शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रिक्त पदे स्विकृत करण्यास संस्थांना मुभा, ‘गोकुळ’, जिल्हा बॅकेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:20 IST

विविध कारणाने सहकारी संस्थांच्या संचालकांच्या जागा रिक्त झाल्या तर त्याठिकाणी स्विकृत म्हणून घेण्याचा अधिकार संस्थांना द्यावा. याबाबतचा महत्वपुर्ण प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधीकरणाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. यामुळे जिल्ह्यातील ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह विविध संस्थांच्या संचालक मंडळातील रिक्त पद भरण्याचा मार्ग होऊ शकतो.

ठळक मुद्दे ‘गोकुळ’, जिल्हा बॅकेला दिलासाप्राधीकरणाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

कोल्हापूर : विविध कारणाने सहकारी संस्थांच्या संचालकांच्या जागा रिक्त झाल्या तर त्याठिकाणी स्विकृत म्हणून घेण्याचा अधिकार संस्थांना द्यावा. याबाबतचा महत्वपुर्ण प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधीकरणाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. यामुळे जिल्ह्यातील ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह विविध संस्थांच्या संचालक मंडळातील रिक्त पद भरण्याचा मार्ग होऊ शकतो.जुन्या सहकारी कायद्यानुसार रिक्त पदी थेट नियुक्ती करण्याचा अधिकार संचालक मंडळाला होता. पण ९७ व्या घटना दुरूस्ती नंतर याबाबत स्पष्टता नसल्याने गुंता वाढत गेला. एखाद्या संस्थेची निवडणूक झाली आणि अडीच वर्षाच्या आत संचालक मंडळातील जागा रिक्त झाली तर तिथे निवडणूक घ्यावी. त्यानंतर रिक्त झाली तर स्विकृत करण्याची मुभा दिली होती. यामुळे संस्थांचा निवडणूकीसाठी खर्च होणार असल्याने पुर्वीप्रमाणे स्विकृत घेण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी संस्थांची होती.या गुंत्यामुळेच ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेतील संचालक पदे रिक्त आहेत. ‘गोकुळ’ च्या निवडणूकीनंतर वर्षभरातच सुरेश पाटील व चंद्रकांत बोंद्रे यांचे निधन झाले. सुरेश पाटील यांच्या ठिकाणी सत्यजीत पाटील यांना घेतले असले तरी त्यांची नियुक्ती कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती.

बोंद्रे यांच्या जागी अद्याप कोणालाही स्विकृत करून घेतलेले नाही. जिल्हा बॅँकेच्या पात्र-अपात्रतेच्या नाट्यात के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी राजीनामे दिले होते, त्यांच्या ठिकाणी बॅँकेने अनुक्रमे रणजीतसिंह पाटील व अर्चना पाटील यांना स्विकृत करून घेतले. पण त्यांच्या नियुक्तीसमोरही प्रश्नचिन्ह होते.

नरसिंगराव पाटील यांच्या निधनामुळे गेले दोन वर्षे त्यांची जागा रिक्त आहे. यासह जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये हीच अडचण आहे. संस्थांवर पडणारा निवडणूकीचा नाहक खर्च टाळण्यासाठी प्राधीकरणाने सरकारकडे प्रस्ताव ठेवला आहे. 

 

टॅग्स :milkदूधkolhapurकोल्हापूर