

यासाठी निश्चितपणे कंपन्या पुढे येतील. त्यातून नियमित शिक्षणावरील खर्चाचा भार कमी होईल. मात्र, एक भीती अशी व्यक्त होत आहे. ती म्हणजे कंपन्यांची शाळा झाल्याने नफेखोरी होईल. संबंधित भीती कमी करण्यासाठी सरकारने या शाळांसाठी समावेशी धोरण ठरविण्यासह त्याचे योग्य नियमन करणे आवश्यक आहे. या शाळांमध्ये समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर