शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:20 IST

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच

विश्वास पाटील

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात  शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली. मात्र, महापुराची परिस्थिती जैसे थे असून, शहरातील ४० टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे तब्बल  एक लाखाहून अधिक जणांना स्थलांतर करावे लागले आहे. 

सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच तुकड्या कार्यरत असून लष्कराचे ७५ जवान शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर करत आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे महापुराचे पाणी असून कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. 

हंगामातील ३० टक्के पाऊस पडला दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळा हंगामात सुमारे चार महिन्यांत जेवढा पाऊस पडतो, त्यातील तब्बल एक तृतांश म्हणजे ३० टक्के पाऊस अवघ्या दीड-दोन दिवसांत कोसळल्याने जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाचा हा बदललेला पॅटर्न अधिक धोक्याचा आणि नुकसानकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१९ ला ही असाच तुफानी पाऊस कोसळला होता. कोकणच्या खालोखाल पाऊस पडणारा घाटमाथ्यावरील जिल्हा अशी कोल्हापूरची पारंपरिक ओळख आहे. या जिल्ह्यात एकूण १४ नद्या वाहतात. जिल्ह्यात साधारणत: जूनपासून सप्टेंबरपर्यंत किमान ८५० ते ९०० मिलीमीटर पाऊस पडत असल्याच्या नोंदी आहेत. त्यातही पावसाच्या प्रमाणातही असमतोल आहे. यंदाच्या पावसाळ्यात गुरुवार आणि शुक्रवारी ३३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यावरून पावसाची तीव्रता काय असू शकेल याचा अंदाज येऊ शकतो.

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच. धरणक्षेत्रात पडलेला पाऊस धरणात अडवला जातो; परंतु यंदा धरण क्षेत्राबाहेरच (फ्री कॅटमेंट) जास्त पाऊस पडला तो सगळा वाहून नदीतून महापुरास कारणीभूत ठरला आहे. नदी पात्रालगत झालेली प्रचंड बांधकामे, नाले-ओढे भिंती बांधून बंदिस्त केल्याचा परिणाम आणि त्याकडे महापालिकेने केलेले दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे. 

सांगली : कृष्णेचे पाणी ५२ फुटांवरजिल्ह्यातील कृष्णा व वारणाकाठची पूरस्थिती शनिवारी तीव्र झाली असली तरी रविवारी महापुराचा विळखा सुटण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी २४ तासांत दहा फुटाने वाढली. सांगली व इस्लामपूरचा संपर्क तुटला.

कोयना : दरवाजे साडेेपाच फुटांवरसातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली. धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर आणण्यात आले. धरणातून ३०,२४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अनेक मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

चिपळूण, खेडमध्ये पंचनामे सुरू चिपळूण आणि खेडमधील संपूर्ण बाजारपेठच पुराच्या पाण्यात गेल्यामुळे दोन्ही शहरांमध्ये मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासूनच हाती घेतले आहे. इतिहासात प्रथमच दोन दिवसांत ६०० मि. मी. पावसाची नोंद चिपळूणमध्ये झाली आहे.  आजवर २००५ च्या पुराची पाणी पातळी विक्रमी मानली जात होती. मात्र, यावेळी आलेला पूर त्याहीपेक्षा कितीतरी भयानक होता. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर