शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:20 IST

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच

विश्वास पाटील

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात  शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली. मात्र, महापुराची परिस्थिती जैसे थे असून, शहरातील ४० टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे तब्बल  एक लाखाहून अधिक जणांना स्थलांतर करावे लागले आहे. 

सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच तुकड्या कार्यरत असून लष्कराचे ७५ जवान शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर करत आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे महापुराचे पाणी असून कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. 

हंगामातील ३० टक्के पाऊस पडला दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळा हंगामात सुमारे चार महिन्यांत जेवढा पाऊस पडतो, त्यातील तब्बल एक तृतांश म्हणजे ३० टक्के पाऊस अवघ्या दीड-दोन दिवसांत कोसळल्याने जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाचा हा बदललेला पॅटर्न अधिक धोक्याचा आणि नुकसानकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१९ ला ही असाच तुफानी पाऊस कोसळला होता. कोकणच्या खालोखाल पाऊस पडणारा घाटमाथ्यावरील जिल्हा अशी कोल्हापूरची पारंपरिक ओळख आहे. या जिल्ह्यात एकूण १४ नद्या वाहतात. जिल्ह्यात साधारणत: जूनपासून सप्टेंबरपर्यंत किमान ८५० ते ९०० मिलीमीटर पाऊस पडत असल्याच्या नोंदी आहेत. त्यातही पावसाच्या प्रमाणातही असमतोल आहे. यंदाच्या पावसाळ्यात गुरुवार आणि शुक्रवारी ३३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यावरून पावसाची तीव्रता काय असू शकेल याचा अंदाज येऊ शकतो.

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच. धरणक्षेत्रात पडलेला पाऊस धरणात अडवला जातो; परंतु यंदा धरण क्षेत्राबाहेरच (फ्री कॅटमेंट) जास्त पाऊस पडला तो सगळा वाहून नदीतून महापुरास कारणीभूत ठरला आहे. नदी पात्रालगत झालेली प्रचंड बांधकामे, नाले-ओढे भिंती बांधून बंदिस्त केल्याचा परिणाम आणि त्याकडे महापालिकेने केलेले दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे. 

सांगली : कृष्णेचे पाणी ५२ फुटांवरजिल्ह्यातील कृष्णा व वारणाकाठची पूरस्थिती शनिवारी तीव्र झाली असली तरी रविवारी महापुराचा विळखा सुटण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी २४ तासांत दहा फुटाने वाढली. सांगली व इस्लामपूरचा संपर्क तुटला.

कोयना : दरवाजे साडेेपाच फुटांवरसातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली. धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर आणण्यात आले. धरणातून ३०,२४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अनेक मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

चिपळूण, खेडमध्ये पंचनामे सुरू चिपळूण आणि खेडमधील संपूर्ण बाजारपेठच पुराच्या पाण्यात गेल्यामुळे दोन्ही शहरांमध्ये मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासूनच हाती घेतले आहे. इतिहासात प्रथमच दोन दिवसांत ६०० मि. मी. पावसाची नोंद चिपळूणमध्ये झाली आहे.  आजवर २००५ च्या पुराची पाणी पातळी विक्रमी मानली जात होती. मात्र, यावेळी आलेला पूर त्याहीपेक्षा कितीतरी भयानक होता. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर