शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

कोल्हापूर : तोलाईदारांच्या संपामुळे चार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:00 IST

कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या मालाची तोलाई शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही, असा आदेश पणन विभागाकडून आला आहे. या ...

ठळक मुद्देतोलाईदारांच्या संपामुळे चार कोटींची उलाढाल ठप्पइलेक्ट्रॉनिक वजनकाट्यच्या तोलाईचा प्रश्न निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या मालाची तोलाई शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही, असा आदेश पणन विभागाकडून आला आहे. या विरोधात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे कांदा-बटाटा, गुळासह इतर बाजारातील सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली.बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याची सक्ती २०१४ ला तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी केली होती. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या शेतीमालाची तोलाई, अडत व हमाली शेतकऱ्यांच्या पट्टीतून घेऊ नये, असा आदेशही त्यांनी काढला होता. त्याला विरोध झाल्यानंतर तत्कालीन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अडत बंद’चा निर्णय कायम ठेवत हमाली व तोलाईच्या निर्णयास स्थगिती दिली.

 तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केल्याने बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये अशी सामसूम होती. (छाया- नसीर अत्तार) 

गेली चार वर्षे त्याबाबत काहीच हालचाली नव्हत्या; पण पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थगिती उठविल्याची चर्चा पणन मंडळाच्या पातळीवर सुरू असल्याने तोलाईदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.या निर्णयाविरोधात तोलाईदार महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा देत काम बंद केले. बाजार समितीमधील सर्वच विभागांचे कामकाज होऊ न शकल्याने सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली.

युनियनच्या वतीने बाजार समितीचे सभापती बाबासो लाड व सचिव मोहन सालपे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व आमदार अमल महाडिक यांना निवेदन देऊन हा अन्यायी निर्णय घेऊ नका, अशी विनंती केली.

यावेळी बाजार समितीचे संचालक बाबूराव खोत, युनियनचे उपाध्यक्ष आकाराम केसरे, अजित पाटील, बाजीराव लव्हटे, संजय सावंत, सरदार चव्हाण, अमित शिंगे, आदी उपस्थित होते.

 

बाजार समित्यांचे बहुतांश कामकाज इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावरच होते. शेतकऱ्यांकडून तोलाई घ्यायची नसेल तर सरकारने तोलाईदारांना बाजार समित्यांच्या सेवेत घ्यावे.- बाबूराव खोत, संचालक, बाजार समिती

 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर