शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:20 IST

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच

विश्वास पाटील

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात  शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली. मात्र, महापुराची परिस्थिती जैसे थे असून, शहरातील ४० टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे तब्बल  एक लाखाहून अधिक जणांना स्थलांतर करावे लागले आहे. 

सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच तुकड्या कार्यरत असून लष्कराचे ७५ जवान शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर करत आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे महापुराचे पाणी असून कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. 

हंगामातील ३० टक्के पाऊस पडला दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळा हंगामात सुमारे चार महिन्यांत जेवढा पाऊस पडतो, त्यातील तब्बल एक तृतांश म्हणजे ३० टक्के पाऊस अवघ्या दीड-दोन दिवसांत कोसळल्याने जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाचा हा बदललेला पॅटर्न अधिक धोक्याचा आणि नुकसानकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१९ ला ही असाच तुफानी पाऊस कोसळला होता. कोकणच्या खालोखाल पाऊस पडणारा घाटमाथ्यावरील जिल्हा अशी कोल्हापूरची पारंपरिक ओळख आहे. या जिल्ह्यात एकूण १४ नद्या वाहतात. जिल्ह्यात साधारणत: जूनपासून सप्टेंबरपर्यंत किमान ८५० ते ९०० मिलीमीटर पाऊस पडत असल्याच्या नोंदी आहेत. त्यातही पावसाच्या प्रमाणातही असमतोल आहे. यंदाच्या पावसाळ्यात गुरुवार आणि शुक्रवारी ३३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यावरून पावसाची तीव्रता काय असू शकेल याचा अंदाज येऊ शकतो.

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच. धरणक्षेत्रात पडलेला पाऊस धरणात अडवला जातो; परंतु यंदा धरण क्षेत्राबाहेरच (फ्री कॅटमेंट) जास्त पाऊस पडला तो सगळा वाहून नदीतून महापुरास कारणीभूत ठरला आहे. नदी पात्रालगत झालेली प्रचंड बांधकामे, नाले-ओढे भिंती बांधून बंदिस्त केल्याचा परिणाम आणि त्याकडे महापालिकेने केलेले दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे. 

सांगली : कृष्णेचे पाणी ५२ फुटांवरजिल्ह्यातील कृष्णा व वारणाकाठची पूरस्थिती शनिवारी तीव्र झाली असली तरी रविवारी महापुराचा विळखा सुटण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी २४ तासांत दहा फुटाने वाढली. सांगली व इस्लामपूरचा संपर्क तुटला.

कोयना : दरवाजे साडेेपाच फुटांवरसातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली. धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर आणण्यात आले. धरणातून ३०,२४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अनेक मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

चिपळूण, खेडमध्ये पंचनामे सुरू चिपळूण आणि खेडमधील संपूर्ण बाजारपेठच पुराच्या पाण्यात गेल्यामुळे दोन्ही शहरांमध्ये मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासूनच हाती घेतले आहे. इतिहासात प्रथमच दोन दिवसांत ६०० मि. मी. पावसाची नोंद चिपळूणमध्ये झाली आहे.  आजवर २००५ च्या पुराची पाणी पातळी विक्रमी मानली जात होती. मात्र, यावेळी आलेला पूर त्याहीपेक्षा कितीतरी भयानक होता. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर